शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

मला व्हायचं होतं आर्किटेक्ट पण दादांमुळे झालो वकील - न्या. गवई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:09 IST

Amravati : अमरावती येथे वकील संघाच्या वतीने हृद्य सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावतीःमला वकील व्हायचे नव्हते, व्हायचे होते आर्किटेक्ट परंतु दादासाहेब गवई माझे वडील यांची इच्छा होती की मी वकील व्हावं, ती मी पूर्ण केली. माझ्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव जर कुणाचा असेल तर तो दादांचा. लहानपणापासून त्यांच्यासोबत वावरण्याची संधी मिळाली. त्यामुळे समाजाबद्दल आपली काय संवेदना असावी, हे जवळून बघता आले. त्याची जळणघडणच त्यांच्या सानिध्यात झाली. खरं तर दादांना वडील व्हायचे होते, परंतु त्यांची लॉची परीक्षा असताना ते सत्याग्रहात कारागृहात होते आणि त्यानंतर राजकारणात पूर्णवेळ सेवा देत असल्याने त्यांची ती इच्छा पूर्ण झाली नाही. म्हणून त्यांची इच्छा होती की मी वकील व्हावं. त्यांचा आदेश मी पूर्ण केला आणि मी वकील झालो. पुढे न्यायाधीश झालो, अशी प्रांजळ कबुली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई यांनी दिली. 

संघाच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. पुढे बोलताना सरन्यायाधीश गवई म्हणाले, जनतेच्या अधिकाराचे जतन करण्याची जबाबदारी न्यायपालिकांवर आली आहे. समता, स्वातंत्र, न्याय, बंधुत्वाला बाधा पोहोचणार नाही, याची न्यायनिर्वाळा देताना काळजी घेतली. सामाजिक, आर्थिक समस्येवर तोडगा काढताना काही प्रकरणात राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा वापर केला. कोण काय म्हणेल त्यापेक्षा समाजाला काय हवे? याची जाणीव ठेवून काही प्रकरणे हाताळल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कठोरा मार्गालगतच्या पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल इन्स्टिट्यूट परिसरातील स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित या ह्दयस्पर्शी सत्कार सोहळ्याप्रसंगी मंचावर माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, डॉ. कमलताई गवई, डॉ. तेजस्विनी गवई यांची विशेष उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती प्रवीण पाटील, अमरावती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा हे उपस्थित होते. तर बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य तथा अमरावतीचे पालक सदस्य अॅड. आशिष देशमुख आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा सदस्य तथा अमरावतीचे पालक सदस्य अॅड. पारिजात पांडे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा शाल श्रीफळ, मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

देशाचे संविधान हेच 'सुप्रीम'विधिमंडळ (कायदेमंडळ), कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि माध्यमे ही चार स्तंभ असले तरी देशाचे संविधान हेच 'सुप्रीम" असल्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अधोरेखित केले. कारण न्यायदान हे जॉब नाही तर ते सतीचे वान आहे. न्यायाधीशांना राज्यघटनेला आधारीत न्यायनिर्वाळा द्यावा लागतो. वकिलांना सुद्धा प्रचंड श्रम, मेहनत करावी लागते, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Amravatiअमरावती