शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
4
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
6
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
7
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
8
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
9
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
10
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
11
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
12
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
13
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
14
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
15
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
16
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
18
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
19
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
20
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी

महामार्गावरील होर्डिंग धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 06:00 IST

महामार्गावरील प्रामुख्याने अर्जुननगर चौकातील लावण्यात आलेल्या या अनधिकृत फलकांमुळे पंचवटीकडून येणारी वाहने अर्जुननगरातून महामार्गावर येणाऱ्या वाहनचालकांना दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. या सर्व प्रकारांमुळे हा विभाग नागरिकांच्या अपघाताची वाट पाहतो काय, असा नागरिकांचा सवाल आहे. किंबहुना बाजार परवाना विभागाद्वारे कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याने या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

ठळक मुद्देचौकाचे विद्रुपीकरण : नागरिकांच्या तक्रारी महापालिकेत कचऱ्याच्या पेटीत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महामार्गावरील पंचवटी चौक ते रहाटगाव दरम्यान चौक अनधिकृत फलकांनी बुजले आहेत. त्यामुळे नगरातून महामार्गावर येणाºया नागरिकांना महामार्गावरील वाहन दिसत नाही. परिणामी या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी ही बाब बाजार परवाना विभागाच्या सहायक आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली असतानाही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवावर उठलेल्या या बेकायदेशीर फलकांची दखल आयुक्त घेणार काय, असा नागरिकांचा सवाल आहे.शहर सौंदर्यीकरणाचे विद्रुपीकरण करणाऱ्या या चमकोबाजांवर महापालिकेच्या बाजार व परवाना विभागाची ‘कृपा’ असल्याने चौकाचौकांचे विद्रुपीकरण झालेले आहे. महापालिकेच्या उत्पन्नाला चुना लावणाऱ्या या होर्डिंगबाबत कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे या बाजार व परवाना विभागावर नियंत्रण कुणाचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.महामार्गावरील प्रामुख्याने अर्जुननगर चौकातील लावण्यात आलेल्या या अनधिकृत फलकांमुळे पंचवटीकडून येणारी वाहने अर्जुननगरातून महामार्गावर येणाऱ्या वाहनचालकांना दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. या सर्व प्रकारांमुळे हा विभाग नागरिकांच्या अपघाताची वाट पाहतो काय, असा नागरिकांचा सवाल आहे. किंबहुना बाजार परवाना विभागाद्वारे कुठलीही कारवाई करण्यात येत नसल्याने या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे.वाढदिवस, स्वागत, शुभेच्छा, विकास कामाचे भूमिपूजन, याशिवाय विविध कारणांसाठी बहुतांश नगरसेवकांद्वारे अनधिकृत होर्डिंग लावण्यात धन्यता मानली जाते. या नियमबाह्य कारभाराला चाप लावण्याचे काम महापालिकेच्या बाजार परवाना विभागाचे आहे. मात्र, अर्जुनगर चौकात या राजकीय व्यक्तींनीच अनधिकृत फलक लावले आहे. चौकाचे हे विद्रुपीकरण नागरिकांच्या जिवावर उठले आहे. बाजार व परवाना विभागाचे दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस या प्रकारात वाढ होत आहे.दंड व शिक्षेची तरतूद - कारवाई केव्हा?बाजार परवाना विभागाद्वारे महाराष्ट्र मालमत्ता विरूपणास प्रतिबंध कायद्याचे अधिनियम १९९५ अंतर्गत प्रावधान आहे. यात तीन महिन्यांची शिक्षा व दोन हजारांचा दंड किंवा एकाच वेळी दोन्ही प्रकारची शिक्षा अश्ी तरतूद आहे. मात्र, बाजार परवाना विभाग कारवाई करीत नसल्यामुळे चमकोगिरीच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. खुद्द अनेक नगरसेवकांचीच फलके चौकांमध्ये अनधिकृतपणे लावलेली आहेत. आयुक्तांनी हा प्रकार गांभीर्याने घेऊन कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग