शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

रोटाव्हेटर फिरविलेल्या कपाशीचे पंचनामे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 22:35 IST

गुलाबी बोंडअळीने उद्ध्वस्त झालेल्या कपाशीचे सर्वेक्षण सध्या जिल्ह्यात सुरू आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या उभ्या पिकांत नांगर फिरविल्याने पंचनामे व सर्वेक्षण करताना ‘जीपीएस इनबिल्ट’ फोटो कसा देणार, हा प्रश्न पडला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा सवाल : यंत्रणा कसा देणार जीपीएस इनबिल्ट फोटो ?

आॅनलाईन लोकमतअमरावती : गुलाबी बोंडअळीने उद्ध्वस्त झालेल्या कपाशीचे सर्वेक्षण सध्या जिल्ह्यात सुरू आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या उभ्या पिकांत नांगर फिरविल्याने पंचनामे व सर्वेक्षण करताना ‘जीपीएस इनबिल्ट’ फोटो कसा देणार, हा प्रश्न पडला आहे.जिल्ह्यात कपाशीचे २ लाख १० हजार हेक्टर क्षेत्र आहे. पैकी ५० टक्के क्षेत्रातील कपाशी गुलाबी बोंडअळीने बाधित झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल आहे. या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीची मदत मिळावी, यासाठी बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाचे उपसचिव सू. ह. उमराणीकर यांनी ७ डिसेंबरला दिले. याच अनुषंगाने विभागीय आयुक्त पीयूश सिंग, जिल्हाधिकारी अभिजित बांगर व कृषी सहसंचालक यांनी यंत्रणेला संयुक्त सर्वेक्षणाचे आदेश दिले. अधीक्षक कृषी अधिकाºयांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन सर्वेक्षण व बाधित क्षेत्राचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्यात. त्या अनुषंगाने कृषी विभागाने बाधित १ लाख ४ हेक्टराचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकाºयांना सादर केला. हा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. मात्र पंचनामे करताना ज्या शेतकऱ्यांनी बाधित कपाशीच्या उभ्या पिकात रोटाव्हेटर फिरविला त्या शेतातील कपाशीचे ‘जीपीएस इनबिल्ट’ फोटो कसे द्यावेत, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र कोठल्याही स्थितीत शेतकरी वंचित राहू नये, अशा सूचना विभागीय कृषी सहसंचालकांनी दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला- तर ही पद्धत वापरा, जेडीऐंचे निर्देशप्रमुख पीक असणारी कपाशी यंदा बोंड अळीने बाधित झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आला, यासाठी केंद्राच्या ‘एनडीआरएफ’ची नैसगीक आपत्तीसाठी मदत मिळू शकणार असल्याने, या मदतीसाठी एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी वास्तवदर्शी पंचनामे करण्याचे निर्देश विभागीय कृषी सहसंचालकांनी दिले आहेत. ज्या शेतात कपाशीवर नांगर फिरविला. त्या शेतात कपाशीचे अवशेष आहेत. सात-बाºयावर नोंद आहे व लगतच्या शेतकऱ्याला या शेतात कपाशी होती याची माहीती आहे, त्यांचेकडूनही माहीती घ्या. असे निदेश त्यांनी पंचनामा करणाºया यंत्रनेला दिले आहेत.प्राथमिक अंदाजानुसार ४९ टक्के बाधित क्षेत्रकृषी विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात बोंड अळीच्या प्रादुर्भावाने एक लाख तीन हजार ८०१ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. ही ४९ टक्केवारी आहे. हे क्षेत्र ३३ टक्कयांवर असल्याने नैसगीक आपत्तीची मदत मिळू शकते,जिल्ह्यात प्रति हेक्टरी ८४९ किलोग्रॅम उत्पादन कमी होणार आहे. ही ५१ टक्केवारी असल्याचे कृषी विभागाच्या अहवालाद नमुद आहे. विधीमंडळातही हा प्रश्न विशेषत्वाने चर्च्चिल्या जात आहे. शासनानेही केंद्राकडून मदत मागण्याचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे सभागृहाला सांगीतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.बोंड अळीने कपाशी बाधित झालेले क्षेत्र सुटू नये, वास्तवदर्शी पंचनामे करावेत, जिथे कपाशीवर रोटाव्हेटर फिरविले तिथेही पिकाचे अवशेष, लगतच्या शेतकºयांकडून माहीती, सात-बाºयावरील नोंद घ्यावी,एकही शेतकरी यामध्ये वंचित राहू नये असे निर्देश दिलेत.- सुभाष नागरेविभागीय कृषी सहसंचालक