शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

मेरे पास सिर्फ माँ है!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:11 IST

अमरावती: कोरोनामुळे आईवडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवली जाईल, तसेच बालक ...

अमरावती: कोरोनामुळे आईवडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवली जाईल, तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा बालसंगोपन योजनेतून खर्च उचलण्यात येईल, असा निर्णय राज्य मंत्रीमंडळाने घेतला. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.

ही योजना वा निर्णय दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी आहे. मात्र, ज्यांनी केवळ वडील गमावले, त्या पाल्यांची , त्या कुटुंबाचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्ता ‘बापमाणूस’ गमावल्याने ६२ बालकांवर ‘मेरे पास सिर्फ माँ है’ अशी उद्वीग्न करणारी परिस्थिती येऊन ठेपली आहे. आजही अनेक शेतकरी, शेतमजुर व खासगी काम करणाºया कुटुंबाचा कर्ता पुरूषच आहे. त्यामुळे पितृछत्र गमावलेल्या आमच्या कुटुंबाकडे सरकार लक्ष देईल का, की आमच्या मातेलाच हाडाची काडे करून आमची उपजिविका भागवावी लागेल, अशी सामुहिक आर्जव ते शासन प्रशासनाकडे करीत आहेत. कोरोनाने एक पालक गमावलेल्या बालकांची राज्यातील संख्या ५०९६ च्या घरात आहे. यामध्ये पितृछत्र हरवलेल्या मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे केवळ

------------

बॉक्स

जिल्ह्यात क ोरोनाचे एकूण रूग्ण : ९३, १६८

बरे झालेले रूग्ण : ८७, ६४०

सध्या उपचार सुरू असलेले: १२७२

एकूण मृत्यू : १४७७

------------

सात जणांनी आईवडिलांचे छत्र गमावले

कोरोनाच्या दुसºया लाटेत सर्वाधिक मृत्यू झाले. तर आतापर्यंत सात बालक आईवडिलांच्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूने अनाथ झालेत.जिल्ह्यात ६२ बालकांनी पितृछत्र गमावले. तर १६ बालक ंंआईविना पोरके झाले.

---------------

बॉक्स १

शेतमजुरीशिवाय काहीच नाही

वडिल कोरोनामुळे गेले. संपुर्ण कुटुंबाची भिस्त बाबांवर, ते कामावर गेले, तर चुल पेटणार. पण कोरोनाने आमचे जगच हरविले. आता आईसह आम्हालाही शेतमजुरी करण्याशिवाय पर्याय नाही. लॉकडाऊनमुळे शेतमजुरीलाही मर्यादा आल्या. त्यामुळे आता पित्याविना सर्व जबाबदारी आईवर आली. सरकारने आम्हालाही मदत करावी, अशी प्रतिक्रिया कोरोणामुळे पिता गमावलेल्या बालकाने दिली.

----------

आभाळच फाटले, कुठे शिवायचे?

माझे आईवडील एकाचवेळी कोरोनाबाधित झाले. दोघांवर एकाचवेळी उपचार सुरू असताना वडिलांचे निधन झाले. घरी मी एकटाच. वडील गेल्याचे आईला डिस्चार्जनंतर सांगितले. पित्याच्या अकाली निधनाने आभाळच फाटले. मात्र, काय जगावेच तर, लागणारच. आईला घेऊन झगडतो आहे, जगतो आहे. शासन प्रशासनाने मदत केली. तर उत्तमच. जगणे सुकर होईल, अशा आशावाद एका बालकाने व्यक्त केला.

---------

आता कुटुंबासोबत शेती

पितृछत्र हरपल्याने आता आईसोबत घरी असलेली अत्यल्प शेती करण्याशिवाय पर्याय नाही. शिकण्याच्या वयात आता आईला, घराला आधार देण्याची बिकट स्थिती येऊन ठेपली आहे. काही ंसामाजिक संघटनांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. ते केव्हा पुर्ण ैहोईलल माहित नाही, पण सध्या दोन वेळच्या जेवनाची सोय शेती कसूनच होईल. सरकारने आम्हा बाप गमावलेल्यांनाही मदत करावी.

--