शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

बुद्ध पौर्णिमेला घ्या 'निसर्ग अनुभव'; मचाणीहून करा वन्यप्राण्यांची प्रगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2023 21:24 IST

Amravati News दरवर्षीप्रमाणे यंदा ५ मे राेजी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटकांना वन्यप्राण्यांची प्रगणनावजा दर्शन करता येणार आहे.

अमरावती : दरवर्षीप्रमाणे यंदा ५ मे राेजी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटकांना वन्यप्राण्यांची प्रगणनावजा दर्शन करता येणार आहे. त्यासाठी रात्रीच्या वेळी मचाणीवर थांबण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करणे अनिवार्य असून, २८ एप्रिलपासून संकेतस्थळ सुरू होणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सहा वन्यजीव विभागात 'निसर्ग अनुभव' हा उपक्रम राबविला जात आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत ५ मे रोजी सिपना, गुगामल, अकोट, मेळघाट, अकोला आणि पांढरकवडा या सहा वन्यजीव विभागात 'निसर्ग अनुभव'साठी बोर्डिंग पॉइंट निश्चित करण्यात आले आहेत. ऑनलाइन आरक्षणाकरिता १३२ मचाणींची संख्या आहे. व्हीव्हीआयपींसाठी २४ आरक्षित मचाणी निश्चित करण्यात आल्या आहेत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी केवळ संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. त्याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची बुकिंग ग्राह्य धरण्यात येणार नाही.

बोर्डिंग पॉइंटवर सहभागी झालेल्या निसर्गप्रेमींचे आगमन झाल्यानंतर क्रमवार नोंदणी केली जाणार आहे. त्यानंतर क्रमवार नाेंदणीनुसार ईश्वर चिठ्ठीद्वारे मचाणचे वाटप केले जाणार आहे. निसर्गप्रेमींकरिता ५ मे रोजीचे दुपारी आणि रात्रीचे जेवण, पिण्याचे पाणी उपलब्ध केले जाणार आहे. ६ मे रोजी सकाळी अल्पोपाहाराची व्यवस्था केली जाणार आहे. प्रगणना पूर्ण झाल्यानंतर निसर्ग अनुभव उपक्रमाचा अहवाल, समाविष्ट कर्मचारी, निसर्गप्रेमी यांच्या संख्यासह १५ मेपर्यंत कार्यालयात सादर करण्यात येणार आहे.

वन्यजीव विभागनिहाय हे आहेत बोर्डिंगचे ठिकाण

गुगामल वन्यजीव : सेमाडोह, चिखलदरा, ढाकणा, तारूबांदा

अकोट वन्यजीव : सोमठाणा, धारगड, घटांग, गाविलगड

मेळघाट वन्यजीव : गाविलगड, जामली, अकोट, धुळघाट

अकोला वन्यजीव : वाघा, काटेपूर्णा, कारंजा, सोहोळ, बोथा, ज्ञानगंगा, लोणार

पांढरकवडा वन्यजीव : माथनी, टिपेश्वर, खरबी, कोरटा, बीटरगाव, सोनदाभी

निसर्गप्रेंमीसाठी 'निसर्ग अनुभव' हा उपक्रम ५ मे रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत राबविला जाणार आहे. मचाणीहून वन्यप्राण्यांची प्रगणना केली जाणार आहे. ऑनलाइन बुकिंगशिवाय ते शक्य होणार नाही.

- एम. एन. खैरनार, विभागीय वनाधिकारी, मेळघाट व्याघ्र प्रकल्प

टॅग्स :wildlifeवन्यजीव