शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

ई-पीक नोंद झाल्यानंतर नाव यादीतून गायब होतेच कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 11:49 IST

शेतकऱ्यांचा सवाल : सात-बारा नोंदी ग्राह्य धरण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : गतवर्षीच्या खरीप हंगामात मुदतीत ई-पीक पाहणी केली. पिकांची सातबाऱ्यावर नोंददेखील आहे; मात्र जमाबंदी विभागाद्वारा कृषी विभागाला प्राप्त यादीमध्ये नाव नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे सात बाऱ्यावरील पिकांची नोंद ग्राह्य धरून संबंधित शेतकऱ्याला कपाशी व सोयाबीनसाठी शासन मदत देण्याची मागणी होत आहे.

राज्य शासनाने २९ जुलैच्या जीआरनुसार गतवर्षी ई-पीक पाहणीवर नोंद केलेल्या सोयाबीन व कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर मर्यादेत हेक्टरी पाच हजारांची मदत देण्यात येणार आहे. यासाठी राज्याच्या जमाबंदी विभागाने गतवर्षीच्या खरीप हंगामात ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांच्या पीकनिहाय याद्या कृषी विभागाला पुरविल्या वः या याद्या आता ग्रामपंचायतीमध्ये लावण्यात आलेल्या आहेत. यात काही शेतकऱ्यांची नावे गायब असल्याचे निदर्शनास आले.

प्रत्यक्षात शेतात जाऊन जमाबंदी विभागाचे मोबाइल अॅपद्वारे संबंधित पिकाचा ऑनलाइन पेरा नोंदविला होता. आता जमाबंदी विभागाकडून याद्या प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये नाव नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

कृषी विभागाला अधिकार नाहीत शासनादेशात शेतकऱ्यांचे नाव समाविष्ट करण्याची कोणतीही तरतूद सध्या नाही. त्यामुळे जमाबंदी विभागाद्वारा प्राप्त याद्यांमधील शेतकऱ्यांची कागदपत्रे कृषी सहायकांमार्फत जमा करण्यात येऊन या माहितीची डेटा एंट्री करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑनलाइन पीकपेरा नोंदविल्यानंतर यादीत नाव नसल्याने शेतकऱ्यांनी कुणाकडे दाद मागावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीAmravatiअमरावती