शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

भूजल पातळी : रेड झोनमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:01 IST

अचलपूर तालुक्यात २.३५ मीटर, अमरावती ०.४७ मीटर, भातकुली ०.५९ मीटर, चांदूर रेल्वे ०.८८ मीटर, धामणगाव रेल्वे ०.६६ मीटर, चिखलदरा १.१९ मीटर, चिखलदरा २.२२ मीटर, धारणी १.६३ मीटर, मोर्शी २.०७ मीटर, नांदगाव खंडेश्वर १.३९ मीटर, तिवसा १.६३ मीटर व वरूड तालुक्यात १.४६ मीटरने वाढ झाली आहे. याउलट अंंजनगाव सुर्जी तालुक्यात २.७० मीटर व दर्यापूर तालुक्यात ०.०८ मीटरने भूजलात तूट आलेली आहे.

ठळक मुद्देजीएसडीए : १२ तालुक्यात दिलासा, दोन तालुक्यांमध्ये घट

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील वर्षी ऑगस्टनंतर झालेला दमदार पाऊस, नव्याने झालेली जलसंधारणाची कामे यामुळे जलपुर्नभरण झाल्याने जिल्ह्यात १२ तालुक्यांतील भूजलपातळीत सरासरी १.३८ मीटरने वाढ झालेली आहे. यात रेड झोनमध्ये दिलासा मिळाला आहे. त्याच्या तुलनेत खारपाणपट्ट्यातील अंजनगाव सुर्जी व दर्यापूर तालुक्यात घट आलेली आहे. जिल्ह्यात १५० निरीक्षण विहिरींच्या पाणीपातळीचे निरीक्षण नोंदविल्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे (जीएसडीए) हे निरीक्षण नोंदविण्यात आले.सदर विभागाद्वारे मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तालुकानिहाय भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास करून जिल्ह्यातील भूजल स्थितीच्या तालुकानिहाय नोंदी जाहीर करण्यात आलेल्या आहे. लॉकडाऊनमुळे या विभागाद्वारे मार्चअखेरचे निरीक्षण नोंदविण्यात आलेले नव्हते. त्यामुळे जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील भूजलाची स्थिती कशी आहे, या विषयीची सर्वत्र उत्सुकता असताना या आठवड्यात जिल्हा भूजल स्थिती जाहीर झालेली आहे.भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे जिल्ह्यातील १५० निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीच्या नोंदी घेतल्यानंतर भूजलाची जिल्हास्थिती स्पष्ट झालेली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यात २.३५ मीटर, अमरावती ०.४७ मीटर, भातकुली ०.५९ मीटर, चांदूर रेल्वे ०.८८ मीटर, धामणगाव रेल्वे ०.६६ मीटर, चिखलदरा १.१९ मीटर, चिखलदरा २.२२ मीटर, धारणी १.६३ मीटर, मोर्शी २.०७ मीटर, नांदगाव खंडेश्वर १.३९ मीटर, तिवसा १.६३ मीटर व वरूड तालुक्यात १.४६ मीटरने वाढ झाली आहे. याउलट अंंजनगाव सुर्जी तालुक्यात २.७० मीटर व दर्यापूर तालुक्यात ०.०८ मीटरने भूजलात तूट आलेली आहे. खारपाणपट्ट्यातील दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील काही भागांत भूजलाचा उपसा होत नसताना घट धक्कादायक आहे.अंजनगाव, दर्यापूरसाठी धोक्याची घंटादर्यापूर तालुक्यासह अंजनगाव सुर्जी तालुक्याचा काही भाग हा खारपाणपट्यात येतो. त्यामुळे या तालुक्यात भूजलाचा उपसा साहजिकच कमी आहे. या उलट जलसंधारणाची सर्वाधिक कामे या तालुक्यांमध्येच आहे. गतवर्षी दर्यापूर तालुक्यात सरासरीच्या ११० व अंजनगाव सुर्जी तालुक्यांत सरासरीच्या १०१ टक्के पाऊस झालेला असताना या दोन्ही तालुक्यात भूजलात घट ही आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे.तूट असणाऱ्या अचलपूर तालुक्यात वाढदोन वर्षांपासून विदर्भात भूजलाची सर्वाधिक तूट असणाºया अचलपूर तालुक्यात यंदा सर्वाधिक २.३५ मीटरने वाढ झाल्याने दिलासा मिळाला आहे. गतवर्षी जिल्ह्यात सर्वाधिक कमी म्हणजे सरासरीच्या ७० टक्केच पाऊस झालेल्या भातकुली तालुक्यात भूजलात मोठ्या प्रमाणात तूट येणार, अशी अपेक्षा असताना या तालुक्यात भूजल पातळीत ०.५९ मीटरने वाढ झाली. हा सुखद धक्का आहे.मोर्शी, वरूड तालुक्यांना दिलासाभूजलाचा अमर्याद उपशाच्या मोर्शी व वरूड तालुक्यात महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ नुसार उपशावर नियंत्रण, याच अधिनियमाचे आठ (१) मधील तरतुदीनुसार नवीन विहिरीला बंदी आहे. मात्र, मोर्शी तालुक्यात २.०७ मी. व वरुड तालुक्यात १.४६ मीटरने भूजलात वाढ झाली आहे.

टॅग्स :Waterपाणी