शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

शेतकऱ्यांनाही क्रेडिट कार्ड तुम्ही अर्ज कसा कराल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2022 05:00 IST

शेतकऱ्यांनी त्यांच्या सोईच्या बँकेकडे अर्ज केला की, त्यांना कर्ज मंजूर होते व त्या बँकेद्वारे त्यांना क्रेडिट कार्ड दिले जाते. या कार्डाच्या आधारे शेतकरी कधीही पैसे काढू शकतात व खात्यात भरणादेखील करू शकतात. जिल्हा बँकेसह सर्वच बँका शेतकऱ्यांना कर्ज देतात. क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी शेतकरी हा संबंधित बँकेचा खातेदार असणे व पीएम किसान योजनेचा लाभार्थी असणे आवश्यक आहे. या शेतकऱ्यांनी या बँकांकडील कर्ज घेतले, तर त्यांना आवश्यकता व गरजेनुसार पैसे काढण्याची सुविधा मिळते.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना आता क्रेडिट कार्ड दिले जात आहे. याद्वारे बँकांनी मंजूर केलेल्या कर्जातील पैसे गरजेनुसार काढण्याची सोय झालेली आहे. यासाठी त्यांना संबंधित बँकेकडे अर्ज सादर करावा लागणार आहे.जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे ३,३८,३०९ शेतकरी लाभार्थी आहेत. या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाकाठी सहा हजार रुपये जमा केले जातात. या अर्थसाहाय्यामुळे शेतकऱ्यांची बँकेत पत निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या सोईच्या बँकेकडे अर्ज केला की, त्यांना कर्ज मंजूर होते व त्या बँकेद्वारे त्यांना क्रेडिट कार्ड दिले जाते. या कार्डाच्या आधारे शेतकरी कधीही पैसे काढू शकतात व खात्यात भरणादेखील करू शकतात. जिल्हा बँकेसह सर्वच बँका शेतकऱ्यांना कर्ज देतात. क्रेडिट कार्ड मिळण्यासाठी शेतकरी हा संबंधित बँकेचा खातेदार असणे व पीएम किसान योजनेचा लाभार्थी असणे आवश्यक आहे. या शेतकऱ्यांनी या बँकांकडील कर्ज घेतले, तर त्यांना आवश्यकता व गरजेनुसार पैसे काढण्याची सुविधा मिळते.

पीएम किसान सन्मान योजनेचे ३.३८ लाख लाभार्थी- योजनेसाठी जिल्ह्यातील ३,३८,३०९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे व पहिला हप्ता ३,२६,७५३ शेतकऱ्यांना मिळाला.- योजनेसाठी आता ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. मात्र, विहित मुदतीत ८९ हजार लाभार्थींनी ही प्रक्रिया केलेली नाही.

क्रेडिट कार्डचा लाभ काय?किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना पशुधन व मत्स्य व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध केले जाते. याशिवाय शेतकरी त्यांच्या गरजेनुसार बँक खात्यातून रक्कम काढू शकतात.

काय कागदपत्रे लागतातक्रेडिट कार्डसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, पासपोर्ट पोटो, पॅन कार्ड आदी कागदपत्रे जोडून संबंधित बँकेकडे अर्ज करावा लागतो व त्यानंतर पोस्टाद्वारे कार्ड घरी पाठविण्यात येते.

७० टक्के शेतकऱ्यांना मिळाले कार्डपंतप्रधान किसान योजनेतील ७० टक्के लाभार्थींना किसान क्रेडिट कार्ड मिळाले आहे. मात्र, सर्वच शेतकऱ्यांना ही सुविधा उपलब्ध व्हावी, याकरिता शेतकऱ्यांनी संबंधित बँकेकडे अर्ज करणे महत्त्वाचे आहे.

बँकेकडे करा अर्जकिसान क्रेडिट कार्डसाठी शेतकऱ्यांना योजनेची रक्कम जमा होणाऱ्या  बँकेकडे अर्ज करावा लागणार आहे. यासाठी त्यांना आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात व त्यानंतर  बँकेद्वारा क्रेडिट कार्ड दिले जाते.

जिल्हा बँकेला या अनुषंगाने सूचना दिल्या आहेत. अद्याप २४ हजार लाभार्थींजवळ कार्ड नाही. यासाठी त्यांना संबंधित कागदपत्रासह अर्ज करावा लागेल.- राजेश लव्हेकर, जिल्हा उपनिबंधक

 

टॅग्स :FarmerशेतकरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना