शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
3
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
4
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
5
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
6
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
8
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
9
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
10
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
11
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
12
गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
13
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
14
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
15
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
16
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
17
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
18
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
19
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
20
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?

विद्यार्थ्यांच्या मदतीला गुरुजींची कॉपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 05:00 IST

पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात, तेव्हा विद्यार्थी हक्काने गुरुजींना अडचण सांगून मदत करण्यास सांगतात. शाळेचा विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यास निकालाची टक्केवारी वाढेल या दृष्टिकोनातून गुरुजीच विद्यार्थ्यांना मदत करताना दिसत आहेत. मेळघाटातील विद्यार्थी पूर्णत: ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले. त्यामुळे ना ऑफलाईन ना ऑनलाईन असलेल्या या विद्यार्थ्यांची ढकलगाडीसारखी अवस्था झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कनरेंद्र जावरे अमरावती : ४ मार्चपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. यंदा शाळा तेथे परीक्षा केंद्र दिल्यामुळे विद्यार्थी बिनधास्त झाले आहेत.  विद्यार्थ्यांच्या मदतीला गुरुजींची कॉपी असल्याने कुठेच अडचण नसल्याचे केंद्रांवर दिसून येत आहे.पेपर सोडविताना विद्यार्थ्यांना अडचणी येतात, तेव्हा विद्यार्थी हक्काने गुरुजींना अडचण सांगून मदत करण्यास सांगतात. शाळेचा विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यास निकालाची टक्केवारी वाढेल या दृष्टिकोनातून गुरुजीच विद्यार्थ्यांना मदत करताना दिसत आहेत.मेळघाटातील विद्यार्थी पूर्णत: ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले. त्यामुळे ना ऑफलाईन ना ऑनलाईन असलेल्या या विद्यार्थ्यांची ढकलगाडीसारखी अवस्था झाली आहे. 

  ‘लोकमत’ने काय पाहिले? 

आमचेच विद्यार्थी असल्याने मदत : यंदा शाळेत परीक्षा होत आहेत. विद्यार्थी व शिक्षक एकमेकांना चांगले ओळखत असल्यामुळे त्यांना थोडीफार मदत करावी लागते; मुख्याध्यापकांकडून प्रत्यक्ष मदतीसाठी मनाई केलेली आहे, असे सांगितले. 

काय करावे? उत्तर सांगावे लागते : यंदा प्रथमच शाळेतील विद्यार्थी शाळेतच परीक्षा देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एखाद्या प्रश्नाचे उत्तर विचारले, तर त्याला मार्गदर्शन करण्यात गैर काय? विद्यार्थ्यांना उत्तर सांगावेच लागते, असे प्रत्युत्तर मिळाले.

अडचण आल्यास विद्यार्थीच विचारतात! : शाळेतच परीक्षा केंद्र. विद्यार्थीही आमचेच असल्यामुळे आमच्याकडून मदतीची अपेक्षा आहेच. परीक्षेत अडचण आल्यास, विद्यार्थ्याने उत्तर विचारल्यास, त्याला सांगावेच लागते. विद्यार्थी उत्तीर्ण होत असेल व निकालाची टक्केवारी वाढत असेल, तर कोण मदत करणार नाही.

आतापर्यंत २६ विद्यार्थ्यांवर कारवाई- ४ मार्चपासून बारावी परीक्षेला सुरुवात झाली. इंग्रजीचा पहिला पेपर शांततेत पार पडला. विभागात बारावीचे एकूण ३९७ केंद्र आहेत. त्यापैकी ग्रामीण व शहरी भागातील भरारी पथकांनी कारवाई करीत पहिल्याच दिवशी २६ विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे.

बारावीच्या परीक्षेला ४ मार्चपासून सुरुवात झाली आहे. परीक्षेमध्ये कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. भरारी पथक, रनर यांच्या माध्यमातूनही गैरप्रकार रोखण्यासाठी ‘वाॅच’ ठेवला जात आहे.- प्रफुल्ल कचवे शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

 

टॅग्स :examपरीक्षाHSC / 12th Exam12वी परीक्षा