शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील पाड्यांमध्ये अतिवृष्टीने दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 05:00 IST

गुरुवारी पहाटेपासून ढगफुटी प्रमाणे कोसळलेला पाऊस मेळघाटातील अनेक गावांचा संपर्क तोडणार ठरला नदीनाल्यांना आलेला पूर कमी होत असला तरी सेमाडोह माखला, बिबा ते बोदू या दुर्गम भागातील मार्ग बंद आहेत. ते सुरळीत करण्याचे कार्य सुरू असल्याची माहिती तहसीलदार माया माने यांनी दिली. पावसामुळे चार घरांची पडझड होऊन  नुकसान झाले.

ठळक मुद्देसुसर्दाजवळ दरड कोसळली, घरे कोसळले, आरोग्य यंत्रणेची कसरत, गढूळ पाण्याने जलजन्य रोगाच्या साथीची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा :  मेळघाटात धो-धो कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णता विस्कळीत झाले आहे शुक्रवारी दुसऱ्या दिवशीसुद्धा तालुक्यातील अनेक मार्ग बंद होते प्रशासनाच्या वतीने कार्य सुरू असले तरी कोसळलेल्या पावसामुळे जलजन्य रोगाची साथ पसरण्याची भीती वाढविल्या जात असून यातून आरोग्य यंत्रणेची कसरत होणार आहे त्याचा फटका सर्वाधिक गर्भवती स्तनदा व कुपोषित बालकांना बसणार आहे.गुरुवारी पहाटेपासून ढगफुटी प्रमाणे कोसळलेला पाऊस मेळघाटातील अनेक गावांचा संपर्क तोडणार ठरला नदीनाल्यांना आलेला पूर कमी होत असला तरी सेमाडोह माखला, बिबा ते बोदू या दुर्गम भागातील मार्ग बंद आहेत. ते सुरळीत करण्याचे कार्य सुरू असल्याची माहिती तहसीलदार माया माने यांनी दिली. पावसामुळे चार घरांची पडझड होऊन  नुकसान झाले. जामली आर. येथील सोना साकू कासदेकर यांचे घर कोसळले मनभंग, भिलखेडा, भांद्री, आडनदी, खीरपाणी, सावरपाणी, गरजदरी येथील शेतीचे नुकसान झाले.

काटकुंभ येथे दूषित पाण्याचा पुरवठातालुक्यातील काटकुंभ येथे दूषित पाणी ग्रामपंचायतीच्या नाळ योजनेतून झाल्यामुळे तीन किलोमीटर अंतरावरून डोमा येथील हातपंपाचे पाणी नागरिकांना आणावे लागत आहे. अशीच परिस्थिती तालुक्यातील अनेक गावातील असल्याचे वास्तव आहे.

जलजन्य आजाराची भीती काय?मागील दोन दिवसापासून मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे आदिवासी पाड्यांना दूषित पाणीपुरवठा होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने काळजी घेणे गरजेचे आहे. परंतु, अनेक गावांमध्ये दूषित पाणी मिळत असल्याने जलजन्य आजाराची भीती वर्तविली जात आहे. याचा सर्वाधिक फटका गर्भवती स्तनदा व कुपोषित बालकांना बसणार असल्याची भीती आरोग्य यंत्रणेने वर्तविली आहे. दुसरीकडे मार्ग बंद झाल्यास आजारी रुग्ण, गर्भवती मातांना उपचारार्थ दाखल करणे कसरतीचे असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी सतीश प्रधान यांनी 'लोकमतशी बोलताना सांगितले.

बंद रस्ते व दूषित पाण्यामुळे जलजन्य आजाराची भीती आहे. सर्वाधिक आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे नागरिकांनी पाणी गाळून उकळून प्यावे असे आव्हान करण्यात आले आहे  थांबून थांबून पाऊस होत असल्याने डबक्यातील साचलेल्या पाण्यामुळे डासांची भीती आहे. कुपोषित बालक, गर्भवती मातांच्या आरोग्याची काळजी घेतल्या जात आहे.सतीश प्रधान, तालुका वैद्यकीय अधिकारी, चिखलदरा

 

टॅग्स :Rainपाऊस