लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यात सलग दीड तास कोसळलेल्या मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. या पावसाने काही दिवस पेरणी खोळंबणार आहे.तालुक्यात मान्सूनच्या दमदार आगमनाने खरीप पिकाच्या पेरणीला आनंदात सुरुवात झाली. ३० ते ३५ टक्के पेरण्या उरकल्या. जमिनीत पेरणीयोग्य ओलावा निर्माण झाल्याने बळीराजा पेरणीच्या कामात गुंतला. सोमवारी दीड तास मुसळधार पाऊस बरसल्याने पुढील तीन दिवस शेतात पेरणी चालणे कठीण झाले आहे. या मुसळधार पावसामुळे पेरलेले बियाणे दडपण्याची शक्यता आहे.तालुक्यात २४ तासांत सर्वाधिक पाऊस चांदूर बाजार मंडळात ५२.०५ मिमी झाला. सर्वांत कमी करजगाव मंडळात १८.०५ मिमी, शिरजगाव कसबा मंडळात २२ मिमी, बेलोरा मंडळात ४२ मिमी, आसेगाव पूर्णा मंडळात १८.४० मिमी, ब्राम्हणवाडा थडी मंडळात २२ मिमी तसेच तळेगाव मोहना मंडळात २२ मिमी पाऊस पडला आहे. तालुक्यात सरासरी २८.०६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शिरजगाव कसबा मंडळात पावसाची नोंद कमी असली तरी सोमवारी दुपारी व रात्री मुसळधार पाऊस झाला. यात मुख्य बाजारपेठेतून दोन ते तीन फूट पाणी वाहत होते. यामध्ये अनेक वाहनांना क्षती पोहोचली असल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली.
चांदूर बाजार तालुक्यात दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:01 IST
तालुक्यात २४ तासांत सर्वाधिक पाऊस चांदूर बाजार मंडळात ५२.०५ मिमी झाला. सर्वांत कमी करजगाव मंडळात १८.०५ मिमी, शिरजगाव कसबा मंडळात २२ मिमी, बेलोरा मंडळात ४२ मिमी, आसेगाव पूर्णा मंडळात १८.४० मिमी, ब्राम्हणवाडा थडी मंडळात २२ मिमी तसेच तळेगाव मोहना मंडळात २२ मिमी पाऊस पडला आहे. तालुक्यात सरासरी २८.०६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
चांदूर बाजार तालुक्यात दमदार पाऊस
ठळक मुद्देपेरणी खोळंबली : बळीराजा सुखावला; ३५ टक्के पेरण्या उरकल्या