शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

२७ लाख शासकीय दस्तऐवजांची प्रचंड दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 00:11 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेखागार कक्षात १८ व्या शतकापासूनचे शासनाचे महत्त्वपूर्ण २७ लाख ३२ हजार

१८ व्या शतकातील महत्त्वपूर्ण रेकॉर्ड : अभिलेखागार कक्षातील कागद जीर्णअमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेखागार कक्षात १८ व्या शतकापासूनचे शासनाचे महत्त्वपूर्ण २७ लाख ३२ हजार ७०० दस्तऐवज ठेवण्यात आले आहेत. मात्र, या अभिलेखांचे स्कॅनिंग व डिजिटायझेशन न केल्यामुळे दीडशे ते २०० वर्षांचे कायमस्वरूपी रेकॉर्ड खराब होण्याच्या मार्गावर आहे. स्पर्श करताच तुकडे पडतात, अशी अवस्था या दस्तऐवजांची झाली आहे. नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले हे रेकॉर्ड जीर्ण होत असताना शासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष कायम आहे. अभिलेखागार विभागात जिल्ह्यातील १०० ते १५० वर्षांपूर्वीच्या स्टेशन डायऱ्या, रेफ्युजी रजिस्टर, फेरफार रजिस्टर, तगाई, कूळ, सिलिंग, भूसंपादन, जमीन वाटप, जमीन अधिग्रहण, अकृषक प्रकरणे असे कायमस्वरूपी रेकॉर्ड आहे. या कागदपत्रांचे आयुष्य संपुष्टात आल्याने ते केव्हाही नष्ट होऊ शकते. मात्र, हे रेकॉर्ड जनतेच्या दृष्टीने मात्र महत्त्वाचे आहे. अनेकदा रेकॉर्ड उपलब्ध नाही किंवा फाटले असल्याच्या अभिप्रायामुळे अनेकांना नोकरीसह विविध संधी गमवाव्या लागल्या आहेत. वास्तविक हे सर्व रेकॉर्ड ‘स्कॅन’ करून त्याची कायमस्वरूपी ‘हार्डडिक्स व सीडी’ तयार करणे महत्त्वाचे आहे. हे रेकॉर्ड स्कॅनिंग करून सॉफ्टवेअरमध्ये सेव्ह करून ‘सॉर्ट’ करता येते. रेकॉर्ड स्कॅनिंगसोबत संबंधित फाईलचे नाव व कामाच्या अभिलेखाबाबतची माहिती या सॉफ्टवेअरमध्ये साठवता येऊ शकते. या रेकॉर्डचे जतन करण्याबाबत २ जुलै २०१२ चे शासनाचे परिपत्रक आहे. मात्र शासनाची मंजुरी नसल्यामुळे हे बहुमूल्य रेकॉर्ड नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. (प्रतिनिधी)तालुक्यातील १९.६३ लाख दस्तऐवजांचा समावेशया कक्षातील अभिलेखागार कक्षात १३ तालुक्यांतील ६,५४६ अभिलेख आहेत. ही पानांची संख्या १९ लाख ६३ हजार ८०० इतकी आहे. यामध्ये अमरावती तालुक्याचे ६३३ अभिलेख, भातकुली ३४५, नांदगाव ३८९, चांदूररेल्वे ७४०, तिवसा ५७२, मोर्शी ७१५, वरूड ५३६, अचलपूर ७७१, चांदूरबाजार ७०७, दर्यापूर ५७४, अंजनगाव ३९१, धारणी ८५ व चिखलदरा तालुक्यातील ८८ अभिलेख्यांचा समावेश आहे.