शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
3
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
4
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
5
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
6
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
9
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
10
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
11
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
15
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन

मला व्हायचं होतं आर्किटेक्ट पण दादांमुळे झालो वकील - न्या. गवई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:09 IST

Amravati : अमरावती येथे वकील संघाच्या वतीने हृद्य सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावतीःमला वकील व्हायचे नव्हते, व्हायचे होते आर्किटेक्ट परंतु दादासाहेब गवई माझे वडील यांची इच्छा होती की मी वकील व्हावं, ती मी पूर्ण केली. माझ्या जीवनावर सर्वाधिक प्रभाव जर कुणाचा असेल तर तो दादांचा. लहानपणापासून त्यांच्यासोबत वावरण्याची संधी मिळाली. त्यामुळे समाजाबद्दल आपली काय संवेदना असावी, हे जवळून बघता आले. त्याची जळणघडणच त्यांच्या सानिध्यात झाली. खरं तर दादांना वडील व्हायचे होते, परंतु त्यांची लॉची परीक्षा असताना ते सत्याग्रहात कारागृहात होते आणि त्यानंतर राजकारणात पूर्णवेळ सेवा देत असल्याने त्यांची ती इच्छा पूर्ण झाली नाही. म्हणून त्यांची इच्छा होती की मी वकील व्हावं. त्यांचा आदेश मी पूर्ण केला आणि मी वकील झालो. पुढे न्यायाधीश झालो, अशी प्रांजळ कबुली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई यांनी दिली. 

संघाच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. पुढे बोलताना सरन्यायाधीश गवई म्हणाले, जनतेच्या अधिकाराचे जतन करण्याची जबाबदारी न्यायपालिकांवर आली आहे. समता, स्वातंत्र, न्याय, बंधुत्वाला बाधा पोहोचणार नाही, याची न्यायनिर्वाळा देताना काळजी घेतली. सामाजिक, आर्थिक समस्येवर तोडगा काढताना काही प्रकरणात राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत अधिकाराचा वापर केला. कोण काय म्हणेल त्यापेक्षा समाजाला काय हवे? याची जाणीव ठेवून काही प्रकरणे हाताळल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कठोरा मार्गालगतच्या पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल इन्स्टिट्यूट परिसरातील स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित या ह्दयस्पर्शी सत्कार सोहळ्याप्रसंगी मंचावर माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, डॉ. कमलताई गवई, डॉ. तेजस्विनी गवई यांची विशेष उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती प्रवीण पाटील, अमरावती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा हे उपस्थित होते. तर बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य तथा अमरावतीचे पालक सदस्य अॅड. आशिष देशमुख आणि बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा सदस्य तथा अमरावतीचे पालक सदस्य अॅड. पारिजात पांडे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी सरन्यायाधीश भूषण गवई यांचा शाल श्रीफळ, मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

देशाचे संविधान हेच 'सुप्रीम'विधिमंडळ (कायदेमंडळ), कार्यकारी मंडळ, न्यायपालिका आणि माध्यमे ही चार स्तंभ असले तरी देशाचे संविधान हेच 'सुप्रीम" असल्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अधोरेखित केले. कारण न्यायदान हे जॉब नाही तर ते सतीचे वान आहे. न्यायाधीशांना राज्यघटनेला आधारीत न्यायनिर्वाळा द्यावा लागतो. वकिलांना सुद्धा प्रचंड श्रम, मेहनत करावी लागते, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Amravatiअमरावती