शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

उतरत्या वयात कसे व्हायचे ‘स्मार्ट’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:48 IST

आतापर्यंत न हाताळलेला मोबाइल घेऊन रांगेत उभे राहायचे. सकाळी ७ पासून रांग लागत असल्याने किती वेळ थांबावे लागेल पत्ता नाही. आपला नंबर आला की कागदपत्रे द्यायची.

ठळक मुद्देटेबल एक अन् लाभार्थी शंभर : शासनाच्या बडग्यामुळे असुविधा वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आतापर्यंत न हाताळलेला मोबाइल घेऊन रांगेत उभे राहायचे. सकाळी ७ पासून रांग लागत असल्याने किती वेळ थांबावे लागेल पत्ता नाही. आपला नंबर आला की कागदपत्रे द्यायची. एकच टेबल असल्यामुळे रांगेत तिष्ठत बसण्यापासून सुटका नाही आणि काही चुकलेच, तर दुसऱ्या दिवशी पुन्हा हजर व्हावे लागते. ६५ वर्षांवरील नागरिकांची ज्येष्ठ नागरिक प्रवास सवलत पास अर्थात स्मार्ट कार्ड मिळविण्यासाठी अमरावतीच्या मध्यवर्ती आगारात होत असलेली आबाळ दुर्दैवी आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे, अशी मागणी सोमवारी रांगेत लागलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी केली.‘लोकमत’ची चमू सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता आगाराच्या पास वितरण विभागात दाखल झाली, त्यावेळी अमरावतीसह टाकरखेडा संभू, साऊर, रामा, आसरा, भातकुली, देवरा देवरी, पोहरा, जळका शहापूर, माहुली आदी भागातून आलेले सुमारे शंभरावर ज्येष्ठ नागरिक रांगेत लागले होते. एक-एक क्रमांक सरकायला किमान २० मिनिटे ते अर्धा तास लागत असल्याचे पाहून त्यांचे धैर्य सुटले होते. काही जण सकाळी ७ च्या एसटीने आले होते, तर काही जणांनी त्यासाठी अमरावतीत मुक्काम केला होता. दुपारी पाऊण वाजेपर्यंत म्हणजे पाच तासांनंतरही अवघ्या ३० व्यक्तींची कागदपत्रे घेण्यात आले होते. दरम्यान, रमेश अंबुलकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना मोबाइलचा एसएमएस डेटा डिलीट करण्याच्या सूचना दिल्या. हे काय नवीन, असे वृद्धांना होऊन गेले. अखेरीस पास काढण्यासाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी त्यांना मदत केली.अशी आहे प्रक्रिया५ मार्च २०१९ पासून स्मार्ट कार्डसाठी कागदपत्रे घेण्यास सुरूवात झाली. शासनाने सांगितलेली आधार कार्ड, इलेक्शन कार्ड व मोबाइल घेऊन रांगेत उभे राहायचे. याआधारे संगणकात नोंदणी झाल्यानंतर ओटीपी क्रमांक मिळतो. त्या क्रमांकाची नोंद झाली, की प्रक्रिया पूर्ण. त्यानंतर पोस्टाने घरपोच स्मार्ट कार्ड मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.मुदतवाढीचा कुणालाच नाही पत्तामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ५ जुलै रोजी तातडीचे पत्र काढून ३१ डिसेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात मुदतवाढ दिली आहे. तथापि, याबाबत भिंतीवरील पत्रकाशिवाय कुठेच जनजागृती करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांची दररोज गर्दी होत आहे. याबाबत विविध माध्यमांद्वारे प्रसाराची गरज आहे.नवीन मोबाईलच आणलाआसरा येथील राजाराम डोंगरे हे रविवारी स्मार्ट कार्डसंबंधी दस्तावेज देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्याकडील मोबाइल कुणाचा, अशी विचारणा झाली, तसेच रांगेत असलेल्याच्या मालकीचा मोबाइल असायला हवा, असे सांगण्यात आले. परिणामी नवाकोरा मोबाइल विकत घेऊन ते सोमवारी रांगेत दाखल झाले.एकच टेबलज्येष्ठ नागरिकांची स्मार्ट कार्डसंबंधी कागदपत्रांसाठी रोज मोठी रांग लागत असून, कागदपत्रे स्वीकारण्यासाठी एकच टेबल दिल्याची तक्रार टाकरखेडा मोरे येथील ओंकार मोरे यांनी केली. आसार येथील प्रमोद देशमुख यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली. तथापि, शासनाकडून तसे निर्देश असून, टेबल वाढविण्यास आम्ही असमर्थ असल्याचे वाहतूक नियंत्रक जयंत मुळे म्हणाले.दोन स्नॅपनंतर फिरायला लागला पंखामध्यवर्ती बस स्थानकात पास वितरण खिडकीकडून अनेक वर्षांपासून फलक लागलेले असल्याने बाहेरची हवी फार कमी आत येते. उकाड्यामुळे अंग चिकट झालेल्या वयोवृद्धांनी पंखा लावण्यासाठी आधीच विनवणी केली होती. मात्र, ‘लोकमत’च्या कॅमेºयाचे स्नॅप पडण्यापूर्वी त्यांच्या विनंतीला मान मिळाला नाही. दोन स्नॅपनंतर मात्र पंखा फिरायला लागला.आजी-आजोबा त्रस्तबीबीजान (टाकरखेडा संभू), निर्मला चेंडकापुरे, रमाबाई चव्हाण, शे. हसन शे. महबूब (अमरावती), शंकरराव नांदणे, सरूबाई नांदणे (देवरा), यशोदा दहाट, सुमन टवरे, (जळका शहापूर), इंदूबाई सोनटक्के (यावली), श्रीराम गायकवाड, पुनाबाई गायकवाड (साऊर), पंचफुला सोनोने (पोहरा)येथून आलेले बहुतांश ज्येष्ठ नागरिक रांगेत त्रस्त झाले होते.प्रिंटर बंद पडल्याने प्रक्रिया खोळंबली. एरवी पाच-सात मिनिटांत एक अर्ज घेतला जातो. मात्र, काही जण मोबाइलऐवजी चिठ्ठी घेऊन येतात. त्यांचा नंबर कुठून घ्यावा? एक ते दीड सेकंदच ओटीपी अस्तित्वात राहतो. स्मार्ट कार्डसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अवधी आहे.- रमेश अंबुलकर,वाहतूक नियंत्रक