शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

घर कोसळले, मात्र मोबाईलच्या अलार्मने वाचवले कुटुंबाला; मध्यरात्रीची थरारक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2022 12:43 IST

दोन ते तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे त्यांच्या घराची भिंत जीर्ण झाली होती.

चांदूर रेल्वे (अमरावती) : चुकीने लागलेला मोबाईलचा अलार्म मध्यरात्री दीड वाजता वाजला अन् कुटुंबातील एक पाहुणे उठले. त्यांना घराची भिंत पडताना दिसली. त्यांनी वेळीच सर्वांना बाहेर काढले. काही वेळातच ही खोली पूर्णत: ढासळली. तालुक्यातील कवठा कडू येथे हा थरार मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, सारंगधर श्यामराव लांजेवार व त्यांची पत्नी यांचे वास्तव्य असलेले दोन खोल्यांचे टीन-मातीचे घर आहे. लग्न झालेली २५ वर्षीय मुलगी व जावई हे पाच महिन्यांच्या मुलीसह त्यांच्याकडे आले होते. मंगळवारी जेवण झाल्यानंतर सर्व सदस्य झोपले. दोन ते तीन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे त्यांच्या घराची भिंत जीर्ण झाली होती.

अशातच मध्यरात्री दीडच्या सुमारास जावयाच्या मोबाइलचा चुकीने लागलेला अलार्म वाजला. त्यांची झोप उघडली व अलार्म बंद केल्यानंतर त्यांना दिसले की, भिंत थोडी-थोडी ढासळत आहे. त्यांनी सर्वांना हाक देऊन उठवले व घराबाहेर काढले. यानंतर अवघ्या पंधरा-वीस मिनिटातच ते ज्या खोलीत झोपले होते, ती खोली पूर्णतः जमीनदोस्त झाली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, त्यांचे घर पूर्णतः उद्ध्वस्त झाले. तलाठ्यांनी बुधवारी पंचनामा केला.

टॅग्स :AccidentअपघातRainपाऊसAmravatiअमरावती