शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

किती रे छळशील मेघराजा...!

By admin | Updated: July 13, 2015 00:26 IST

रोहिणी, मृग व आर्द्रा व पावसाचे तीनही नक्षत्र कोरडे गेलेत. किती दिवसांपासून आम्ही प्रतीक्षेत आहोत. आस लावून बसलो आहोत.

गजानन मोहोड अमरावतीरोहिणी, मृग व आर्द्रा व पावसाचे तीनही नक्षत्र कोरडे गेलेत. किती दिवसांपासून आम्ही प्रतीक्षेत आहोत. आस लावून बसलो आहोत. कधी तू शिरकावा देतो की पुन्हा गायब होतो? किती छळशील रे मेघराजा असा आर्जव बळीराजाने केले आहे.जिल्ह्यात ७७ टक्के खरिपाची पेरणी झाली आहे. तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली. पहिल्या टप्प्यात पेरणी झालेल्या पिकांची रोपे माना टाकत आहे. नंतरची पेरणी झालेले बियाण्यांचे अंकूर आद्रतेअभावी करपत आहे. पेरणी आटपून शेतकरी, वारकरी हे विठूरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात, पांडुरंगाला समृद्धीचे साकडे घालतात. वारी करून आल्यावर पीक हे चांगलेच वर आलेले आहे तेव्हा उवरणी, निंदन आदी सोपस्कार आटोपतात परंतु यंदा मात्र उलटेच आहे. वारकरी यंदा माऊलीकडे पेरणीयोग्य पाऊस पडावा म्हणून साकडे घालण्यासाठी वारी करीत आहे. ‘नको पांडुरंगा मला सोन्या-चांदीचे दान रे।भिजव पांडुरंगा तहानलेले रान रे।।या भजनासह टाळ-मृदंगाच्या साथीने माऊलीच्या नामघोषात तल्लीन होऊन पांडूरंगाच्या दर्शनासाठी हजारो मैलाची पायपीट करत शेतकरी वारकरी पंढरीच्या वाटेने आहेत. पीककर्जाची गती मंद, पुनर्गठनही रखडलेअमरावती : माऊलीच्या दर्शनाची आस असलेला प्रत्येक शेतकरी, वारकरी पावसासाठी माऊलीला आर्जव करीत आहेत. जिल्ह्यात साधारणपणे २० ते २५ जूनदरम्यान खरिपाची पूर्ण पेरणी व्हायला पाहिजे. मात्र त्यानंतरही दोन आठवडे उलटून गेलेत. जेमतेम ७६ टक्के पेरणी झाली आहे. २३ जूननंतर पावसाची प्रदीर्घ दडी आहे. बळीराजा पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे. दुष्काळी स्थितीमुळे सन २०१४-१५ पीक कर्जाचे ५ वर्षांमध्ये रुपांतरण व नव्याने पीककर्जाचे आदेश शासनाने दिले. मात्र जिल्हा बँकेसह राष्ट्रीयीकृत बँका व ग्रामीण बँकांनी अजूनही ५० टक्क्यांवर शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केलेले नाही व पीक कर्जाचा टक्का देखील ६० टक्यांवर वाढला नसल्याची शोकांतिका आहे.