शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

भूजल पातळी : रेड झोनमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 05:01 IST

अचलपूर तालुक्यात २.३५ मीटर, अमरावती ०.४७ मीटर, भातकुली ०.५९ मीटर, चांदूर रेल्वे ०.८८ मीटर, धामणगाव रेल्वे ०.६६ मीटर, चिखलदरा १.१९ मीटर, चिखलदरा २.२२ मीटर, धारणी १.६३ मीटर, मोर्शी २.०७ मीटर, नांदगाव खंडेश्वर १.३९ मीटर, तिवसा १.६३ मीटर व वरूड तालुक्यात १.४६ मीटरने वाढ झाली आहे. याउलट अंंजनगाव सुर्जी तालुक्यात २.७० मीटर व दर्यापूर तालुक्यात ०.०८ मीटरने भूजलात तूट आलेली आहे.

ठळक मुद्देजीएसडीए : १२ तालुक्यात दिलासा, दोन तालुक्यांमध्ये घट

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मागील वर्षी ऑगस्टनंतर झालेला दमदार पाऊस, नव्याने झालेली जलसंधारणाची कामे यामुळे जलपुर्नभरण झाल्याने जिल्ह्यात १२ तालुक्यांतील भूजलपातळीत सरासरी १.३८ मीटरने वाढ झालेली आहे. यात रेड झोनमध्ये दिलासा मिळाला आहे. त्याच्या तुलनेत खारपाणपट्ट्यातील अंजनगाव सुर्जी व दर्यापूर तालुक्यात घट आलेली आहे. जिल्ह्यात १५० निरीक्षण विहिरींच्या पाणीपातळीचे निरीक्षण नोंदविल्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे (जीएसडीए) हे निरीक्षण नोंदविण्यात आले.सदर विभागाद्वारे मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात तालुकानिहाय भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास करून जिल्ह्यातील भूजल स्थितीच्या तालुकानिहाय नोंदी जाहीर करण्यात आलेल्या आहे. लॉकडाऊनमुळे या विभागाद्वारे मार्चअखेरचे निरीक्षण नोंदविण्यात आलेले नव्हते. त्यामुळे जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील भूजलाची स्थिती कशी आहे, या विषयीची सर्वत्र उत्सुकता असताना या आठवड्यात जिल्हा भूजल स्थिती जाहीर झालेली आहे.भूजल सर्वेक्षण विभागाद्वारे जिल्ह्यातील १५० निरीक्षण विहिरींच्या स्थिर पातळीच्या नोंदी घेतल्यानंतर भूजलाची जिल्हास्थिती स्पष्ट झालेली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यात २.३५ मीटर, अमरावती ०.४७ मीटर, भातकुली ०.५९ मीटर, चांदूर रेल्वे ०.८८ मीटर, धामणगाव रेल्वे ०.६६ मीटर, चिखलदरा १.१९ मीटर, चिखलदरा २.२२ मीटर, धारणी १.६३ मीटर, मोर्शी २.०७ मीटर, नांदगाव खंडेश्वर १.३९ मीटर, तिवसा १.६३ मीटर व वरूड तालुक्यात १.४६ मीटरने वाढ झाली आहे. याउलट अंंजनगाव सुर्जी तालुक्यात २.७० मीटर व दर्यापूर तालुक्यात ०.०८ मीटरने भूजलात तूट आलेली आहे. खारपाणपट्ट्यातील दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील काही भागांत भूजलाचा उपसा होत नसताना घट धक्कादायक आहे.अंजनगाव, दर्यापूरसाठी धोक्याची घंटादर्यापूर तालुक्यासह अंजनगाव सुर्जी तालुक्याचा काही भाग हा खारपाणपट्यात येतो. त्यामुळे या तालुक्यात भूजलाचा उपसा साहजिकच कमी आहे. या उलट जलसंधारणाची सर्वाधिक कामे या तालुक्यांमध्येच आहे. गतवर्षी दर्यापूर तालुक्यात सरासरीच्या ११० व अंजनगाव सुर्जी तालुक्यांत सरासरीच्या १०१ टक्के पाऊस झालेला असताना या दोन्ही तालुक्यात भूजलात घट ही आगामी काळासाठी धोक्याची घंटा आहे.तूट असणाऱ्या अचलपूर तालुक्यात वाढदोन वर्षांपासून विदर्भात भूजलाची सर्वाधिक तूट असणाºया अचलपूर तालुक्यात यंदा सर्वाधिक २.३५ मीटरने वाढ झाल्याने दिलासा मिळाला आहे. गतवर्षी जिल्ह्यात सर्वाधिक कमी म्हणजे सरासरीच्या ७० टक्केच पाऊस झालेल्या भातकुली तालुक्यात भूजलात मोठ्या प्रमाणात तूट येणार, अशी अपेक्षा असताना या तालुक्यात भूजल पातळीत ०.५९ मीटरने वाढ झाली. हा सुखद धक्का आहे.मोर्शी, वरूड तालुक्यांना दिलासाभूजलाचा अमर्याद उपशाच्या मोर्शी व वरूड तालुक्यात महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ नुसार उपशावर नियंत्रण, याच अधिनियमाचे आठ (१) मधील तरतुदीनुसार नवीन विहिरीला बंदी आहे. मात्र, मोर्शी तालुक्यात २.०७ मी. व वरुड तालुक्यात १.४६ मीटरने भूजलात वाढ झाली आहे.

टॅग्स :Waterपाणी