शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

भूजलपातळीत १२ फुटांनी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:19 IST

पावसाळ्यात सरासरीहून ३६ टक्के पाऊस कमी झाल्याचे परिणाम जाणवायला लागले आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने जानेवारीअखेर केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष धक्कादायक आहेत.

ठळक मुद्देउपशावर निर्बंध हवेत : १३ तालुके माघारले, दर्यापुरात एक मीटरने वाढ

गजानन मोहोड ।आॅनलाईन लोकमतअमरावती : पावसाळ्यात सरासरीहून ३६ टक्के पाऊस कमी झाल्याचे परिणाम जाणवायला लागले आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने जानेवारीअखेर केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. पाच वर्षांच्या तुलनेत यंदा दर्यापूर वगळता उर्वरित १३ तालुक्यांत जमिनीतील पाण्याची पातळी १२ फुटांपर्यंत (४ मीटर) खोल गेलेली आहे. अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात भूजलस्तर सर्वाधिक कमी झालेला आहे.भूजल पातळीमधील तूट दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यातील ८० गावांना मार्चपर्यंत तर एप्रिल ते जून या कालावधीत ११ तालुक्यांतील १२९ गावांत भीषण पाणीटंचाई राहणार आहे. जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग बसॉल्ट खडकाचा व २५ टक्के पूर्णा नदीच्या गाळाने व्यापला आहे.स्रोत संरक्षित करण्यावर भरजिल्ह्यात सरासरी १० ते १२ मीटरपर्यंतची खोली भूजल पुनर्भरणास योग्य आहे. पावसाळ्यात सरासरी ३६ टक्क्यांनी पाऊस कमी झाल्याने अपेक्षित पुनर्भरण झालेले नाही. लघुपाणलोट क्षेत्रातील (रन आॅफ झोन) निरीक्षण विहिरीतील पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील आठ (१) च्या तरतुदीनुसार या गावांमध्ये पिण्याचे पाण्याचे स्रोत संरक्षित करण्यासाठी कार्यवाही होणे आवश्यक असल्याचा अहवाल यापूर्वीच भूजल विभागाने जिल्हा प्रशासनाला दिलेला आहे. चिखलदरा व धारणी तालुक्यातील गावे डोंगराळ भागात आहेत. येथे भूस्तर जलग्रहण क्षमता कमी असल्याने भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. वरूड व मोर्शी तालुक्याचा भाग अतिविकसित पाणलोट क्षेत्रात समाविष्ट असल्याने व येथे बारमाही सिंचन जास्त प्रमाणात असल्याने विहिरी व विंधन विहिरीद्वारे भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे येथील उपशावर जिल्हा प्रशासनाद्वारा निर्बंध आणावे लागणार आहे.पाणलोट क्षेत्रात नव्या विहिरीस मनाईवरूड व मोर्शी हे तालुके अतिविकसित पाणलोट क्षेत्र आहेत. या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपसा होत असल्याने, येथील भूजल उपशावर नियंत्रन ठेवणे आवश्यक आहे. या पाणलोट क्षेत्रात नवीन विहीर खोदण्यास महाराष्ट्र भूजल (विकास आणि व्यवस्थापन) अधिनियम २००८ मधील ८ (१) तरतुदीनुसार बंदी घालणे आवश्यक असल्याचा अहवाल यापूर्वीच जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आलेला आहे.तालुकानिहाय पाणीपातळीतील घटतिवसा, मोर्शी, धारणी, चिखलदरा, धामणगाव रेल्वे तालुक्यांमध्ये० ते १ मीटरपर्यंत भूजल पातळी घटली आहे.अमरावती, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे व वरूड तालुक्यात१ ते ३ मीटरपर्यंत पाण्याच्या पातळीत कमी आली.अंजनगाव सुर्जी तालुक्यात २ ते ३ मीटरपर्यंत, तर चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यांमध्ये ३ ते ४ मीटरपर्यंत पातळी घटली आहे.दर्यापूर तालुक्यात ० ते १ मीटरपर्यंत भूजल पातळीत वाढ झालीे. खारपाणपट्टा असल्याने या भागात उपसा नाही.जिल्ह्यात सरासरीच्या ३६ टक्के पाऊस कमी झाल्यानेच भूजल पातळी घटली. चांदूर बाजार, अचलपूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यात भूजल स्तर खालवला आहे.- विजय खरडवरिष्ठ भूवैज्ञानिकभूजल सर्वेक्षण विभाग