शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पश्चिम विदर्भात २२ तालुक्यातील भूजलात तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:09 IST

गजानन मोहोड अमरावती : पश्चिम विदर्भात यंदा पावसाने ओढ दिली असली तरीही जून महिन्यात ३४ तालुक्यातील भूजलात सरासरीच्या तुलनेत ...

गजानन मोहोड

अमरावती : पश्चिम विदर्भात यंदा पावसाने ओढ दिली असली तरीही जून महिन्यात ३४ तालुक्यातील भूजलात सरासरीच्या तुलनेत वाढ झाल्याचे सुखद चित्र आहे. शिवाय २२ तालुक्यातील भूजलात अंशत: घट झालेली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने अमरावती विभागातील ६५१ विहिरींच्या नोंदीनंतर हे निरीक्षण नोंदविले आहे.

विभागात गतवर्षी सरासरी ७६१.८ मिमी सरासरीच्या तुलनेत ७८६ मिमी पावसाची नोंद झाली, याची १०३ टक्केवारी आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यात ६७ दिवस पावसाचे राहिले. बुलडाणा व वाशिम वगळता अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यात सरासरीच्या आतच पाऊस झाला. मात्र, सप्टेंबरपश्चात परतीचा पाऊस व नंतर सातत्याने डिसेंबरपर्यंत अवकाळीचा पाऊस झाल्याने विभागात भूजल पुनर्भरण बऱ्यापैकी झाले व त्याचाच आता परिणाम दिसत आहे.

काही तालुक्यात जलसंधारणाची कामे झाल्याने भूजलाचे पुनर्भरण झाले. याशिवाय जमिनीत मोठ्या प्रमाणात असलेली आर्द्रता व प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध झाल्याने भूजलाच्या वारेमाप उपशात कमी आली. परिणामी काही प्रमाणावर सरासरीच्या तुलनेत भूजलात वाढ झाली आहे. विभागातील ५६ पैकी १९ तालुक्यात फक्त १ मीटरपर्यंत तूट आली, तर दोन तालुक्यात १ ते २ मीटरपर्यंत घट झाली. फक्त अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात दोन मीटरपेक्षा जास्त तूट आलेली आहे.

बॉक्स

या तालुक्यातील भूजलात तूट

अमरावती जिल्ह्यात तिवसा, चांदूरबाजार, दर्यापूर, अंजनगाव अकोला जिल्ह्यात अकोला, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर बुलडाणा जिल्ह्यात नांदुरा, मोताळा, जळगाव जामोद, संग्रामपूर तर यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ, कळंब, महागाव, केळापूर, राळेगाव, वणी, मारेगाव व झरी जामणी तालुक्यातील भूजलात तूट आलेली आहे.

बॉक्स

भूजलात वाढ झालेली तालुके

अमरावती जिल्ह्यात अमरावती, भातकुली, नांदगाव, चांदूर रेल्वे, मोर्शी, वरुड, अचलपूर, चिखलदरा, धारणी व धामणगाव, अकोला जिल्ह्यात बार्शी टाकळी वाशिम जिल्ह्यात वाशिम, मालेगाव, रिसोड, मंगरुळ पीर, मानोरा, कारंजा बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, मलकापूर खामगाव, शेगाव यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव, आर्णी, दारव्हा, दिग्रस, नेरपुसद, उमरखेड व घाटंजी तालुक्यातील भूजलात वाढ झालेली आहे.