शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

धान्यसाठा शालेय पोषण, अंगणवाडी की रेशनचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:31 IST

धान्यतस्करीचा अड्डा ठरलेल्या परतवाडा शहरातून शेकडो क्विंटल धान्याची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. पोलीस आणि महसूल विभागाच्या कारवाईनंतर ठोस पुराव्याअभावी तस्करांवर कुठलीच कारवाई होत नसल्याने कोट्यवधीची धान्य तस्करी बिनबोभाट सुरू आहे. पोलिसांनी गुरुवारी पकडलेला धान्याच्या ट्रकमधील माल अंगणवाडी, शालेय पोषण आहार की रेशनचा, यावर शिक्कामोर्तब न झाल्याने त्याची खोलवर तपासणी होणे गरजेचे ठरले आहे.

ठळक मुद्देतस्करांपुढे कायदा थिटा : धान्य आणले कुठून; चौकशी होणे महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : धान्यतस्करीचा अड्डा ठरलेल्या परतवाडा शहरातून शेकडो क्विंटल धान्याची तस्करी होत असल्याचे उघड झाले आहे. पोलीस आणि महसूल विभागाच्या कारवाईनंतर ठोस पुराव्याअभावी तस्करांवर कुठलीच कारवाई होत नसल्याने कोट्यवधीची धान्य तस्करी बिनबोभाट सुरू आहे. पोलिसांनी गुरुवारी पकडलेला धान्याच्या ट्रकमधील माल अंगणवाडी, शालेय पोषण आहार की रेशनचा, यावर शिक्कामोर्तब न झाल्याने त्याची खोलवर तपासणी होणे गरजेचे ठरले आहे.जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवारी परतवाडा तेथील धान्यतस्कर रशीद अशरफ उर्फ टोपली याचा सोळा चाकी ट्रक पकडला. त्यामध्ये तांदूळ आणि गहू होते. हा धान्यसाठा त्याने कोठून आणला, हे अद्याप अनुत्तरित आहे. पोलिसांनी पुरवठा विभागाला पत्र देऊन विचारणा केली आहे.सर्व धान्य सारखेच दिसत असल्याने कार्यवाहीअंती न्यायालयात हा शासकीय माल असल्याचा ठोस पुरावा यंत्रणेजवळ मिळत नाही. परिणामी पुराव्याअभावी तस्कराला धान्य परत देण्याचा आदेश न्यायालयाला द्यावा लागल्याचा प्रकार बंडू अग्रवालच्या प्रकरणात घडला. त्यामुळे तस्करांचे मनोबल प्रचंड उंचावले.परतवाडा व परिसरात कुठेच धान पीक घेतले जात नाही. तरीसुद्धा परतवाडा शहरातून शेकडो क्विंटल तांदळाची तस्करी परप्रांतात केल्या जात असल्याचे आतापर्यंतच्या धाडीत उघडकीस आले आहे.पुराव्यानिशी कारवाईची गरजपरतवाडा शहरातील धान्यतस्कर तांदूळ व गहू कोणाकडून विकत घेतात किंवा कोठून आणतात, याची शोधमोहीम आता महसूल व पोलीस विभागाने संयुक्तरीत्या राबविणे गरजेचे आहे. तस्कराला पोलीस खाक्या दाखविणे गरजेचे असून, त्यानंतरच इतरांची नावे पुढे येतील. पोलिसांनी अचलपूर तहसील कार्यालयाला सदर धान्यासंदर्भात पत्र दिले असले तरी महसूल विभागात जवळ धान्य सरकारी की खाजगी अशी ओळख करणारी कुठलीही यंत्रणा नाही, शिवाय साठा किती करावा, यालाही बंधन नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पकडण्यात आलेला हा धान्यसाठा सुटण्याची भीती वर्तविली जात आहे.धान्यसाठा आला कुठून?रशीद टोपली याच्या गोदामासह मिनी ट्रक व ट्रकमधून महसूल व पोलीस विभागाने वेगवेगळ्या कारवायांमध्ये तांदूळ व इतर धान्यासाठा पकडण्यात आला होता. त्याने पूर्वी वेगवेगळ्या धान्य दुकानदारांच्या पावत्यासुद्धा महसूल विभागाला दाखविल्या. त्याची चौकशी करण्यात आली. मात्र, हे धान्य नजीकच्या चिखलदरा, अंजनगाव, दर्यापूर, चांदूरबाजार या तालुक्यांतील अंगणवाडी, शालेय पोषण आहार व रेशनच्या दुकानांतील असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यामुळे अंगणवाडी व शालेय पोषण आहाराच्या तांदळाचीसुद्धा चौकशी होणे गरजेचे ठरले आहे.चिखलदऱ्यातील गोदामाची तपासणी कराअचलपूर तालुक्यातील १६६ पैकी १३० रेशन दुकाने बायोमेट्रिक करण्यात आली आहेत. उर्वरित रेशन दुकानांना आधारसक्ती असल्याने आवश्यक तेवढा साठा दिला जात आहे. परतवाडा शहराला लागून चिखलदरा तालुका आहे. तेथील चुरणी, राहू, सेमाडोह, गौरखेडा बाजार व शहापूर या पाचही धान्य गोदामांची तपासणी होणे गरजेचे ठरले आहे. तालुक्यातील शाळांना मोठ्या प्रमाणात खिचडीसाठी पोषण आहाराचा तांदूळ दिला जातो. अंगणवाडी केंद्रातही तांदूळ असल्याने मेळघाटातूनच परतवाडा शहरात धान्य तस्करीची चर्चा बरीच बोलकी आहे.परतवाडा पोलिसांनी पकडलेले धान्य कुणाचे, यासंदर्भात पत्र दिले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. अचलपूर तालुक्यातील ८७ टक्के रेशन दुकाने बायोमेट्रिक करण्यात आली आहेत. तरीसुद्धा तपासणी व सदर प्रकरणाची चौकशी सुरू आहे.- शैलेश देशमुख,पुरवठा अधिकारी, अचलपूर तहसील