शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अमरावतीचा प्रसिद्ध 'गिला वडा'; कोठून आला, कसा फेमस झाला.. जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2022 15:08 IST

मुळात बुंदेलखंडी असलेला हा गिला वडा अमरावतीत आला कसा अन् त्याने अमरावतीकरांना लळा लावला कसा, हे सांगणारी गिलावडाची गोष्ट त्याच्या चवीइतकीच न्यारी आहे.

ठळक मुद्देगिला वडा व्हाया बुंदेलखंड टू अंबानगरी

अमरावती : अंबानगरीत येणाऱ्या पाहुण्याला आवर्जून सांगितले जाते, अमरावतीला जात आहात ना? मग गिलावडा अवश्य खाल. होय, महाराष्ट्राची ओळख सांगणारे अनेक पदार्थ असतील; पण अमरावतीचा गिला वडा म्हणजे लय भारी.

इतर पदार्थाची एक स्वतंत्र रेसिपी आहे, त्या मागील पाश्वभूमी आहे. गिलावडाही तशाच आहे. मुळात बुंदेलखंडी असलेला हा गिला वडा अमरावतीत आला कसा अन् त्याने अमरावतीकरांना लळा लावला कसा, हे सांगणारी गिलावडाची गोष्ट त्याच्या चवीइतकीच न्यारी आहे.

अमरावती जिल्हा वगळता महाराष्ट्रात इतर कुठेही तो मिळत नसल्याचा दावा येथील व्यावसायिक मोठ्या अभिमानाने करतात. व्हाया बुंदेलखंड ते अमरावती असा या गिला वडाचा प्रवास. १९६० च्या दशकात हा अमरावतीत पोहोचला तो बुंदेलखंडवासीयांसोबत. गोविंद पारिछत साहू सांगतात, सुमारे २५ हजाराहून अधिक लोकं बंदेलखंडहून अमरावतीत स्थायिक झाले. सुरुवातीला लग्न समारंभात भोजनाचा मेन्यू असलेला गिला वडा पुढे अमरावतीची ओळख झाला. लग्न समारंभाच्या वेळी कुलदैवतांना बुंदेलखंडवासी गिला वड्याचा नैवेद्य द्यायचे. नंतर ८० च्या दशकात काहींनी याचा व्यवसाय सुरू केला तो आज लाखोंच्या घरात पोहोचला आहे. उळद दाळीपासून तयार होणारा हा पदार्थ पाचक तर आहेच, शिवाय हेल्दीही आहे.

असे आहे अर्थकारण

सकाळी आठवाजतापासून तर रात्री आठवाजेपर्यंत शहरात अनेक ठिकाणी सहज उपल्बध होणाऱ्या या पदार्थाची दररोजची उलाढाल ५० हजार रुपयांहून अधिक आहे. मसानगंज परिसरातून दररोज जवळपास ३० गाड्या निघतात आणि दिवसाला किमान एक हजार प्लेटची विक्री होत असल्याने गिला वड्याने आपली चव राखून ठेवली आहे. त्यावर दिली जाणाऱ्या चटण्या हे त्याचे खास वैशिष्ट्य.

टॅग्स :foodअन्नSocialसामाजिक