शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

-तर आत्मदहन करू, काँग्रेस नेत्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 22:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही तूर खरेदीचे पैसे मिळाले नाहीत. गोदाम नसल्याचे कारण पुढे करून तूर व हरभऱ्याचे मोजमाप केले नाही. बाजार समिती आणि खरेदी-विक्री संघाच्या आवारात खरेदी केलेली तूर पडून आहे. बोंडअळी नुकसानभरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. कर्जमाफीचा बोजवारा उडाला आहे. याला केंद्र व राज्यातील ...

ठळक मुद्देमूक मोर्चा : बबलू देशमुख, यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, केवलराम काळे, संजय खोडके, नरेशचंद्र ठाकरे यांचे नेतृत्व

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही तूर खरेदीचे पैसे मिळाले नाहीत. गोदाम नसल्याचे कारण पुढे करून तूर व हरभऱ्याचे मोजमाप केले नाही. बाजार समिती आणि खरेदी-विक्री संघाच्या आवारात खरेदी केलेली तूर पडून आहे. बोंडअळी नुकसानभरपाईचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. कर्जमाफीचा बोजवारा उडाला आहे. याला केंद्र व राज्यातील भाजप सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच मागण्या ३१ मेपर्यंत सोडविण्यात याव्या, अन्यथा जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते १ जून रोजी आत्मदहन करतील, असा निर्वाणीचा इशारा मंगळवारी आ. यशोमती ठाकूर, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, प्रदेश सचिव संजय खोडके, माजी आमदार केवलराम काळे, नरेशचंद्र ठाकरे, झेडपी अध्यक्ष नितीन गोंडाणे, सभापती जयंत देशमुख आदींनी दिला.केंद्रातील शेतकरीविरोधी भाजप सरकारच्या खोट्या आश्वासनांचा निषेध म्हणून जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने मंगळवारी मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांनी तोंडाला आणि हाताला काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे महागले आहे. शेतमालाला भाव नाही. कर्जमाफी ही कागदोपत्रीच झाली. तूर विकली, पण शेतकºयांना पैसे मिळाले नाहीत. पीक विम्याचा लाभही नाही. गोदाम उपलब्ध नसल्याचे सांगत तूर व हरभरा खरेदी रखडली आहे. सर्व शेतमाल खरीप हंगामापूर्वी खरेदी करावा व चुकारे त्वरित मिळावे आदी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्थानिक काँग्रेसचे नेते आत्मदहन करतील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला दिला.दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी तुरीचे चुकारे त्वरित देण्यात येतील, तूर व हरभरा खरेदी पूर्ण केली जाईल, तुरीची उचल करण्यासाठी गोडावून उपलब्ध होतील, बारदाना कमी पडणार नाही अशी ग्वाही दिली. आंदोलनात जि.प. सभापती बळवंत वानखडे, वनिता पाल, सतीश हाडोळे, गिरीश कराळे, श्याम देशमुख, दयाराम काळे, प्रकाश काळबांडे, संजय मार्डीकर, भागवत खांडे, बिट्टू मंगरोळे, बापूराव गायकवाड, प्रवीण घुईखेडकर, मोहन सिंगवी, नितीन दगडकर, हरिभाऊ मोहोड, प्रमोद दाळू, सुरेश आडे, प्रवीण वाघमारे, शिवाजी बंड, सुरेश साबळे, राहुल येवले, बाळासाहेब हिंगणीकर, सुधाकर भारसाकळे, अनंत साबळे, गजानन राठोड, प्रदीप देशमुख, रावसाहेब लंगोटे, भैयासाहेब मेटकर, अभिजित देवके, छाया दंडाळे, अलका देशमुख, अनिता मेश्राम, जयश्री तळोकार आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.शेतकरी हवालदिल झाला -यशोमती ठाकूरअ.भा. काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय सचिव आ. यशोमती ठाकूर म्हणाल्या, एकही आश्वासन या सरकारने पूर्ण केले नाही. यांना गोदाम उपलब्ध करता आले नाहीत. काँग्रेसचे सरकार होते तेव्हा सारेच पैसे मिळत. पण, आता शेतकऱ्यांना घामाचे पैसेही मिळत नाहीत. खरीप जवळ आला असल्याने शेतकरी हवालदिल आहेत. फडणवीस सरकारने चार वर्षांत फक्त योजनांची नावे बदलली. सहकार क्षेत्र बर्बाद करण्याचा या सरकारचा अजेंडा आहे.शेतकऱ्यांसह जनतेची फसवणूक -वीरेंद्र जगतापकेंद्र-राज्यातील मोदी-फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने शेतकºयांची मागील चार वर्षांपासून फसवणूकच केली आहे. शेतकºयांना दिलेल्या आश्वासनांपैकी एकाची पूर्तता केली नाही. कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही. शेतमाल पूर्णपणे खरेदी केला नसताना तूर व हरभरा खरेदी केंद्रे बंद करण्यात आली. शेतमालाचे चुकारेही दिले नाहीत. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जनहितविरोधी व शेतकरीविरोधी या सरकारचे दिवस भरलेत, असे आ. वीरेंद्र जगताप म्हणाले.सरकारला जनताच धडा शिकवेल -बबलू देशमुखजिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख म्हणाले की, या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांना न्याय देण्यात भाजप सरकार अपयशी ठरले. खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना तूर, बोंडअळीच्या नुकसानाचे पैसे देण्यात यावेत. नोटबंदी, जीएसटीमुळे देशाचा आर्थिक विकासदर खालावला. या निर्णयाचा सामान्य नागरिकांना त्रास झाला. चार वर्षांतच हे सरकार अपयशी ठरले. या विश्वासघातकी सरकारला आता जनताच धडा शिकविणार आहे.