शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

रोटाव्हेटर फिरविलेल्या कपाशीचे पंचनामे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 22:35 IST

गुलाबी बोंडअळीने उद्ध्वस्त झालेल्या कपाशीचे सर्वेक्षण सध्या जिल्ह्यात सुरू आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या उभ्या पिकांत नांगर फिरविल्याने पंचनामे व सर्वेक्षण करताना ‘जीपीएस इनबिल्ट’ फोटो कसा देणार, हा प्रश्न पडला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा सवाल : यंत्रणा कसा देणार जीपीएस इनबिल्ट फोटो ?

आॅनलाईन लोकमतअमरावती : गुलाबी बोंडअळीने उद्ध्वस्त झालेल्या कपाशीचे सर्वेक्षण सध्या जिल्ह्यात सुरू आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांनी कपाशीच्या उभ्या पिकांत नांगर फिरविल्याने पंचनामे व सर्वेक्षण करताना ‘जीपीएस इनबिल्ट’ फोटो कसा देणार, हा प्रश्न पडला आहे.जिल्ह्यात कपाशीचे २ लाख १० हजार हेक्टर क्षेत्र आहे. पैकी ५० टक्के क्षेत्रातील कपाशी गुलाबी बोंडअळीने बाधित झाल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल आहे. या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीची मदत मिळावी, यासाठी बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाचे उपसचिव सू. ह. उमराणीकर यांनी ७ डिसेंबरला दिले. याच अनुषंगाने विभागीय आयुक्त पीयूश सिंग, जिल्हाधिकारी अभिजित बांगर व कृषी सहसंचालक यांनी यंत्रणेला संयुक्त सर्वेक्षणाचे आदेश दिले. अधीक्षक कृषी अधिकाºयांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन सर्वेक्षण व बाधित क्षेत्राचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्यात. त्या अनुषंगाने कृषी विभागाने बाधित १ लाख ४ हेक्टराचा प्राथमिक अंदाज जिल्हाधिकाºयांना सादर केला. हा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. मात्र पंचनामे करताना ज्या शेतकऱ्यांनी बाधित कपाशीच्या उभ्या पिकात रोटाव्हेटर फिरविला त्या शेतातील कपाशीचे ‘जीपीएस इनबिल्ट’ फोटो कसे द्यावेत, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र कोठल्याही स्थितीत शेतकरी वंचित राहू नये, अशा सूचना विभागीय कृषी सहसंचालकांनी दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला- तर ही पद्धत वापरा, जेडीऐंचे निर्देशप्रमुख पीक असणारी कपाशी यंदा बोंड अळीने बाधित झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आला, यासाठी केंद्राच्या ‘एनडीआरएफ’ची नैसगीक आपत्तीसाठी मदत मिळू शकणार असल्याने, या मदतीसाठी एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी वास्तवदर्शी पंचनामे करण्याचे निर्देश विभागीय कृषी सहसंचालकांनी दिले आहेत. ज्या शेतात कपाशीवर नांगर फिरविला. त्या शेतात कपाशीचे अवशेष आहेत. सात-बाºयावर नोंद आहे व लगतच्या शेतकऱ्याला या शेतात कपाशी होती याची माहीती आहे, त्यांचेकडूनही माहीती घ्या. असे निदेश त्यांनी पंचनामा करणाºया यंत्रनेला दिले आहेत.प्राथमिक अंदाजानुसार ४९ टक्के बाधित क्षेत्रकृषी विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात बोंड अळीच्या प्रादुर्भावाने एक लाख तीन हजार ८०१ हेक्टर क्षेत्र बाधित आहे. ही ४९ टक्केवारी आहे. हे क्षेत्र ३३ टक्कयांवर असल्याने नैसगीक आपत्तीची मदत मिळू शकते,जिल्ह्यात प्रति हेक्टरी ८४९ किलोग्रॅम उत्पादन कमी होणार आहे. ही ५१ टक्केवारी असल्याचे कृषी विभागाच्या अहवालाद नमुद आहे. विधीमंडळातही हा प्रश्न विशेषत्वाने चर्च्चिल्या जात आहे. शासनानेही केंद्राकडून मदत मागण्याचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे सभागृहाला सांगीतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.बोंड अळीने कपाशी बाधित झालेले क्षेत्र सुटू नये, वास्तवदर्शी पंचनामे करावेत, जिथे कपाशीवर रोटाव्हेटर फिरविले तिथेही पिकाचे अवशेष, लगतच्या शेतकºयांकडून माहीती, सात-बाºयावरील नोंद घ्यावी,एकही शेतकरी यामध्ये वंचित राहू नये असे निर्देश दिलेत.- सुभाष नागरेविभागीय कृषी सहसंचालक