शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

हरभरा उत्पादकांना हवा पॅकेजचा सरसकट लाभ

By admin | Updated: December 3, 2014 22:42 IST

सततची नापिकी, अस्मानी आणि सुल्तानी संकट, भारनियमन यामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता निवडक हरभरा

सुनील देशपांडे - अचलपूरसततची नापिकी, अस्मानी आणि सुल्तानी संकट, भारनियमन यामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी हवालदिल झाला आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता निवडक हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी पॅकेजची घोषणा शासनाने केली आहे. त्यानुसार एक हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी साडेसात हजार रुपयांपर्यंतच्या पॅकेजचे वाटप सुरू झाले आहे. या पॅकेजमध्ये बियाणे, सूक्ष्म मुलद्रव्ये, औषधे व फवारणी पंपांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा अचलपूर तालुका आहे. जवळपास ७० टक्केपेक्षा अधिक शेतकरी कोरडवाहू शेती करतात. त्यांचे शेतातील पीकपाणी निसर्गाच्या भरवशावर आहे. ओलिताची शेती करणाऱ्यांना भारनियमनाचा फटका बसत असल्याने त्यांनाही पीक घेणे कठीण होऊन बसले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे दुबार, तिबार पेरणी करुनही बियाणे उगवले नाही. नापिकी, कमी उत्पादन आणि बेभरवशाची शेती, त्याचबरोबर बँका, पतसंस्थांचे कर्ज, ऋण काढून केलेली शेती त्यातच अवकाळी पाऊ स आणि अतिवृष्टीचा बसलेला फटका आदींमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील वाढत चाललेला कर्जाचा डोंगर आदी संकटामुळे शेतकरी होत्याचे नव्हते झाले आहे. शासनाने कृषी विभागामार्फत हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना पॅकेजची घोषणा निवडकांसाठी जाहीर केली असल्याने बाकी हरभरा उत्पादकांत असंतोष निर्माण झाला आहे. सर्व्हे करुन सरसकट पॅकेजचा लाभ देण्यात यावा, अशी हरभरा उत्पादकांची मागणी आहे. अचलपूर तालुक्याच्या ज्या भागात हरभऱ्याचा पेरा अधिक असतो अशा निवडक गावांची या प्रकल्पांसाठी निवड करण्यात आली आहे. यासाठी वेगवेगळे चार प्रकल्प राबविण्यात येत आहे. एकंदरीत चार प्रकल्प मिळून ७५० शेतकऱ्यांना संपूर्ण तर २५० शेतकऱ्यांना बियाणेरहित प्रकल्पाचा लाभ देण्यात येणार आहे. अचलपूर तालुक्यातील १०० हेक्टरवर हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रति शेतकरी ४० आर. क्षेत्रासाठी हा लाभ दिला जाईल. यात या शेतकऱ्याला ४० आर क्षेत्रासाठी लागणारे बियाणे, सूक्ष्म मुलद्रव्ये, पाठीवरील फवारणी पंप कीटकनाशके व मशागतीच्या खर्चासाठी रोख रक्कम दिली जाणार आहे. सर्वांचे मिळून साडेसात हजारांचे हे पॅकेज असेल, असे कृषी अधिकारी पी.बी. जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.