शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
3
लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
5
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
6
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
7
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
8
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
9
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
10
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
13
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
14
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
15
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
16
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
17
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
18
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
19
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
20
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

म्हणून विद्युत प्रकल्पाचे फावले..

By admin | Updated: March 18, 2016 00:08 IST

अमरावती जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पातून बहुतांश शेतकरी सिंचनासाठी आवश्यक पाण्याची मागणी करीत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

अमरावती : अमरावती जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उर्ध्व वर्धा प्रकल्पातून बहुतांश शेतकरी सिंचनासाठी आवश्यक पाण्याची मागणी करीत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. सिंचनासाठी राखीव असलेले २०० दलघमी पाणी सिंचनासाठी पुरेसा प्रमाणात वापरले जात नसल्याने ते पाणी अन्यत्र वळविले जाते आणि त्यामुळे औष्णिक विद्युत प्रकल्पाचे फावते, अशी माहिती समोर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जलजागृती सप्ताहाच्या निमित्ताने जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांना सिंचनासाठी उद्युक्त केले आहे. उर्ध्व वर्धा प्रकल्पातून सिंचनाचे पाणी घेण्यासाठी पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, पाणी हमखास मिळेल आणि हा प्रकल्प या भागातील नागरिकांना अधिक सुजलाम् सुफलाम् करेल, असा आशावाद जलसंपदा विभागाने अधीक्षक अभियंता रवींद्र लांडेकर यांनी व्यक्त केला आहे. एकीकडे हा प्रकल्प वरदान ठरला असताना प्रकल्पाच्या पाणी वापरकर्त्यांबद्दल त्यांनी जाहीर खंत व्यक्त केली आहे. पाणी मागणी अधिकाधिक आल्यास अन्यत्र पाणी देण्याचा विषयच उरणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे एकूण लाभक्षेत्र १,०४,४०० हेक्टर असताना आतापर्यंत ७५,०४० हेक्टरची सिंचन क्षमता निर्मिती झाली आहे. अधिकाधिक सिंचनक्षेत्र वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी समोर येण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)काय म्हणतात अधीक्षक अभियंता ?हंगामापूर्वी लाभधारक पाणी मागणीपत्र देत नाहीत. यामुळे सिंचन व्यवस्थापन कोलमडते. पाणी वापर संस्था अद्याप सक्षम आणि पूर्णपणे कार्यान्वित झालेल्या नाहीत. सिंचन कायदा २००५ अन्वये सिंचन व्यवस्थापन पूर्णत: लाभधारकांकडून होणे अपेक्षित आहे. यामुळे पाणी वापर संस्था महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा २००५ या कायद्यांतर्गत नोंदणी होऊन कार्यान्वित होणे आवश्यक आहे. प्रकल्पाचे बिगर सिंचन पाणी वापरकर्ते घरगुती वापराकरिता नियमित पाणी घेतात. परंतु वार्षिक करारनामे व पाणीपट्टीचे भुगतान याबाबत मात्र उदासीनता दाखवितात. यामुळे प्रकल्पाच्या देखभाल व दुरुस्तीकरिता शासनाकडून निधी प्राप्त होत नाही, ही जलसंपदा विभागाची शोकांतिका असल्याचे अधीक्षक अभियंता रवींद्र लांडेकर यांनी म्हटले आहे.पाणी वापर संस्था माध्यमज्या शेतकऱ्यांना मान्सूनपूर्व किंवा हंगामात कधीही सिंचनासाठी पाणी आवश्यक असेल त्यांनी ७ क्रमांकाचा अर्ज भरावा. हे अर्ज सर्व सिंचन शाखा कार्यालय तथा तालुकास्तरावर सिंचन उपविभागात उपलब्ध आहेत. मात्र हे पाणी मागणी अर्ज पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून येणे आवश्यक आहेत. हवे असलेले पीक घेण्याची मुभा या शेतकऱ्यांना आहे. कुठल्याही कालावधीत पाणी मागणी करणे शक्य आहे. तथापि त्यासाठी क्षेत्र एकत्रित असावे.पाणी वापर संस्था बोटावरपाणी मागणीसाठी पाणी वापर संस्था पुरेशा पुढे येत नाहीत. पाण्याचे नियोजन नाही, त्यामुळे आपसी हेवेदावे सोडून पाणी वापर संस्था स्थापन कराव्यात, जेणेकरून सिंचनाचा टक्का वाढेल, त्यामुळे पाणी वापर संस्था निर्माण झाल्या पाहिजेत. लोकप्रतिनिधींनी पाणी वापर संस्थांना बळ द्यावे, असे आवाहनही करण्यात आले.