शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत राज्यात शाश्वत शाळेची भरारी, ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 18:14 IST

मुंबई सायन्स टीचर असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत शाश्वत शाळेच्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यशाची भरारी घेतली आहे. शाश्वत शाळेचे एकूण ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

अमरावती : मुंबई सायन्स टीचर असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत शाश्वत शाळेच्या इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यशाची भरारी घेतली आहे. शाश्वत शाळेचे एकूण ९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.शाश्वत शाळेतील एकूण ४० पैकी १० विद्यार्थी पुढील पातळीसाठी निवडले गेले, तर अदिती व-हाडे ही प्रथम क्रमांकाने निवडली गेली. पूर्ण राज्यभरात होमी भाभा परीक्षेचा निकाल सात टक्के लागलेला असतानाच राज्यातील शाश्वत या एकमेव शाळेचा निकाल २५ टक्के लागला आहे. अनुष्का पोटोडे, मृण्मयी जोशी, मधुर लिखमणी, सुबोध कानबाले, श्रेया साकला, मेघना बजाज, प्लक्षा पांडे, राज आचलिया, आदित्य मामर्डे हे विद्यार्थी पुढील पातळीसाठी निवडले गेले आहेत.या परीक्षेसाठी तयारी करताना विद्यार्थ्यांनी कुठल्याही पुस्तकाचा वापर केला नाही किंवा घोकंपट्टी केली नाही. परीक्षेची तयारी करताना शिक्षकांनी खेळाद्वारे विज्ञान शिकविले. नुकतेच शिक्षण नाही तर विज्ञान कसे आत्मसात करावे, यासाठी हा उपक्रम होता. म्हणून या निकालामुळे सगळेजण शाश्वत शिक्षण पद्धतीची दखल घेत आहेत.विद्यार्थ्यांच्या या यशात वैशाली ठाकूर, हिमानी राठी व सरिता खत्री, अनुप्रिया मंडकमारे यांचे मार्गदर्शन लाभले. शाश्वतच्या संस्थापिका अमृता गायगोले यांच्या मार्गदर्शनासोबतच नारायणा आय.आय.टी. अकॅडमी दिल्ली मधील तज्ज्ञ शिक्षक आलोक कुमार, टाटा इन्स्टिट्युटचे माजी शास्त्रज्ञ डॉ. आनंद घैसास याशिवाय संजय पांडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीचा विकास तसेच भविष्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी चांगल्या पद्धतीने करावी या हेतूने शाश्वत शाळेने स्पर्धा परीक्षा विभाग सुरू केला आहे. यात इयत्ता पाचवी व आठवीसाठी महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता सहावी व नववीसाठी डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, इयत्ता दहावीसाठी एनएसटीएसई परीक्षा यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. यात कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. भारतातील वेगवेगळी तज्ज्ञ मंडळी ध्येयपूर्तीसाठी या उपक्रमात जुळलेली आहेत तसेच पालकसुद्धा शिक्षणक्षेत्रातील आमूलाग्र बदलाची सुरुवात म्हणून या उपक्रमाकडे पाहत आहेत.

टॅग्स :AmravatiअमरावतीSchoolशाळा