शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

१७९ सरळसेवा आरएफओंच्या पदोन्नतीला स्थगिती देण्यास ‘सर्वोच्च’ नकार

By गणेश वासनिक | Updated: August 13, 2024 18:22 IST

Amravati : मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाचा निर्णय ‘जैसे थे’; १२ ऑगस्ट रोजी याचिकेवर निर्णय, वन विभागाचे मात्र ‘वेट ॲन्ड वॉच’

अमरावती : राज्य वनसेवेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नियुक्ती झालेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) यांना पदोन्नती देताना प्रशिक्षण कालावधी ग्राह्य धरण्यात यावा, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नुकताच दिला आहे.

मात्र उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध पदावनत आरएफओंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तथापि सरळसेवा आरएफओंच्या पदोन्नतीला स्थगिती देण्यास सादर याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. असे असताना वन विभागाकडून सरळसेवा आरएफओंच्या पदोन्नतीसाठी कोणत्याही हालचाली होताना दिसून येत नाहीत. केवळ ‘वेट ॲन्ड वॉच’ अशी वरिष्ठांची भूमिका आहे.

सर्वोच्च न्यायालयात २ ऑगस्ट २०२४ रोजी याचिका क्रमांक ३५४२८/२०२४ अन्वये निलय भोगे विरुद्ध महाराष्ट्र राज्य यावर १२ ऑगस्ट रोजी सुनावणी करताना न्या. अभय एस. ओका, न्या. ऑगिस्टन जाॅर्ज मशिह यांनी सरळसेवा आरएफओंच्या पदोन्नतीला स्थगिती देण्यास नकार देण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर १७९ सरळसेवा आरएफओंना पदोन्नती देणे हे क्रमप्राप्त आहे. मात्र वन विभागातील वरिष्ठ आरएफओंच्या पदोन्नती फाइलकडे दुर्लक्ष करीत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी सरळसेवा आरएफओंना पदोन्नती मिळाली नाही तर पुन्हा नागपूर येथे वन बल भवनाच्या येरझारा मारण्यात आरएफओंना वेळ घालावा लागणार आहे. यासंदर्भात राजाच्या वन बलप्रमुख शोमिता बिश्वास यांच्याशी संपर्क साधला असता त्या उपलब्ध झाल्या नाहीत.

नागरी सेवा मंडळाची ९ ऑगस्ट रोजी बैठक, पण निर्णय नाहीच?यापूर्वी उच्च न्यायालयाने केवळ ३ याचिकाकर्त्यांसाठी संपूर्ण पदोन्नती प्रक्रियेवर स्थगिती देणे शक्य नसल्याचे निरीक्षण नोंदवून याचिकाकर्ते यांच्यासाठी केवळ ३ जागा पुढील चार आठवड्यांसाठी स्थगित ठेवून पदोन्नती प्रक्रिया राबविण्याबाबत शासनाला निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने वन विभागाने सरळसेवा आरएफओंना सहायक वनसंरक्षकांच्या रिक्त पदांवर पदोन्नती देण्यासाठी शुक्रवार ९ ऑगस्ट २०२४ रोजी नागरी सेवा मंडळाची बैठक घेतली. परंतु या बैठकीत १७९ आरएफओंच्या यादीवर कोणताही निर्णय झाला नाही.

सहायक वन संरक्षकांची पदे रिक्त, नियमित कामकाज प्रभावित‘मॅट’ न्यायालय, उच्च न्यायालय, आता सर्वोच्च न्यायालयानेही सरळसेवा आरएफओंच्या बढतीचा मार्ग सुकर केला आहे. आरएफओंच्या पदोन्नतीची यादीदेखील तयार आहे. मात्र वन खात्यातील वरिष्ठांची याबाबत उदासीनता दिसून येते. किंबहुना पदोन्नती कशी थांबेल, यासाठी पडद्यामागील जोरदार हालचाली होत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. तर सहायक वनसंरक्षकांची शेकडो पदे रिक्त असल्यामुळे वन विभागात नियमित कामकाजावर परिणाम होत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती