शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
2
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
3
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
4
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
5
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
6
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
7
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
8
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
9
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
10
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
11
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
12
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
13
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
14
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
15
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
17
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
18
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
19
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
20
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश

हरभरा उत्पादकांना हवा पॅकेजचा सरसकट लाभ

By admin | Updated: December 3, 2014 22:42 IST

सततची नापिकी, अस्मानी आणि सुल्तानी संकट, भारनियमन यामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता निवडक हरभरा

सुनील देशपांडे - अचलपूरसततची नापिकी, अस्मानी आणि सुल्तानी संकट, भारनियमन यामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता निवडक हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा शासनाने केली आहे. त्यानुसार एक हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी साडेसात हजार रुपयांपर्यंतच्या पॅकेजचे वाटप सुरू झाले आहे. या पॅकेजमध्ये बियाणे, सूक्ष्म मुलद्रव्ये, औषधे व फवारणी पंपांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा अचलपूर तालुका आहे. जवळपास ७० टक्केपेक्षा अधिक शेतकरी कोरडवाहू शेती करतात. त्यांचे शेतातील पीकपाणी निसर्गाच्या भरवशावर आहे. ओलिताची शेती करणाऱ्यांना भारनियमनाचा फटका बसत असल्याने त्यांनाही पीक घेणे कठीण होऊन बसले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे दुबार, तिबार पेरणी करुनही बियाणे उगवले नाही. नापिकी, कमी उत्पादन आणि बेभरवशाची शेती, त्याचबरोबर बँका, पतसंस्थांचे कर्ज, ऋण काढून केलेली शेती त्यातच अवकाळी पाऊ स आणि अतिवृष्टीचा बसलेला फटका आदींमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील वाढत चाललेला कर्जाचा डोंगर आदी संकटामुळे शेतकरी होत्याचे नव्हते झाले आहे. शासनाने कृषी विभागामार्फत हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना पॅकेजची घोषणा निवडकांसाठी जाहीर केली असल्याने बाकी हरभरा उत्पादकांत असंतोष निर्माण झाला आहे. सर्व्हे करुन सरसकट पॅकेजचा लाभ देण्यात यावा, अशी हरभरा उत्पादकांची मागणी आहे. अचलपूर तालुक्याच्या ज्या भागात हरभऱ्याचा पेरा अधिक असतो अशा निवडक गावांची या प्रकल्पांसाठी निवड करण्यात आली आहे. यासाठी वेगवेगळे चार प्रकल्प राबविण्यात येत आहे. एकंदरीत चार प्रकल्प मिळून ७५० शेतकऱ्यांना संपूर्ण तर २५० शेतकऱ्यांना बियाणेरहित प्रकल्पाचा लाभ देण्यात येणार आहे. अचलपूर तालुक्यातील १०० हेक्टरवर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रति शेतकरी ४० आर. क्षेत्रासाठी हा लाभ दिला जाईल. यात या शेतकऱ्याला ४० आर क्षेत्रासाठी लागणारे बियाणे, सूक्ष्म मुलद्रव्ये, पाठीवरील फवारणी पंप कीटकनाशके व मशागतीच्या खर्चासाठी रोख रक्कम दिली जाणार आहे. सर्वांचे मिळून साडेसात हजारांचे हे पॅकेज असेल, असे कृषी अधिकारी पी.बी. जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.