शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

धान्यसाठा शालेय पोषण, अंगणवाडी की रेशनचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:31 IST

धान्यतस्करीचा अड्डा ठरलेल्या परतवाडा शहरातून शेकडो क्विंटल धान्याची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. पोलीस आणि महसूल विभागाच्या कारवाईनंतर ठोस पुराव्याअभावी तस्करांवर कुठलीच कारवाई होत नसल्याने कोट्यवधीची धान्य तस्करी बिनबोभाट सुरू आहे. पोलिसांनी गुरुवारी पकडलेला धान्याच्या ट्रकमधील माल अंगणवाडी, शालेय पोषण आहार की रेशनचा, यावर शिक्कामोर्तब न झाल्याने त्याची खोलवर तपासणी होणे गरजेचे ठरले आहे.

ठळक मुद्देतस्करांपुढे कायदा थिटा : धान्य आणले कुठून; चौकशी होणे महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : धान्यतस्करीचा अड्डा ठरलेल्या परतवाडा शहरातून शेकडो क्विंटल धान्याची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. पोलीस आणि महसूल विभागाच्या कारवाईनंतर ठोस पुराव्याअभावी तस्करांवर कुठलीच कारवाई होत नसल्याने कोट्यवधीची धान्य तस्करी बिनबोभाट सुरू आहे. पोलिसांनी गुरुवारी पकडलेला धान्याच्या ट्रकमधील माल अंगणवाडी, शालेय पोषण आहार की रेशनचा, यावर शिक्कामोर्तब न झाल्याने त्याची खोलवर तपासणी होणे गरजेचे ठरले आहे.जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी परतवाडा तेथील धान्यतस्कर रशीद अशरफ उर्फ टोपली याचा सोळा चाकी ट्रक पकडला. त्यामध्ये तांदूळ आणि गहू होते. हा धान्यसाठा त्याने कोठून आणला, हे अद्याप अनुत्तरित आहे. पोलिसांनी पुरवठा विभागाला पत्र देऊन विचारणा केली आहे.सर्व धान्य सारखेच दिसत असल्याने कार्यवाहीअंती न्यायालयात हा शासकीय माल असल्याचा ठोस पुरावा यंत्रणेजवळ मिळत नाही. परिणामी पुराव्याअभावी तस्कराला धान्य परत देण्याचा आदेश न्यायालयाला द्यावा लागल्याचा प्रकार बंडू अग्रवालच्या प्रकरणात घडला. त्यामुळे तस्करांचे मनोबल प्रचंड उंचावले.परतवाडा व परिसरात कुठेच धान पीक घेतले जात नाही. तरीसुद्धा परतवाडा शहरातून शेकडो क्विंटल तांदळाची तस्करी परप्रांतात केल्या जात असल्याचे आतापर्यंतच्या धाडीत उघडकीस आले आहे.पुराव्यानिशी कारवाईची गरजपरतवाडा शहरातील धान्यतस्कर तांदूळ व गहू कोणाकडून विकत घेतात किंवा कोठून आणतात, याची शोधमोहीम आता महसूल व पोलीस विभागाने संयुक्तरीत्या राबविणे गरजेचे आहे. तस्कराला पोलीस खाक्या दाखविणे गरजेचे असून, त्यानंतरच इतरांची नावे पुढे येतील. पोलिसांनी अचलपूर तहसील कार्यालयाला सदर धान्यासंदर्भात पत्र दिले असले तरी महसूल विभागात जवळ धान्य सरकारी की खाजगी अशी ओळख करणारी कुठलीही यंत्रणा नाही, शिवाय साठा किती करावा, यालाही बंधन नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पकडण्यात आलेला हा धान्यसाठा सुटण्याची भीती वर्तविली जात आहे.धान्यसाठा आला कुठून?रशीद टोपली याच्या गोदामासह मिनी ट्रक व ट्रकमधून महसूल व पोलीस विभागाने वेगवेगळ्या कारवायांमध्ये तांदूळ व इतर धान्यासाठा पकडण्यात आला होता. त्याने पूर्वी वेगवेगळ्या धान्य दुकानदारांच्या पावत्यासुद्धा महसूल विभागाला दाखविल्या. त्याची चौकशी करण्यात आली. मात्र, हे धान्य नजीकच्या चिखलदरा, अंजनगाव, दर्यापूर, चांदूरबाजार या तालुक्यांतील अंगणवाडी, शालेय पोषण आहार व रेशनच्या दुकानांतील असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे अंगणवाडी व शालेय पोषण आहाराच्या तांदळाचीसुद्धा चौकशी होणे गरजेचे ठरले आहे.चिखलदऱ्यातील गोदामाची तपासणी कराअचलपूर तालुक्यातील १६६ पैकी १३० रेशन दुकाने बायोमेट्रिक करण्यात आली आहेत. उर्वरित रेशन दुकानांना आधारसक्ती असल्याने आवश्यक तेवढा साठा दिला जात आहे. परतवाडा शहराला लागून चिखलदरा तालुका आहे. तेथील चुरणी, राहू, सेमाडोह, गौरखेडा बाजार व शहापूर या पाचही धान्य गोदामांची तपासणी होणे गरजेचे ठरले आहे. तालुक्यातील शाळांना मोठ्या प्रमाणात खिचडीसाठी पोषण आहाराचा तांदूळ दिला जातो. अंगणवाडी केंद्रातही तांदूळ असल्याने मेळघाटातूनच परतवाडा शहरात धान्य तस्करीची चर्चा बरीच बोलकी आहे.परतवाडा पोलिसांनी पकडलेले धान्य कुणाचे, यासंदर्भात पत्र दिले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. अचलपूर तालुक्यातील ८७ टक्के रेशन दुकाने बायोमेट्रिक करण्यात आली आहेत. तरीसुद्धा तपासणी व सदर प्रकरणाची चौकशी सुरू आहे.- शैलेश देशमुख,पुरवठा अधिकारी, अचलपूर तहसील