शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने दगावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी हेल्पलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्हा परिषदेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची जिल्हा शाखा पुढे आली आहे. या ...

अमरावती : जिल्हा परिषदेतील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची जिल्हा शाखा पुढे आली आहे. या शाखेने प्रत्येक तालुक्यातील दोन आणि जिल्हास्तरावर चार अशा ३२ पदाधिकाऱ्यांची नेमणूक याकरिता केली आहे. हे पदाधिकारी त्या-त्या तालुक्यातील मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मृत्यूनंतरचे हीच लाभ मिळवून देण्यासाठी मदत करतील.

कोरोनाकाळात मार्च २०२० पासून जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी कोरोनाने, तर काही कर्मचारी इतर आजारांनी दगावले. नेमके याच काळात सरकारी निर्बंध असल्यामुळे बहुतेक कार्यालये पूर्ण वेळ आणि क्षमतेने उघडली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही दस्तऐवज प्राप्त करून घेण्यात त्यांच्या नातेवाइकांना अनेक अडचणी येत आहेत. या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने समिती स्थापन केली. कर्मचारी युनियनचे अध्यक्ष पंकज गुल्हाने, सचिव राजेश रोंघे, लिपिक कर्मचारी संघटनेचे सचिव संजय राठी, सदस्य राजू गाडे, सुनील शिराळकर व विजय घोटाळे हे अमरावती व जिल्हास्तरीय मार्गदर्शक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. याशिवाय धारणीत योगेश मालवीय, पंकज आसरे, चिखलदऱ्यात गजानन केंद्रे, संजय गोहत्रे, अचलपूरमध्ये सुभाष जाधव, शीतल दहातोंडे, अंजनगाव सुर्जी येथे प्रशांत गावंडे, नितीन पवार, दयार्पूरमध्ये तुषार पावडे, गजानन गोहत्रे, चांदूर बाजारात संजय येऊतकर, मनीष टेंभरे, वरूडमध्ये राहुल हरले, अविनाश हुसे, मोर्शी विलास दुपारे, समीर चौधरी, तिवस्यात नीलेश दहातोंडे, संजय मुंद्रे, धामणगाव रेल्वेत राजेश पवार, हेमंत यावले, चांदूर रेल्वे येथे प्रशांत धर्माळे, योगेश मालखेडे, नांदगाव खंडेश्वर येथे मंगेश मानकर, वीरेंद्र गलफट आणि भातकुलीकरिता सी.डी. देवपारे व बाळासाहेब मोथरकर हे मार्गदर्शक म्हणून काम पाहणार आहेत.

कोट

मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनातर्फे कोणते लाभ दिले जातात, हे बहुतेक कुटुंबांना माहीत नसते. त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, ती कोणाकडे आणि किती कालावधी सादर करावी लागतात, याची माहिती नसते. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची कर्तव्य म्हणून हा उपक्रम सुरू केला.

पंकज गुल्हाने, अध्यक्ष, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन