शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

‘बारूद’ गँगच्या कारवाया आता ‘आरडीएक्स’ नावाने

By admin | Updated: August 17, 2015 00:01 IST

जुळ्या नगरीत ‘बारूद गँग’ या नावाने दहशत पसरविणाऱ्या मस्तवाल गुंडांनी अवघ्या महिनाभरापूर्वी टोळीचे नाव बदलवून ‘आरडीएक्स गँग’ केल्याची ...

अमरावती / अचलपूर : जुळ्या नगरीत ‘बारूद गँग’ या नावाने दहशत पसरविणाऱ्या मस्तवाल गुंडांनी अवघ्या महिनाभरापूर्वी टोळीचे नाव बदलवून ‘आरडीएक्स गँग’ केल्याची खळबळजनक माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे. वाळू तस्करीला विरोध केल्याच्या कारणावरून अचलपूर येथील अमित बटाऊवाले नामक तरण्याताठ्या युवकाचा निष्कारण बळी गेला. पोलिसांचा वरदहस्त आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे मनोबल उंचावलेल्या गुंडांनी दिवसा-ढवळ्या अमित या मितभाषी तरूणाला अत्यंत क्रूर पध्दतीने यमसदनी धाडले ‘बारूद’ आणि आता ‘आरडीएक्स’नावाने हैदोस घालणाऱ्या, दहशत पसरविणाऱ्या ‘त्या’ गुंडांना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काही वर्षांपूर्वी अचलपूर उपजिल्हा रूग्णालय परिसराला अतिक्रमणाने वेढले असताना तत्कालीन नगराध्यक्ष व ठाणेदारांनी अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी या घटनेतील आरोपी नगरसेवक मो.शाकीर हुसैन याने हस्तक्षेप केल्याने अतिक्रमण हटविता आले नव्हते. ‘बारूद गँग’च्या सदस्यांचा उपजिल्हा रूग्णालय परिसरात ‘अड्डा’ होता. अनेक गैरव्यव्यवहार येथून चालत असत. त्यामुळेच अतिक्रमण हटविण्यास विरोध झाला होता. त्यानंतर सहा वर्षांपूर्वी मुलींच्या छेडखानीच्या मुद्यावरून मोहन ठाकूर यांना मारहाण झाली होती.आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता अमरावती / अचलपूर : या कारणावरून परतवाड्यातील मोहन ठाकूर यांना उपजिल्हा रूग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गाठून बारूद गँगच्या सदस्यांनी पाईप-लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली होती. यात ठाकूर यांचे पाय कायमस्वरूपी निकामी झाले. दिवसाढवळ्या एखाद्या माणसाला अपंगत्व येईपर्यंत मारहाण करणाऱ्या गुंडांच्या मुसक्या पोलिसांनी त्यावेळीच आवळल्या असत्या तर आज या गुंडांचे मनोबल एवढे वाढले नसते, असा नागरिकांचा सूर आहे. सुरूवातीची कुजबूज आता उघड-उघड चर्चेत बदलली असून येथील जनता उघडपणे रोष व्यक्त करू लागली आहे. वाळू तस्करांचे गुन्हेगारीच्या सर्वच प्रकारात असलेले हस्तक्षेप, त्यांना अचलपूर-परतवाड्याखेरीज बाहेरच्या गुन्हेगारी जगतातील दिग्गजांचे असलेले अप्रत्यक्ष समर्थन, राजकीय नेतृत्वाने आणि प्रशासनानेदेखील या गुंडांच्या कारवायांकडे हेतुपुरस्सर केलेले दुर्लक्ष या सर्वच बाबी आणि इतरही शंकाकुशंका आता उघडपणे व्यक्त होऊ लागल्या आहेत. कुणाच्या छत्रछायेखाली ही ‘बारूद गँग’ पनपली?, बाहेरच्या सराईत गुन्हेगारांचे यांना समर्थन तर नाही ना?, दिवसाढवळ्या हत्या करेपर्यंत या गुंडांची मजल गेलीच कशी?, यांचे मनोबल कुणी उंचावले? या सर्व घटकांच्या आधारे आता या घटनेचा तपास व्हावा, असा जुळ्या नगरीतील सामान्य जनतेचा सूर आहे. तुर्तास बारूद गँगचे सदस्य शहरातून फरार आहेत. यासंदर्भात प्रक्षोभक संदेशांचे आदानप्रदान भ्रमणध्वनीवरून सुरू असल्याची चर्चासुध्दा जुळ्या नगरीत सुरू आहे. या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या मोहन बटाऊवाले यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तालुक्यातील तणाव सध्या निवळला असला तरी लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया मात्र अद्यापही उमटत आहेत. याप्रकरणी आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना २० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून त्यांच्या चौकशीदरम्यान अनेक महत्त्वपूर्ण तथ्ये बाहेर पडू शकतात. (प्रतिनिधी)