शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

शेतकऱ्यांनाही क्रेडिट कार्ड तुम्ही अर्ज कसा कराल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2022 05:00 IST

शेतकऱ्यांनी त्यांच्या सोईच्या बँकेकडे अर्ज केला की, त्यांना कर्ज मंजूर होते व त्या बँकेद्वारे त्यांना क्रेडिट कार्ड दिले जाते. या कार्डाच्या आधारे शेतकरी कधीही पैसे काढू शकतात व खात्यात भरणादेखील करू शकतात. जिल्हा बँकेसह सर्वच बँका शेतकऱ्यांना कर्ज देतात. क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी शेतकरी हा संबंधित बँकेचा खातेदार असणे व पीएम किसान योजनेचा लाभार्थी असणे आवश्यक आहे. या शेतकऱ्यांनी या बँकांकडील कर्ज घेतले, तर त्यांना आवश्यकता व गरजेनुसार पैसे काढण्याची सुविधा मिळते.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना आता क्रेडिट कार्ड दिले जात आहे. याद्वारे बँकांनी मंजूर केलेल्या कर्जातील पैसे गरजेनुसार काढण्याची सोय झालेली आहे. यासाठी त्यांना संबंधित बँकेकडे अर्ज सादर करावा लागणार आहे.जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे ३,३८,३०९ शेतकरी लाभार्थी आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाकाठी सहा हजार रुपये जमा केले जातात. या अर्थसाहाय्यामुळे शेतकऱ्यांची बँकेत पत निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या सोईच्या बँकेकडे अर्ज केला की, त्यांना कर्ज मंजूर होते व त्या बँकेद्वारे त्यांना क्रेडिट कार्ड दिले जाते. या कार्डाच्या आधारे शेतकरी कधीही पैसे काढू शकतात व खात्यात भरणादेखील करू शकतात. जिल्हा बँकेसह सर्वच बँका शेतकऱ्यांना कर्ज देतात. क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी शेतकरी हा संबंधित बँकेचा खातेदार असणे व पीएम किसान योजनेचा लाभार्थी असणे आवश्यक आहे. या शेतकऱ्यांनी या बँकांकडील कर्ज घेतले, तर त्यांना आवश्यकता व गरजेनुसार पैसे काढण्याची सुविधा मिळते.

पीएम किसान सन्मान योजनेचे ३.३८ लाख लाभार्थी- योजनेसाठी जिल्ह्यातील ३,३८,३०९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे व पहिला हप्ता ३,२६,७५३ शेतकऱ्यांना मिळाला.- योजनेसाठी आता ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. मात्र, विहित मुदतीत ८९ हजार लाभार्थींनी ही प्रक्रिया केलेली नाही.

क्रेडिट कार्डचा लाभ काय?किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना पशुधन व मत्स्य व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध केले जाते. याशिवाय शेतकरी त्यांच्या गरजेनुसार बँक खात्यातून रक्कम काढू शकतात.

काय कागदपत्रे लागतातक्रेडिट कार्डसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, पासपोर्ट पोटो, पॅन कार्ड आदी कागदपत्रे जोडून संबंधित बँकेकडे अर्ज करावा लागतो व त्यानंतर पोस्टाद्वारे कार्ड घरी पाठविण्यात येते.

७० टक्के शेतकऱ्यांना मिळाले कार्डपंतप्रधान किसान योजनेतील ७० टक्के लाभार्थींना किसान क्रेडिट कार्ड मिळाले आहे. मात्र, सर्वच शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता शेतकऱ्यांनी संबंधित बँकेकडे अर्ज करणे महत्त्वाचे आहे.

बँकेकडे करा अर्जकिसान क्रेडिट कार्डसाठी शेतकऱ्यांना योजनेची रक्कम जमा होणाऱ्या  बँकेकडे अर्ज करावा लागणार आहे. यासाठी त्यांना आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात व त्यानंतर  बँकेद्वारा क्रेडिट कार्ड दिले जाते.

जिल्हा बँकेला या अनुषंगाने सूचना दिल्या आहेत. अद्याप २४ हजार लाभार्थींजवळ कार्ड नाही. यासाठी त्यांना संबंधित कागदपत्रासह अर्ज करावा लागेल.- राजेश लव्हेकर, जिल्हा उपनिबंधक

 

टॅग्स :FarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना