शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

म्हणून विद्युत प्रकल्पाचे फावले..

By admin | Updated: March 18, 2016 00:08 IST

अमरावती जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पातून बहुतांश शेतकरी सिंचनासाठी आवश्यक पाण्याची मागणी करीत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

अमरावती : अमरावती जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पातून बहुतांश शेतकरी सिंचनासाठी आवश्यक पाण्याची मागणी करीत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. सिंचनासाठी राखीव असलेले २०० दलघमी पाणी सिंचनासाठी पुरेसा प्रमाणात वापरले जात नसल्याने ते पाणी अन्यत्र वळविले जाते आणि त्यामुळे औष्णिक विद्युत प्रकल्पाचे फावते, अशी माहिती समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जलजागृती सप्ताहाच्या निमित्ताने जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांना सिंचनासाठी उद्युक्त केले आहे. उर्ध्व वर्धा प्रकल्पातून सिंचनाचे पाणी घेण्यासाठी पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, पाणी हमखास मिळेल आणि हा प्रकल्प या भागातील नागरिकांना अधिक सुजलाम् सुफलाम् करेल, असा आशावाद जलसंपदा विभागाने अधीक्षक अभियंता रवींद्र लांडेकर यांनी व्यक्त केला आहे. एकीकडे हा प्रकल्प वरदान ठरला असताना प्रकल्पाच्या पाणी वापरकर्त्यांबद्दल त्यांनी जाहीर खंत व्यक्त केली आहे. पाणी मागणी अधिकाधिक आल्यास अन्यत्र पाणी देण्याचा विषयच उरणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे एकूण लाभक्षेत्र १,०४,४०० हेक्टर असताना आतापर्यंत ७५,०४० हेक्टरची सिंचन क्षमता निर्मिती झाली आहे. अधिकाधिक सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी समोर येण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)काय म्हणतात अधीक्षक अभियंता ?हंगामापूर्वी लाभधारक पाणी मागणीपत्र देत नाहीत. यामुळे सिंचन व्यवस्थापन कोलमडते. पाणी वापर संस्था अद्याप सक्षम आणि पूर्णपणे कार्यान्वित झालेल्या नाहीत. सिंचन कायदा २००५ अन्वये सिंचन व्यवस्थापन पूर्णत: लाभधारकांकडून होणे अपेक्षित आहे. यामुळे पाणी वापर संस्था महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा २००५ या कायद्यांतर्गत नोंदणी होऊन कार्यान्वित होणे आवश्यक आहे. प्रकल्पाचे बिगर सिंचन पाणी वापरकर्ते घरगुती वापराकरिता नियमित पाणी घेतात. परंतु वार्षिक करारनामे व पाणीपट्टीचे भुगतान याबाबत मात्र उदासीनता दाखवितात. यामुळे प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीकरिता शासनाकडून निधी प्राप्त होत नाही, ही जलसंपदा विभागाची शोकांतिका असल्याचे अधीक्षक अभियंता रवींद्र लांडेकर यांनी म्हटले आहे.पाणी वापर संस्था माध्यमज्या शेतकऱ्यांना मान्सूनपूर्व किंवा हंगामात कधीही सिंचनासाठी पाणी आवश्यक असेल त्यांनी ७ क्रमांकाचा अर्ज भरावा. हे अर्ज सर्व सिंचन शाखा कार्यालय तथा तालुकास्तरावर सिंचन उपविभागात उपलब्ध आहेत. मात्र हे पाणी मागणी अर्ज पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून येणे आवश्यक आहेत. हवे असलेले पीक घेण्याची मुभा या शेतकऱ्यांना आहे. कुठल्याही कालावधीत पाणी मागणी करणे शक्य आहे. तथापि त्यासाठी क्षेत्र एकत्रित असावे.पाणी वापर संस्था बोटावरपाणी मागणीसाठी पाणी वापर संस्था पुरेशा पुढे येत नाहीत. पाण्याचे नियोजन नाही, त्यामुळे आपसी हेवेदावे सोडून पाणी वापर संस्था स्थापन कराव्यात, जेणेकरून सिंचनाचा टक्का वाढेल, त्यामुळे पाणी वापर संस्था निर्माण झाल्या पाहिजेत. लोकप्रतिनिधींनी पाणी वापर संस्थांना बळ द्यावे, असे आवाहनही करण्यात आले.