शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

२५८ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 11:21 PM

जिल्ह्यातील २५८ गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची शक्यता गृहीत धरून भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे ३० नोव्हेंबरला अहवाल सादर करून टंचाईग्रस्त गावांची शिफारस केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी त्यांना प्रदान अधिकार अन्वये १४ डिसेंबरच्या आदेशान्वये २५८ गावांमध्ये जून २०९ या कालावधीपर्यंत टंचाईक्षेत्र घोषित केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची घोषणा : अधिसूचना जारी, उपाययोजना प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील २५८ गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची शक्यता गृहीत धरून भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे ३० नोव्हेंबरला अहवाल सादर करून टंचाईग्रस्त गावांची शिफारस केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी त्यांना प्रदान अधिकार अन्वये १४ डिसेंबरच्या आदेशान्वये २५८ गावांमध्ये जून २०९ या कालावधीपर्यंत टंचाईक्षेत्र घोषित केले.यंदा सरासरीपेक्षा २४ टक्के कमी पावसामुळे भूजलातील पाणीपातळीत १० फुटांपर्यंत सप्टेंबरअखेर घट आली. पाण्याचे स्रोत आटू लागल्याने १६५१ गावांमध्ये पाणीटंचाईची झळ असल्याचा जिल्हा परिषदेचा अहवाल आहे. त्यानुसार उपाययोजना प्रस्तावित केलेल्या आहेत. यानुसार आॅक्टोबर ते डिसेंबरअखेर ४६२ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. त्यावर ८.५७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. जानेवारी ते मार्च २०१९ या कालावधीत ३६९ गावांकरिता ११०८ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. त्यावर ३.९२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे, तर एप्रिल ते जून २०१९ पर्यंत ३६९ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्यात. त्यावर २.९२ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.सद्यस्थितीत मोर्शी तालुक्यातील सावरखेड येथे एक टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर शिरखेड येथे एका विहिरीचे अधिग्रहण करून गावाला पाणीपुरवठा होत आहे.जिल्हाधिकाºयांद्वारे प्रकल्पांतील पाणीसाठ्याचे आरक्षण करण्यात आले आहे. यामध्ये वाई प्रकल्पातून पुसल्याकरिता ०.१७ दलघमी, पुसली प्रकल्पातून धनोडी, मालखेड ग्रामपंचायतीकरिता ०.१ दलघमी, वºहा-कुºहा स्वतंत्र योजनेकरिता ०.४१८ दलघमी, जावरा, फत्तेपूर, नमस्कारीकरिता ०.५० दलघमी, अंजनसिंगी-पिंपळखुट्याकरिता ०.१६८, नायगाव ०.०१५, दिघी महल्ले ०.०१५, आष्टा योजनेकरिता ०.०१, सोनोरा काकडे ०.०१५, दर्यापूर १५६ गावे योजनेकरिता शहानूर प्रकल्पातून १६.८१, चांदूर रेल्वे शहराकरिता मालखेड प्रकल्पातून १.६५, पुसली लघुप्रकल्पातून शेंदूरजनाघाट नगर परिषदेकरिता २.३३, पूर्णा प्रकल्पातून १०५ गावांच्या योजनेकरिता ३.७५, चांदी प्रकल्पातून नांदगाव खंडेश्वरकरिता १.१९, चंद्रभागा प्रकल्पातून अचलपूरकरिता ९.६१९, शेकदरी प्रकल्पातून वरूडकरिता ०.०५ व धवलगिरी प्रकल्पातून लोणीकरिता ०.१८२५ दलघमी आरक्षण जिल्हाधिकाºयांनी केले आहे.पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त अन्य वापरावर निर्बंधमहाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ चे कलम २५ नुसार पाणीटंचाई क्षेत्र जाहीर करण्यात आले असले तरी कलम २६ नुसार टंचाई क्षेत्रातील विहिरींमधील पाणी काढण्यासाठी विनियमन करणे आवश्यक आहे. यामुळे टंचाई जाहीर झालेल्या २५८ गावांच्या पेयजलाच्या स्रोतापासून एक किमी अंतरातील विहिरी, विंधन विहिरी आदींचा वापर पेयजलाव्यतिरिक्त इतर उपयोगासाठी निर्बंधित करण्याची अधिसूचनादेखील जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी जारी केली आहे.असे आहेत जिल्हाधिकाºयांचे आदेशमहाराष्ट्र भूजल (पिण्याच्या पाण्याचे प्रयोजनासाठी विनियमन) अधिनियम २००९ च्या कलम २५ अन्वये जिल्हाधिकाºयांना गत पावसाळ्याचे प्रमाण, भूजल, पाण्याची पातळी व पाण्याचे पुर्नभरण लक्षात घेऊन संभाव्य पाणीटंचाई भासू शकेल अशी गावे अधिसूचित करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. या कायद्याच्या कलम २५ अन्वये प्राप्त अधिकार अन्वये १ आॅक्टोबर २०१८ ते जून २०१९ या कालावधीसाठी टंचाईक्षेत्र घोषित करण्यात येत आहे.