शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
2
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
3
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

२७ लाख शासकीय दस्तऐवजांची प्रचंड दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 00:11 IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेखागार कक्षात १८ व्या शतकापासूनचे शासनाचे महत्त्वपूर्ण २७ लाख ३२ हजार

१८ व्या शतकातील महत्त्वपूर्ण रेकॉर्ड : अभिलेखागार कक्षातील कागद जीर्णअमरावती : जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेखागार कक्षात १८ व्या शतकापासूनचे शासनाचे महत्त्वपूर्ण २७ लाख ३२ हजार ७०० दस्तऐवज ठेवण्यात आले आहेत. मात्र, या अभिलेखांचे स्कॅनिंग व डिजिटायझेशन न केल्यामुळे दीडशे ते २०० वर्षांचे कायमस्वरूपी रेकॉर्ड खराब होण्याच्या मार्गावर आहे. स्पर्श करताच तुकडे पडतात, अशी अवस्था या दस्तऐवजांची झाली आहे. नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले हे रेकॉर्ड जीर्ण होत असताना शासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष कायम आहे. अभिलेखागार विभागात जिल्ह्यातील १०० ते १५० वर्षांपूर्वीच्या स्टेशन डायऱ्या, रेफ्युजी रजिस्टर, फेरफार रजिस्टर, तगाई, कूळ, सिलिंग, भूसंपादन, जमीन वाटप, जमीन अधिग्रहण, अकृषक प्रकरणे असे कायमस्वरूपी रेकॉर्ड आहे. या कागदपत्रांचे आयुष्य संपुष्टात आल्याने ते केव्हाही नष्ट होऊ शकते. मात्र, हे रेकॉर्ड जनतेच्या दृष्टीने मात्र महत्त्वाचे आहे. अनेकदा रेकॉर्ड उपलब्ध नाही किंवा फाटले असल्याच्या अभिप्रायामुळे अनेकांना नोकरीसह विविध संधी गमवाव्या लागल्या आहेत. वास्तविक हे सर्व रेकॉर्ड ‘स्कॅन’ करून त्याची कायमस्वरूपी ‘हार्डडिक्स व सीडी’ तयार करणे महत्त्वाचे आहे. हे रेकॉर्ड स्कॅनिंग करून सॉफ्टवेअरमध्ये सेव्ह करून ‘सॉर्ट’ करता येते. रेकॉर्ड स्कॅनिंगसोबत संबंधित फाईलचे नाव व कामाच्या अभिलेखाबाबतची माहिती या सॉफ्टवेअरमध्ये साठवता येऊ शकते. या रेकॉर्डचे जतन करण्याबाबत २ जुलै २०१२ चे शासनाचे परिपत्रक आहे. मात्र शासनाची मंजुरी नसल्यामुळे हे बहुमूल्य रेकॉर्ड नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. (प्रतिनिधी)तालुक्यातील १९.६३ लाख दस्तऐवजांचा समावेशया कक्षातील अभिलेखागार कक्षात १३ तालुक्यांतील ६,५४६ अभिलेख आहेत. ही पानांची संख्या १९ लाख ६३ हजार ८०० इतकी आहे. यामध्ये अमरावती तालुक्याचे ६३३ अभिलेख, भातकुली ३४५, नांदगाव ३८९, चांदूररेल्वे ७४०, तिवसा ५७२, मोर्शी ७१५, वरूड ५३६, अचलपूर ७७१, चांदूरबाजार ७०७, दर्यापूर ५७४, अंजनगाव ३९१, धारणी ८५ व चिखलदरा तालुक्यातील ८८ अभिलेख्यांचा समावेश आहे.