शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
5
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
6
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
7
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
8
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
9
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
10
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
11
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
12
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
13
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
14
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
15
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
16
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
17
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
18
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
19
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
20
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा

विद्यार्थ्यांच्या मदतीला गुरुजींची कॉपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 05:00 IST

पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात, तेव्हा विद्यार्थी हक्काने गुरुजींना अडचण सांगून मदत करण्यास सांगतात. शाळेचा विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यास निकालाची टक्केवारी वाढेल या दृष्टिकोनातून गुरुजीच विद्यार्थ्यांना मदत करताना दिसत आहेत. मेळघाटातील विद्यार्थी पूर्णत: ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले. त्यामुळे ना ऑफलाईन ना ऑनलाईन असलेल्या या विद्यार्थ्यांची ढकलगाडीसारखी अवस्था झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनरेंद्र जावरे अमरावती : ४ मार्चपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. यंदा शाळा तेथे परीक्षा केंद्र दिल्यामुळे विद्यार्थी बिनधास्त झाले आहेत.  विद्यार्थ्यांच्या मदतीला गुरुजींची कॉपी असल्याने कुठेच अडचण नसल्याचे केंद्रांवर दिसून येत आहे.पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात, तेव्हा विद्यार्थी हक्काने गुरुजींना अडचण सांगून मदत करण्यास सांगतात. शाळेचा विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यास निकालाची टक्केवारी वाढेल या दृष्टिकोनातून गुरुजीच विद्यार्थ्यांना मदत करताना दिसत आहेत.मेळघाटातील विद्यार्थी पूर्णत: ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले. त्यामुळे ना ऑफलाईन ना ऑनलाईन असलेल्या या विद्यार्थ्यांची ढकलगाडीसारखी अवस्था झाली आहे. 

  ‘लोकमत’ने काय पाहिले? 

आमचेच विद्यार्थी असल्याने मदत : यंदा शाळेत परीक्षा होत आहेत. विद्यार्थी व शिक्षक एकमेकांना चांगले ओळखत असल्यामुळे त्यांना थोडीफार मदत करावी लागते; मुख्याध्यापकांकडून प्रत्यक्ष मदतीसाठी मनाई केलेली आहे, असे सांगितले. 

काय करावे? उत्तर सांगावे लागते : यंदा प्रथमच शाळेतील विद्यार्थी शाळेतच परीक्षा देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एखाद्या प्रश्नाचे उत्तर विचारले, तर त्याला मार्गदर्शन करण्यात गैर काय? विद्यार्थ्यांना उत्तर सांगावेच लागते, असे प्रत्युत्तर मिळाले.

अडचण आल्यास विद्यार्थीच विचारतात! : शाळेतच परीक्षा केंद्र. विद्यार्थीही आमचेच असल्यामुळे आमच्याकडून मदतीची अपेक्षा आहेच. परीक्षेत अडचण आल्यास, विद्यार्थ्याने उत्तर विचारल्यास, त्याला सांगावेच लागते. विद्यार्थी उत्तीर्ण होत असेल व निकालाची टक्केवारी वाढत असेल, तर कोण मदत करणार नाही.

आतापर्यंत २६ विद्यार्थ्यांवर कारवाई- ४ मार्चपासून बारावी परीक्षेला सुरुवात झाली. इंग्रजीचा पहिला पेपर शांततेत पार पडला. विभागात बारावीचे एकूण ३९७ केंद्र आहेत. त्यापैकी ग्रामीण व शहरी भागातील भरारी पथकांनी कारवाई करीत पहिल्याच दिवशी २६ विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे.

बारावीच्या परीक्षेला ४ मार्चपासून सुरुवात झाली आहे. परीक्षेमध्ये कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. भरारी पथक, रनर यांच्या माध्यमातूनही गैरप्रकार रोखण्यासाठी ‘वाॅच’ ठेवला जात आहे.- प्रफुल्ल कचवे शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

 

टॅग्स :examपरीक्षाHSC / 12th Exam12वी परीक्षा