शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

तीन वर्षांत नऊ कोटींच्या गुटख्यांची होळी

By admin | Updated: August 9, 2015 23:53 IST

महाराष्ट्र राज्य शासनाने गुटख्यावर प्रतिबंध लावल्यानंंतरही काही ठिकाणी गुटख्यांची सर्रास विक्री तर काही ठिकाणी छुप्या मार्गाने विक्री केली जाते.

८८ जणांवर कारवाई:१०३ प्रकरणे न्यायालयातअमरावती : महाराष्ट्र राज्य शासनाने गुटख्यावर प्रतिबंध लावल्यानंंतरही काही ठिकाणी गुटख्यांची सर्रास विक्री तर काही ठिकाणी छुप्या मार्गाने विक्री केली जाते. अन्न व औषधी प्रशासन विभागाने गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील विविध ठिकाणी धाडसत्र राबवून तब्बल नऊ कोटींचा गुटखा जप्त करून नष्ट केला आहे. महाराष्ट्र शासनाने २०१२ पासून मनुष्यांच्या आरोग्यास घातक असलेल्या तंबाखू, तंबाखूजन्य व सुपारी युक्त उत्पादनावर बंद घातली आहे. बंदी लागू झाल्यानंतरही अमरावती जिल्ह्यात गुटख्यांची विक्री होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. अन्न व औषधी प्रशासनाकडून गुटखा व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे सत्र सुरु आहे. मात्र, तरीही मोठ्या प्रमाणात गुटखा शहरात विक्री होत असल्याचे लक्षात येत आहे. मध्यंतरी नागपूर व औरंगाबाद येथील अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे अमरावती शहरात कारवाईचे धाडसत्र सुरू केले होते. मागील तीन वर्षांची आकडेवारीवर लक्ष दिल्यास अन्न व औषधी प्रशासन विभागाने २० जुलै २०१२ ते १९ जुलै २०१३ पर्यंत जिल्ह्यातील ११७ ठिकाणी धाडी टाकून गुटख्यांच्या मालाची तपासणी केली आहे. त्यामध्ये ५३ ठिकाणावरून ५ कोटी ७ लाख ९९ हजार ४८५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता. यामध्ये ११ व्यवसायिकांवर फौजदारी कारवाई करण्यात आली असून या वर्षात ५३ प्रकरणे न्यायालयात प्रविष्ठ करण्यात आले. त्याच प्रमाणे २०१३-१४ मध्ये २५३ ठिकाणी छापे टाकून ५० जणांकडून २ कोटी २ लाख ४ हजार ६३० रुपयांच्या गुटख्याचा माल जप्त करण्यात आला. त्यामध्ये ४८ जणांविरूध्द फौजदारी तर ५० प्रकरणे न्यायप्रविष्ट करण्यात आले. २०१४-१५ मध्ये आतापर्यंत ४८ ठिकाणी धाडी टाकून २९ जणांकडून १ कोटी ५ लाख २६ हजार २८५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला तर २६ जणांविरुध्द फौजदारीची कारवाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)