शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

सुकळी, अकोली कंपोस्ट डेपोत निर्माण होणार ‘ग्रीनस्पेस’

By प्रदीप भाकरे | Updated: June 7, 2023 14:17 IST

बगिचा, क्रिडांगणाची निर्मिती: नगरविकास विभागाचा निर्णय

अमरावती : कचऱ्याचा डोंगरात वसलेल्या सुकळी कंपोस्ट डेपोसह अकोली कंपोस्ट डेपोचे बकालपण नाहीसे करण्यासाठी तेथे ग्रीनस्पेस निर्माण केली जाणार आहे. त्या ग्रीनस्पेसअंतर्गत तेथे बगिचा, क्रिडांगणे तयार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. महापालिकेला तेथे घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्र व मलनिस्सारण प्रक्रिया केंद्र देखील उभारता येणार आहे.

महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये जुन्या साठलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करून त्यानंतर पुनप्राप्त होणाऱ्या जागेवर ग्रीन स्पेस निर्माण करण्याचे आदेश नगरविकास विभागाने ५ जून पर्यावरण दिनी दिले आहेत. त्याअनुषंगाने अमरावती महानगरपालिका प्रशासनाला प्रामुख्याने सुकळी कंपोस्ट डेपोत ग्रीनस्पेसची संकल्पना राबवावी लागणार आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जुन्या साठलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून या कचऱ्याची विल्हेवाट लावणे व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत जागेची पुनर्प्राप्ती करून घेणे आवश्यक आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) १.० अंतर्गत राज्यातील १८० शहरामध्ये व २.० अंतर्गत राज्यातील २८ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बायोमायनिंग प्रक्रिया प्रकल्प राबविण्यास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसेच शहर घनकचरा व्यवस्थापन कृती आराखडानुसार आणखी १५८ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बायोमायनिंग प्रकल्पास मान्यता देण्याचे प्रस्तावित आहे. सुकळी कंपोस्ट डेपोतील जुन्या साठलेल्या कचऱ्यावर वर्षभरापासून बायोमायनिंगची प्रक्रिया सुरू आहे. बायोमायनिंग प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर तेथील कचराभूमीच्या जागेची पुन:प्राप्ती होणार आहे.

कशासाठी ग्रीनस्पेस

शहरात जुन्या साठलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून या कचऱ्याची विल्हेवाट लावणे व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत जागेची पुनर्प्राप्ती करून घेणे आवश्यक आहे. तथापी, अनेक ठिकाणी त्या जुन्या साठलेल्या कचऱ्यावर बायोमानिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पर्यावरण पोषक पध्दतीने पुनर्प्राप्ती होत नाही. यास्तव त्या जागेचा बकालपणा कमी करण्याच्या उद्देशाने ग्रीनस्पेसचे निर्देश देण्यात आले आहेत.

सुकळी डेपोत बायोमायनिंग

सुकळी कंपोस्ट डेपोत ९.३५ हेक्टर जागेवर २०० टीपीडी क्षमतेच्या व अकोली येथे २.८३ हेक्टर जागेवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. मात्र, सुकळी प्रकल्पाच्या कार्यान्वयनासाठी तेथील कचऱ्याचा डोंगर नाहीसा करणे आवश्यक आहे. त्या दुष्टीने तेथे बायोमायनिंगच्या माध्यमातून १.३१ लक्षघनमीटर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. तेथे साचलेल्या संपुर्ण कचऱ्यावर डिसेंबर २०२३ पर्यंत बायोमायनिंग प्रक्रिया पुर्ण होईल. त्यानंतर कचराभूमिची पुन:प्राप्ती होईल.

टॅग्स :localलोकलAmravatiअमरावती