शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

केंद्राकडून हरित मिशन योजनेचा महाराष्ट्राला छदामही नाही!

By गणेश वासनिक | Updated: August 2, 2024 23:27 IST

लोकसभेत प्रश्नाद्वारे लेखी उत्तरातून वास्तव उघड; पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्र्यांची माहिती.

गणेश वासनिक / अमरावती अमरावती : केंद्र सरकारच्या हरित भारत मिशन योजनेत देशभरातील १७ राज्यांच्या समावेश करण्यात आला आहे. ही योजना सन २०१५-१६ मध्ये लागू करण्यात आली असून मात्र गत पाच वर्षात महाराष्ट्राला छदामही दिला नाही. हे वास्तव लोकसभेत प्रश्नाद्वारे लेखी उत्तरातून समाेर आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारची महाराष्ट्राप्रती असलेली दुटप्पी भावना स्पष्टपणे उघड होत असल्याचा आरोप अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी केला आहे.

भारत वन स्थिती अहवाल २०२१ नुसार भारतात एकूण जंगल आणि वृक्षाच्छादन क्षेत्र २२६१ चौरस किलोमीटरने वाढले. वन मंत्रालयाच्या अंतर्गत डेहराडून येथील भारतीय वन सर्वेक्षण (एफएसआय) ही संस्था १९८७ पासून देशातील वन आच्छादनाचे द्विवार्षिक मूल्यांकन करते आणि आपला निष्कर्ष भारत वन स्थिती अहवालात प्रकाशित करते, अशी माहिती पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तरात माहिती दिली आहे.

नॅशनल ग्रीन इंडिया मिशन (जीआयएम) हे हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती आराखड्यांतर्गत नमूद केलेल्या आठ मोहिमांपैकी एक आहे. भारताचे वन संरक्षण, पुनर्संचयित आणि वर्धित करणे आणि निवडलेल्या भूभागांतर्गत वन आणि गैर-वने भागात वृक्षारोपण उपक्रम हाती घेऊन हवामान बदलाचा सामना करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षात जीआयएम संबंधित उपक्रम सुरू करण्यात आले. मात्र वन आणि हवामान बदल मंत्रालयाने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी मंजूर वार्षिक परिचालन योजनेनुसार उपक्रम राबविण्यासाठी मागील पाच वर्षात महाराष्ट्राला छदामही दिला नाही. यावरून केंद्र सरकारचे धोरण महाराष्ट्राकरिता कशा पद्धतीचे आहे, यावरून स्पष्ट दिसून येते. देशाच्या वन स्थितीवर अहवाल २०२१ नुसार एक नजर....■ एकूण वनक्षेत्र ७,१३,७८९ चौरस किलोमीटर, भौगोलिक क्षेत्राच्या २१.७२ टक्के■ २०१९ च्या तुलनेत एकूण वनक्षेत्रात १५४० चौरस किलोमीटरने वाढ■ वृक्षाच्छादित क्षेत्र ७२१ चौरस किलोमीटरने वाढले■ राष्ट्रीय स्तरावर एकूण वन आणि वृक्षाच्छादन क्षेत्र २२६१ चौरस किलोमीटरने वाढ केंद्र सरकारने उद्योग, रोजगार, शिक्षण अथवा सामाजिक उपक्रमांसाठी लागणाऱ्या निधीवर सातत्याने महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. महाराष्ट्रातून गुजरातला उद्योग पळविण्याचे धोरण ही नित्याचीच बाब झाली आहे. आता तर हरित मिशन योजना राबविण्यासाठी गत पाच वर्षात एक रुपयाही दिला नाही, ही बाब उघडकीस आली आहे.- बळवंत वानखडे, खासदार

टॅग्स :Amravatiअमरावती