शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

अवकाळी, गारपिटीने व-हाडात १३९ कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 15:50 IST

मागील आठवड्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामध्ये अमरावती विभागातील १,१५,२७२ शेतक-यांचे १,१४,६२५ हेक्टरमधील १३९ कोटी ६२ लाख रुपयांचे नुकसान झाले.

अमरावती - मागील आठवड्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामध्ये अमरावती विभागातील १,१५,२७२ शेतक-यांचे १,१४,६२५ हेक्टरमधील १३९ कोटी ६२ लाख रुपयांचे नुकसान झाले. महसूल विभागाच्या १२ फेब्रुवारीच्या पत्रानुसार विभागातील सर्व जिल्ह्यात ३३ ते ५० व त्यापेक्षा अधिक नुकसान याप्रमाणे सर्वेक्षण करण्यात येऊन निधीच्या मागणीसह अहवाल शनिवारी शासनाला सादर झाला. या आपत्तीमध्ये राज्यात सर्वाधिक नुकसान अमरावती विभागात झाले.

जिरायती क्षेत्रात १७ हजार ३८६ शेतक-यांचे १२,३०७ हेक्टरमध्ये ८ कोटी ३६ लाख ८५ हजाराचे ३३ ते ५० टक्के मर्यादेत नुकसान झाले आहे. यामध्ये मका ५५.३३ हेक्टर, ज्वारी १५१.४, तूर १६१.५८ , गहू ४३१ , हरभरा १०,६३७, व इतर ८६९ हेक्टरमध्ये नुकसान झाले. अमरावती जिल्हा ४,८२९ हेक्टर, अकोला ८५०.७०, यवतमाळ १२५१ बुलडाणा २,०१७ व वाशिम जिल्ह्यात ३३५८ हेक्टरमध्ये नुकसान झाले. ३३ ते ५० टक्के मर्यादेत २७,८७९ शेतक-यांचे २१,४०० हेक्टरमधील २८ कोटी ८९ लाखांचे नुकसान झाले. यामध्ये टरबुज ५.८९ हेक्टर, कांदा ६२७.११, कांदा बी ६३.१६, केळी, पपर्ई १२३.४७, गहू ५०५०, हळद ११.८२, हरभरा १०,५३३, मका १८४, भुईमुग २१.८, भाजीपाला ८४३.१९ व इतर पिकांचे ३९३५ हेक्टरमध्ये नुकसान झाले. यामध्ये अमरावती ३,४६६ हेक्टर, अकोला ४४३.५२, यवतमाळ ९२२, बुलडाणा २१९ व वाशिम जिल्ह्यात २१९ हेक्टरमध्ये नुकसान झाले. ३३ ते ५० टक्कयांमध्ये ५९८८ शेतकºयांचे ५०४४ हेक्टरमध्ये ९ कोटी १३ लाखांचे नुकसान झाले. यामध्ये संत्रा, लिंबू, मोसंबी ४६७५ हेक्टर, आंबा ५९, डाळिंब १३९.२९ हेक्टर, केळी ४१.४३, पपई ८.७३ व इतर पिकांचे १४२ हेक्टरमध्ये नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक अमरावती जिल्ह्यात ६.६८ कोटी, अकोला १.०१ कोटी, यवतमाळ ४४.६५ लाख, बुलडाणा ३३.३१ लाख, बुलडाणा ६५.२३ लाखांचे नुकसान झाले आहे.

 ६४ हजार शेतक-यांचे ५० टक्क्यांवर पिके बाधित- या आपत्तीमध्ये ६४,०१९ शेतक-यांचे ७५,९०२ हेक्टरमध्ये ९३ कोटी २४ लाख ३४ हजारांचे नुकसान झालेले आहे.- जिरायती क्षेत्रात ३१,९०५ शेतक-यांचे २७,१६३ हेक्टरमध्ये १८ कोटी ४९ लाख ४७ हजारांचे नुकसान झाले.- बागायती क्षेत्रात ११,०५० हजार शेतक-यांचे २८,८४५ हेक्टरमध्ये  ३८ कोटी ९४ लाखांचे नुकसान झालेले आहे.- फळपिकामध्ये २१,०६४ शेतकºयांचे १९,८९३ हेक्टरमध्ये ३५ कोटी ८० लाख ७७ हजारांचे नुकसान झाले.

टॅग्स :HailstormगारपीटRainपाऊसAmravatiअमरावती