शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडून हरित मिशन योजनेचा महाराष्ट्राला छदामही नाही!

By गणेश वासनिक | Updated: August 2, 2024 23:27 IST

लोकसभेत प्रश्नाद्वारे लेखी उत्तरातून वास्तव उघड; पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्र्यांची माहिती.

गणेश वासनिक / अमरावती अमरावती : केंद्र सरकारच्या हरित भारत मिशन योजनेत देशभरातील १७ राज्यांच्या समावेश करण्यात आला आहे. ही योजना सन २०१५-१६ मध्ये लागू करण्यात आली असून मात्र गत पाच वर्षात महाराष्ट्राला छदामही दिला नाही. हे वास्तव लोकसभेत प्रश्नाद्वारे लेखी उत्तरातून समाेर आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारची महाराष्ट्राप्रती असलेली दुटप्पी भावना स्पष्टपणे उघड होत असल्याचा आरोप अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी केला आहे.

भारत वन स्थिती अहवाल २०२१ नुसार भारतात एकूण जंगल आणि वृक्षाच्छादन क्षेत्र २२६१ चौरस किलोमीटरने वाढले. वन मंत्रालयाच्या अंतर्गत डेहराडून येथील भारतीय वन सर्वेक्षण (एफएसआय) ही संस्था १९८७ पासून देशातील वन आच्छादनाचे द्विवार्षिक मूल्यांकन करते आणि आपला निष्कर्ष भारत वन स्थिती अहवालात प्रकाशित करते, अशी माहिती पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंग यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तरात माहिती दिली आहे.

नॅशनल ग्रीन इंडिया मिशन (जीआयएम) हे हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती आराखड्यांतर्गत नमूद केलेल्या आठ मोहिमांपैकी एक आहे. भारताचे वन संरक्षण, पुनर्संचयित आणि वर्धित करणे आणि निवडलेल्या भूभागांतर्गत वन आणि गैर-वने भागात वृक्षारोपण उपक्रम हाती घेऊन हवामान बदलाचा सामना करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. २०१५-१६ या आर्थिक वर्षात जीआयएम संबंधित उपक्रम सुरू करण्यात आले. मात्र वन आणि हवामान बदल मंत्रालयाने २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी मंजूर वार्षिक परिचालन योजनेनुसार उपक्रम राबविण्यासाठी मागील पाच वर्षात महाराष्ट्राला छदामही दिला नाही. यावरून केंद्र सरकारचे धोरण महाराष्ट्राकरिता कशा पद्धतीचे आहे, यावरून स्पष्ट दिसून येते. देशाच्या वन स्थितीवर अहवाल २०२१ नुसार एक नजर....■ एकूण वनक्षेत्र ७,१३,७८९ चौरस किलोमीटर, भौगोलिक क्षेत्राच्या २१.७२ टक्के■ २०१९ च्या तुलनेत एकूण वनक्षेत्रात १५४० चौरस किलोमीटरने वाढ■ वृक्षाच्छादित क्षेत्र ७२१ चौरस किलोमीटरने वाढले■ राष्ट्रीय स्तरावर एकूण वन आणि वृक्षाच्छादन क्षेत्र २२६१ चौरस किलोमीटरने वाढ केंद्र सरकारने उद्योग, रोजगार, शिक्षण अथवा सामाजिक उपक्रमांसाठी लागणाऱ्या निधीवर सातत्याने महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. महाराष्ट्रातून गुजरातला उद्योग पळविण्याचे धोरण ही नित्याचीच बाब झाली आहे. आता तर हरित मिशन योजना राबविण्यासाठी गत पाच वर्षात एक रुपयाही दिला नाही, ही बाब उघडकीस आली आहे.- बळवंत वानखडे, खासदार

टॅग्स :Amravatiअमरावती