शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
3
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
7
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
8
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
9
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
10
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
11
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
12
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
13
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
14
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
15
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
16
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
17
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
18
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
19
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

आरोग्यदायिनीच आजारांच्या विळख्यात

By admin | Updated: November 6, 2014 22:48 IST

गावातील आरोग्य उपकेंद्रात सेवा बजाविणाऱ्या आरोग्यदायीनींवर कामाचा ताण वाढल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेविकांनाच रक्तदाब, मधुमेह तसेच अनेक आजारांचा सामना करावा लागत असल्याची

मोहन राऊत - अमरावतीगावातील आरोग्य उपकेंद्रात सेवा बजाविणाऱ्या आरोग्यदायीनींवर कामाचा ताण वाढल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेविकांनाच रक्तदाब, मधुमेह तसेच अनेक आजारांचा सामना करावा लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़ जिल्ह्यात ५६ प्राथमिक आरोग्य केंद्र तर ३३६ उपकेंद्र आहेत. या केंद्रात रूग्णांची सेवा जिल्ह्यातील ४०२ आरोग्य सेविका बजावतात. सध्या संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यूने थैमान घातल्याने या आरोग्य सेविका अधिक सतर्क झाल्या आहेत़ त्यांच्या दैनंदिन कामकाजांचा आढावा घेतला असता त्यांना वाढत्या धावपळीत स्वत:चे आरोग्य सांभाळणे कठीण झाले आहे़ नव्याने असांसर्गिक रूग्णांची जबाबदारी देखील आरोग्य सेविकांवर सोपविण्यात आली आहे. रक्तदाब, कर्करोग ह्दयरोग, मधुमेह असे आजार असल्यास रूग्णांना औषोधपचार करण्यासाठी शहराच्या दवाखान्यात नेण्याचे काम त्यांना करावे लागते. ही कामे करताना त्यांना गावपुढाऱ्यांचा त्रास सोसावा लागतो, तो वेगळाच. उपकेंद्र बंद दिसले की थेट आरोग्य सेविकांची तक्रार तालुका पातळीवरच नव्हे तर जिल्हा पातळीवर करण्यात येते़ परंतु या मागील सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न प्रशासनाद्वारे केला जात नाही आणि थेट निलंबनाची कारवाई केली जाते. हा प्रकार अन्यायकारक असल्याचा सूर आरोग्य सेविकांमधून उमटत आहे. वर्षाकाठी २ ते ३ हजार कागदपत्रे आरोग्य योजनेची कागदपत्रे तयार करणे, झेरॉक्स काढणे, औषधांची खरेदी करणे, इलेक्ट्रीक बिल भरणे, पाणीपट्टी भरणे ही कामे अल्प निधीमध्ये आरोग्य सेविकांना करावी लागतात. याकामी ग्रामस्थांनी सहकार्य करणे गरजेचे आहे, असा सूर आरोग्य सेविकांमधून उमटू लागला आहे. एकीकडे ग्रामपातळीवर आरोग्य सेविकांना असामाजीक घटक त्रास देतात तर दुसरीकडे प्रशासनही सहकार्य करीत नसल्याची त्यांची ओरड आहे.