शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

तिवसा तालुक्यात गारपिटीसह चक्रीवादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:28 IST

शहरासह तालुक्यात रविवारी रात्री सुसाट चक्रीवादळ, विजेच्या कडकडाटासह गारपीट व वादळी पावसाने कहर केला. नागरिकांना व शेतकऱ्यांसाठी रविवारची रात्र कर्दनकाळ ठरली.

ठळक मुद्देशेकडो घरांची टिनपत्रे उडाली : संत्रा, पपईची झाडे जमीनदोस्त

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : शहरासह तालुक्यात रविवारी रात्री सुसाट चक्रीवादळ, विजेच्या कडकडाटासह गारपीट व वादळी पावसाने कहर केला. नागरिकांना व शेतकऱ्यांसाठी रविवारची रात्र कर्दनकाळ ठरली.तिवस्यासह तालुक्यातील ७० च्यावर वीज खांब वादळाने जमीनदोस्त झाले. यामुळे तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला, तर अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील तीन मोठे वीज खांब पडले. टिनाचे खोके महामार्गावर व झाडे जमीनदोस्त झाल्याने तासभर वाहतूक ठप्प झाली. तालुक्यातील सातरगाव व इतर गावात पपई व संत्राझाडे तुटून पडल्याने नागरिकांसह शेतकºयांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने तालुक्यात कोठेही जीवितहानी झाली नाही.स्थानिक पंचवटी चौकातील झाड एका म्हशीच्या अंगावर पडल्याने म्हैस जागीच ठार झाली. सातरगाव येथील दामोदरआप्पा विजापुरे यांचे एकरभर शेतातील पपईचे पीक जमीनदोस्त झाल्याने त्यांचे एका लाखांवर नुकसान झाले, तर सातरगाव मौजा येथील रवींद्र देशमुख, वैभव वानखडे, श्रीरामदादा देशमुख, भूषण देशमुख, अच्युत वानखडे यांची संत्राबाग वादळी वारा व पावसाने नेस्तनाबूत झाली. आंबिया बहराची फळे गळाली, तालुक्यातील ममदापूर, मोझरी, वणी, गुरुकुंज मोझरी, शिरजगाव मोझरी, शेंदूरजना बाजार, भिवापूर, कारला, कुºहासह अनेक गावांत मोठ मोठे वृक्ष जमीनदोस्त झालीत, तर अनेक घरांवरील टिनपत्रे उडून घरांची पडझड झाल्याने शेकडो संसार उघड्यावर आली आहेत. शेतकºयांसह नागरिकांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.रात्र जागून युवक काँग्रेसचे मदतकार्यमहामार्गावरील पंचवटी चौकात टिनपत्र्याची खोके, झाडे रस्त्यावर आले होते, तर वीज खांब खाली पडले होते महामार्ग ठप्प झाला असताना नगरपंचायतीचे अध्यक्ष वैभव वानखडे, नगरसेवक नरेंद विघ्ने, सचिन गोरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर राऊत, किसन मुंदाने, रोशन वानखडे, अजय शिरभाते, संजय दापूरकर, सुशील खाकसेसह आदी कार्यकर्त्यांनी मदत कार्य केले. वैभव वानखडे यांनी प्रशासनाला माहिती देऊन आयआरबीसोबत संपर्क करून महामार्ग मोकळा करवून घेतला. यावेळी नगरपंचायत अध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी अख्खी रात्र जागून काढत नुकसानाची पाहणी केली.तिवसा पोलीसही धावले मदतीलाशहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. सर्वत्र काळोख पसरल्याने जीवितहानी होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक सतीश जाधव हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी भर पावसात मदतकार्य सुरू केले.जिवंत वीज तारेवर झाडे तुटून पडले होते. तर तालुक्यातील ७० वीज खांब जमीनदोस्त झाल्याने रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे तिवसा शहरासह तालुक्यातील नागरिकांनी अंधारात काढली. अद्यापही वीजपुरवठा पूर्ववत झालेला नसून, तिवसा वीज वितरण कंपनी त्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेततिवसा सातरगाव व तिवसा चांदूर रेल्वे राज्य मार्गावर वृक्ष रस्त्यावर पडल्याने अपघाताची शक्यता बळावली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत आहे. रस्त्यावरील झाडे बाजूला न केल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अखेर वाहनचालक व नागरिकांनी वृक्ष बाजूला केले.मोठ्या प्रमाणात विजेच्या कडकडासह मुसळधार पाऊस, त्यात सुसाट वादळी वारा, घरावरील टिनपत्रे उडाली. झाडे उन्मळून पडली होती. पण, तालुक्यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही.