शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
4
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
5
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
6
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
7
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
8
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
9
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
10
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
11
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
12
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
13
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
14
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
15
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
16
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
17
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!
18
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
19
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
20
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग

पावसाची दमदार हजेरी, सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:10 IST

अमरावती/ संदीप मानकर दहा दिवस पावसाने दडी मारल्यानंतर पुन्हा गुरुवारपासून मान्सून सक्रिय झाला आहे. पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा ...

अमरावती/ संदीप मानकर

दहा दिवस पावसाने दडी मारल्यानंतर पुन्हा गुरुवारपासून मान्सून सक्रिय झाला आहे. पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावल्यामुळे ५११ प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ व जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली. सद्यस्थितीत ५११ मध्यम, लघु व मोठ्या प्रकल्पात सरासरी ३३.९० टक्के पाणीसाठा आहे. पावसाने दडी मारली होती. तेव्हा सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात घट झाली होती.

सद्यस्थितीत नऊ मोठ्या प्रकल्पात ३८.३१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. २५ मध्यम प्रकल्पात ३८.४८ टक्के पाणीसाठा असून ४७७ लघु प्रकल्पात २५.६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. १० जुलै रोजीच्या जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार, ५११ प्रकल्पाची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा हा ३२८३.६० दलघमी आहे. मात्र, आजचा उपयुक्त पाणीसाठा १११३.०४ टक्के आहे. त्याची सरासरी टक्केवारी ही ३३.९० टक्के आहे. यंदा १ जुलै नंतर दमदार पावसाची आवश्यकता असताना ९ जुलैपर्यंत पाऊस थांबला होता. त्यामुळे यंदा प्रकल्पांची पातळी फारशी वाढली नाही. सध्या पिण्याच्या पाण्याची जरी चिंता नसती तरीही सिंचनासाठी प्रकल्प शंभर टक्के भरणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

बॉक्स

नऊ मोठ्या प्रकल्पात सध्या पाणीसाठा

अमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात ४५.०७ टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ३७.५१ टक्के, अरुणावती ३२.४९ टक्के, बेंबळा ५८.५० टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात २७.१३ टक्के, वान २९.७९ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पात २८.३८ टक्के, पेनटाकळी २९.३३ टक्के, खडकपूर्णा ०० टक्के पाणीसाठा आहे. अप्पर वर्धा प्रकल्पाच्या परिसरत शनिवारी ०९ मीमी पावसाची नोंद झाली तर आतापर्यंत १९७ मीमी पावसाची नोंद झाली.

कोट

आठ ते दहा दिवस पावसाने दडी मारली. आता १६ जुलैपर्यंत विदर्भात पाऊस आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होईल. त्याचा सर्वाधिक फायदा लघु व मध्यम प्रकल्पांना होईल.

- अनिल बंड, हवामानतज्ज्ञ, अमरावती