शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शौचालय बांधकामासाठी ग्रामपंचायतींचाही निधी वापरणार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 16:15 IST

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत राज्यात शौचालय पूर्णत्वाचे व ग्रामपंचायत हागणदारीमुक्तीचे काम सुरू आहे.

अमरावती : स्वच्छ भारत मिशनअंतर्गत राज्यात शौचालय पूर्णत्वाचे व ग्रामपंचायत हागणदारीमुक्तीचे काम सुरू आहे. यामध्ये निधी कमी पडू नये म्हणून ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर स्वच्छतेसंदर्भात उपलब्ध निधीचा विनियोग शौचालय अनुदानासाठी करण्याची सूचना राज्याचे प्रधान सचिव यांनी सर्व मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिल्या आहेत. याविषयीचे पत्र त्यांनी पाठविले आहे. पेयजल  व स्वच्छता मंत्रालय नवी दिल्ली यांनी सर्व राज्य मार्च २०१८ पर्यंत हागणदारीमुक्तीचे निर्देश दिले आहेत. त्या दृष्टिकोनातून राज्यभरात युद्धस्तरावर वैयक्तिक शौचालय बांधकाम सुरू आहेत. गावागावांत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी स्थानिक प्रशासकीय यंत्रणा काम करीत असून जिल्ह्यात त्यांचे नियोजन हाताशी यावे, यामध्ये निधी कमी पडू नये, यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. मार्च २०१८ पर्यंत राज्य हागणदारीमुक्त करायचे असल्याने अधिक निधी लागणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींनीही तरतूद करावी, अशी सूचना केली आहे. यामध्ये नरेगा, १४ वा वित्त आयोग, सीएसआर फड, स्थानिक निधी लोकसहभाग इत्यादी निधीचा उपयोग करावा, असे प्रधान सचिव राजेश कुमार यांनी सर्व  जिल्ह्यांच्या मुख्यकार्यकारी अधिकाºयांना पत्राद्वारे सुचविले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून शौचालय बांधकामासाठी मान्यता देऊन जास्तीत जास्त  शौचालयांची कामे पूर्ण करण्याचे नियोजन करावे. वैयक्तिक शौचालय पूर्ण केलेल्या लाभार्थी कुटुंबाला शौचालय बांधून त्याचा वापर सुरू झाल्यानंतर तातडीने प्रोत्साहन मिळावे, यासाठी नियोजन करून राज्य येत्या मार्र्चअखेरपर्यंत हागणदारीमुक्त करावे, असे निर्देश दिले आहेत.शौचालय बांधकामासाठी नरेगामार्फत व चौदाव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर स्वच्छतेसंदर्भात उपलब्ध निधीचा विनियोग शौचालय अनुदानासाठी करण्याची सूचना राज्याचे प्रधान सचिवांनी दिल्या आहेत.- संजय इंगळे, डेप्युटी सीईओ पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानgram panchayatग्राम पंचायत