शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सुकळी, अकोली कंपोस्ट डेपोत निर्माण होणार ‘ग्रीनस्पेस’

By प्रदीप भाकरे | Updated: June 7, 2023 14:17 IST

बगिचा, क्रिडांगणाची निर्मिती: नगरविकास विभागाचा निर्णय

अमरावती : कचऱ्याचा डोंगरात वसलेल्या सुकळी कंपोस्ट डेपोसह अकोली कंपोस्ट डेपोचे बकालपण नाहीसे करण्यासाठी तेथे ग्रीनस्पेस निर्माण केली जाणार आहे. त्या ग्रीनस्पेसअंतर्गत तेथे बगिचा, क्रिडांगणे तयार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. महापालिकेला तेथे घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्र व मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र देखील उभारता येणार आहे.

महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये जुन्या साठलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करून त्यानंतर पुनप्राप्त होणाऱ्या जागेवर ग्रीन स्पेस निर्माण करण्याचे आदेश नगरविकास विभागाने ५ जून पर्यावरण दिनी दिले आहेत. त्याअनुषंगाने अमरावती महानगरपालिका प्रशासनाला प्रामुख्याने सुकळी कंपोस्ट डेपोत ग्रीनस्पेसची संकल्पना राबवावी लागणार आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जुन्या साठलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून या कचऱ्याची विल्हेवाट लावणे व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत जागेची पुनर्प्राप्ती करून घेणे आवश्यक आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) १.० अंतर्गत राज्यातील १८० शहरामध्ये व २.० अंतर्गत राज्यातील २८ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बायोमायनिंग प्रक्रिया प्रकल्प राबविण्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसेच शहर घनकचरा व्यवस्थापन कृती आराखडानुसार आणखी १५८ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बायोमायनिंग प्रकल्पास मान्यता देण्याचे प्रस्तावित आहे. सुकळी कंपोस्ट डेपोतील जुन्या साठलेल्या कचऱ्यावर वर्षभरापासून बायोमायनिंगची प्रक्रिया सुरू आहे. बायोमायनिंग प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर तेथील कचराभूमीच्या जागेची पुन:प्राप्ती होणार आहे.

कशासाठी ग्रीनस्पेस

शहरात जुन्या साठलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून या कचऱ्याची विल्हेवाट लावणे व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत जागेची पुनर्प्राप्ती करून घेणे आवश्यक आहे. तथापी, अनेक ठिकाणी त्या जुन्या साठलेल्या कचऱ्यावर बायोमानिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पर्यावरण पोषक पध्दतीने पुनर्प्राप्ती होत नाही. यास्तव त्या जागेचा बकालपणा कमी करण्याच्या उद्देशाने ग्रीनस्पेसचे निर्देश देण्यात आले आहेत.

सुकळी डेपोत बायोमायनिंग

सुकळी कंपोस्ट डेपोत ९.३५ हेक्टर जागेवर २०० टीपीडी क्षमतेच्या व अकोली येथे २.८३ हेक्टर जागेवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. मात्र, सुकळी प्रकल्पाच्या कार्यान्वयनासाठी तेथील कचऱ्याचा डोंगर नाहीसा करणे आवश्यक आहे. त्या दुष्टीने तेथे बायोमायनिंगच्या माध्यमातून १.३१ लक्षघनमीटर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. तेथे साचलेल्या संपुर्ण कचऱ्यावर डिसेंबर २०२३ पर्यंत बायोमायनिंग प्रक्रिया पुर्ण होईल. त्यानंतर कचराभूमिची पुन:प्राप्ती होईल.

टॅग्स :localलोकलAmravatiअमरावती