शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
5
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
6
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
7
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
8
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
9
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
10
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
11
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
12
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
13
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
14
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
15
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
16
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
17
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
18
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
19
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
20
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ

महामार्गावरील होर्डिंग धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST

महामार्गावरील प्रामुख्याने अर्जुननगर चौकातील लावण्यात आलेल्या या अनधिकृत फलकांमुळे पंचवटीकडून येणारी वाहने अर्जुननगरातून महामार्गावर येणाऱ्या वाहनचालकांना दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. या सर्व प्रकारांमुळे हा विभाग नागरिकांच्या अपघाताची वाट पाहतो काय, असा नागरिकांचा सवाल आहे. किंबहुना बाजार परवाना विभागाद्वारे कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याने या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

ठळक मुद्देचौकाचे विद्रुपीकरण : नागरिकांच्या तक्रारी महापालिकेत कचऱ्याच्या पेटीत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महामार्गावरील पंचवटी चौक ते रहाटगाव दरम्यान चौक अनधिकृत फलकांनी बुजले आहेत. त्यामुळे नगरातून महामार्गावर येणाºया नागरिकांना महामार्गावरील वाहन दिसत नाही. परिणामी या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी ही बाब बाजार परवाना विभागाच्या सहायक आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली असतानाही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवावर उठलेल्या या बेकायदेशीर फलकांची दखल आयुक्त घेणार काय, असा नागरिकांचा सवाल आहे.शहर सौंदर्यीकरणाचे विद्रुपीकरण करणाऱ्या या चमकोबाजांवर महापालिकेच्या बाजार व परवाना विभागाची ‘कृपा’ असल्याने चौकाचौकांचे विद्रुपीकरण झालेले आहे. महापालिकेच्या उत्पन्नाला चुना लावणाऱ्या या होर्डिंगबाबत कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे या बाजार व परवाना विभागावर नियंत्रण कुणाचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.महामार्गावरील प्रामुख्याने अर्जुननगर चौकातील लावण्यात आलेल्या या अनधिकृत फलकांमुळे पंचवटीकडून येणारी वाहने अर्जुननगरातून महामार्गावर येणाऱ्या वाहनचालकांना दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. या सर्व प्रकारांमुळे हा विभाग नागरिकांच्या अपघाताची वाट पाहतो काय, असा नागरिकांचा सवाल आहे. किंबहुना बाजार परवाना विभागाद्वारे कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याने या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.वाढदिवस, स्वागत, शुभेच्छा, विकास कामाचे भूमिपूजन, याशिवाय विविध कारणांसाठी बहुतांश नगरसेवकांद्वारे अनधिकृत होर्डिंग लावण्यात धन्यता मानली जाते. या नियमबाह्य कारभाराला चाप लावण्याचे काम महापालिकेच्या बाजार परवाना विभागाचे आहे. मात्र, अर्जुनगर चौकात या राजकीय व्यक्तींनीच अनधिकृत फलक लावले आहे. चौकाचे हे विद्रुपीकरण नागरिकांच्या जिवावर उठले आहे. बाजार व परवाना विभागाचे दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस या प्रकारात वाढ होत आहे.दंड व शिक्षेची तरतूद - कारवाई केव्हा?बाजार परवाना विभागाद्वारे महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध कायद्याचे अधिनियम १९९५ अंतर्गत प्रावधान आहे. यात तीन महिन्यांची शिक्षा व दोन हजारांचा दंड किंवा एकाच वेळी दोन्ही प्रकारची शिक्षा अश्ी तरतूद आहे. मात्र, बाजार परवाना विभाग कारवाई करीत नसल्यामुळे चमकोगिरीच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. खुद्द अनेक नगरसेवकांचीच फलके चौकांमध्ये अनधिकृतपणे लावलेली आहेत. आयुक्तांनी हा प्रकार गांभीर्याने घेऊन कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग