शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

अतिखोल जलधारातून उपस्यामुळे भूजलात घट; ‘जीएसडीए’चा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 20:46 IST

राज्याच्या एकूण क्षेत्राफळापैकी ८२ टके भूभाग हा बेसाल्ट नावाच्या कठीन अया अग्निजन्य खडकाने व्यापला आहे.

अमरावती : राज्यातील बहुतेक भागात ६० मीटरपेक्षा अधिक अतिखोल विंधन विहिरींमधून पाण्याचा उपसा केला जात आहे. काही भागांत १००० ते १२०० फुटांपर्यंत खोलीच्या विहिरी सिंचनासाठी कार्यरत आहेत. भूजल व भूशास्त्रीय दृष्टिकोनातून २०० फुटांपेक्षा अधिक खोलपर्यंत होणारा पाण्याचा उपसा पुनर्भरीत होण्यासाठी शेकडो वर्षांचा कालावधी लागतो. भूजलात कमी येण्याचे हे एक महत्वपुर्ण कारण असल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण (जीएसडीए) च्या अहवालात नोंदविले आहे.

राज्याच्या एकूण क्षेत्राफळापैकी ८२ टके भूभाग हा बेसाल्ट नावाच्या कठीन अया अग्निजन्य खडकाने व्यापला आहे. यामध्ये पाणी साठवण क्षमता ही अत्यंत कमी म्हणजेच १ ते ३ टक्केच आहे. राज्याचा १० टक्के भूभाग हा कठीण अशा रुपांतरित खडकांनी व्यापला आहे. त्यामध्येदेखील पाणी साठवणीचे हेच प्रमाण आहे. उर्वरित ८ टक्के भाग हा खडकांनी व गाळाने व्यापला आहे. याच स्थरात ५ ते १० टक्कयांपर्यंत पाण्याची उपलब्धता आहे. भौगोलिक संरचनेचा विचार करता २८ टक्के भूभाग हा डोंगरमाथ्याचा व उताराचा आहे. याच प्रदेशात अधिक प्रमाणात जल अपधाव होत आहे. मात्र, भूजल उपलब्धता त्यामानाने कमी आहे. राज्यात एकूण ४४ टक्के भूभाग हा पठारी आहे. या भूगर्भात पाणी मुरण्याचे प्रमाण मध्यम स्वरुपाचे आहे. या व्यतिरिक्त २८ टक्के भूभाग हा नद्याखोºयांचा सपाट प्रदेश आहे. त्यामुळे भूजलाची उपलब्धता चांगल्या प्रकारे होत आहे.भूजलात कमी येण्याची कारणे

सूक्ष्म सिंचनावरचे क्षेत्र अद्यापही मर्यादेत असल्यामुळे तसेच पारंपरिक पिकांसठी १०० टक्के सूक्ष्म सिंचन व्यवस्था अस्तित्वात न आल्यामुळे बºयाच भागात प्रवाही पद्धतीने सिंचन केले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. बहुवार्षिक पिकांकरिता भूजलाचा अधिक उपसा होत आहे. पावसाचा खंड पडल्यास किंचा पर्जन्यमान कमी असल्यास शेतकरी खरीप पिकांसाठी अधिक भूजलाचा उपसा करून संरक्षित सिंचन करतात. त्यामुळे ज्यावेळी भूजलाचे पुनर्भरण होणे महत्त्वाचे असते, नेमके त्याचवेळी भूजलाचा उपसा होत असल्याने भूजल पातळीत कमी येत असल्याचे निरीक्षण जीएसडीए विभागाने नोंदविले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती