शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

अतिखोल जलधारातून उपस्यामुळे भूजलात घट; ‘जीएसडीए’चा अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 20:46 IST

राज्याच्या एकूण क्षेत्राफळापैकी ८२ टके भूभाग हा बेसाल्ट नावाच्या कठीन अया अग्निजन्य खडकाने व्यापला आहे.

अमरावती : राज्यातील बहुतेक भागात ६० मीटरपेक्षा अधिक अतिखोल विंधन विहिरींमधून पाण्याचा उपसा केला जात आहे. काही भागांत १००० ते १२०० फुटांपर्यंत खोलीच्या विहिरी सिंचनासाठी कार्यरत आहेत. भूजल व भूशास्त्रीय दृष्टिकोनातून २०० फुटांपेक्षा अधिक खोलपर्यंत होणारा पाण्याचा उपसा पुनर्भरीत होण्यासाठी शेकडो वर्षांचा कालावधी लागतो. भूजलात कमी येण्याचे हे एक महत्वपुर्ण कारण असल्याचे निरीक्षण भूजल सर्वेक्षण (जीएसडीए) च्या अहवालात नोंदविले आहे.

राज्याच्या एकूण क्षेत्राफळापैकी ८२ टके भूभाग हा बेसाल्ट नावाच्या कठीन अया अग्निजन्य खडकाने व्यापला आहे. यामध्ये पाणी साठवण क्षमता ही अत्यंत कमी म्हणजेच १ ते ३ टक्केच आहे. राज्याचा १० टक्के भूभाग हा कठीण अशा रुपांतरित खडकांनी व्यापला आहे. त्यामध्येदेखील पाणी साठवणीचे हेच प्रमाण आहे. उर्वरित ८ टक्के भाग हा खडकांनी व गाळाने व्यापला आहे. याच स्थरात ५ ते १० टक्कयांपर्यंत पाण्याची उपलब्धता आहे. भौगोलिक संरचनेचा विचार करता २८ टक्के भूभाग हा डोंगरमाथ्याचा व उताराचा आहे. याच प्रदेशात अधिक प्रमाणात जल अपधाव होत आहे. मात्र, भूजल उपलब्धता त्यामानाने कमी आहे. राज्यात एकूण ४४ टक्के भूभाग हा पठारी आहे. या भूगर्भात पाणी मुरण्याचे प्रमाण मध्यम स्वरुपाचे आहे. या व्यतिरिक्त २८ टक्के भूभाग हा नद्याखोºयांचा सपाट प्रदेश आहे. त्यामुळे भूजलाची उपलब्धता चांगल्या प्रकारे होत आहे.भूजलात कमी येण्याची कारणे

सूक्ष्म सिंचनावरचे क्षेत्र अद्यापही मर्यादेत असल्यामुळे तसेच पारंपरिक पिकांसठी १०० टक्के सूक्ष्म सिंचन व्यवस्था अस्तित्वात न आल्यामुळे बºयाच भागात प्रवाही पद्धतीने सिंचन केले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. बहुवार्षिक पिकांकरिता भूजलाचा अधिक उपसा होत आहे. पावसाचा खंड पडल्यास किंचा पर्जन्यमान कमी असल्यास शेतकरी खरीप पिकांसाठी अधिक भूजलाचा उपसा करून संरक्षित सिंचन करतात. त्यामुळे ज्यावेळी भूजलाचे पुनर्भरण होणे महत्त्वाचे असते, नेमके त्याचवेळी भूजलाचा उपसा होत असल्याने भूजल पातळीत कमी येत असल्याचे निरीक्षण जीएसडीए विभागाने नोंदविले आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती