शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

गोवारींच्या सवलतीसाठी सरकारचे सकारात्मक पाऊल

By admin | Updated: August 12, 2015 00:15 IST

आदिवासी असतानाही गत शासनाच्या चुकीच्या धोरणाचे चटके सोसणाऱ्या राज्यातील २४ लाख गोवारींच्या सवलतीबाबत केंद्र ...

गडकरी, फडणवीसांची भूमिका : दिल्लीत होणार बैठकमोहन राऊत अमरावतीआदिवासी असतानाही गत शासनाच्या चुकीच्या धोरणाचे चटके सोसणाऱ्या राज्यातील २४ लाख गोवारींच्या सवलतीबाबत केंद्र व राज्य शासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे़ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देंवेन्द्र फडणवीस यासंदर्भात महत्त्वाची भूमिका घेणार आहेत. दरम्यान आगामी काळात दिल्लीत या संदर्भातील बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली़गोवारी ही मुळची आदिवासी जमात १० सप्टेंबर १९५६ रोजी अनुसूचित जमातीत गोवारीऐवजी गोंडगोवारी असा शब्द अंतर्भूत करण्यात आला आणि सर्व गोवारींना २३ एप्रिल १९८५ पर्यंत गोंडगोवारी अशी प्रमाणपत्रे बहाल करण्यात आली़ परंतु २४ एप्रिल १९८५ रोजी काँग्रेस शासनाने एक शासकीय अध्यादेश काढून गोवारींना अनुसूचित जमातीच्या मिळणाऱ्या सवलती काढून घेतल्या़ तेव्हापासून हा समाज आपल्या हक्कासाठी लढा देत आहे़ एकीकडे या आदिवासी गोवारींची दुसरी पिढी सवलतीसाठी संघर्ष करीत गारद झाली तर दुसरीकडे आज पर्यंत या गोवारींच्या सवलती नाकराल्या गेल्या आहे़केंद्र, राज्याचे सकारात्मक पाऊलनागपुरातील गोवारी हत्याकांडाला २२ वर्ष पूर्ण होत असतांना अद्यापही या जमातीला हक्काच्या सवलतीपासून मागील सरकारने वंचित ठेवले आहे़ दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विदर्भातील २४ लाख गोवारींची मते यावेळी भाजपाच्या पारड्यात गोवारी नेत्यांनी टाकली आहे़ गत शहीद गोवारीदिनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांनी या गोवारी जमातीला त्यांचे हक्क प्राप्त करून देणार असल्याचे सूचक वक्तव्य के ले होते़ यासंदर्भात आता केंद्र व राज्य सरकारने पाऊल उचलले आहे़ गोवारी नेत्यांची या विषयी दिल्लीत बैठक़ आयोजीत करण्यात येणार आहे़सर्व संघटना झाल्या एकत्रमागील तीन तपापासून गोवारी समाजाला सवलत नाकारल्या जात असल्यामुळे नागपूर येथे राज्यातील सर्व गोवारी समाजाच्या संघटना एकत्र झाल्या आहे़ गोवारी नेत्यांनी एकत्र यावे यासाठी या पूर्वीच गोवारी समाजाचे नेते शालीक नेवारे यांनी पुढाकार घेऊन ही बैठक एकत्रित आयोजित केली होती़ गत रविवारी या संदर्भातील बैठक पार पडली. बैठकीला गोवारी समाजाचे नेते देविदास बासकवरे , देग़ो़चचाणे, प्रभू काळसर्पे, नारायण सहारे, कैलास राऊत, दुधकवर गुरूजी, जगन्नाथ ठाकरे, यांच्यासह सर्वच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते़ इतिहासातही गोवारींचा उल्लेखस्वातंत्र्यपूर्वकाळापासून आहे़ १८६९ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या जनगणनेत गोवारी भाषा बोलणाऱ्यांची संख्या २ हजार ५१७ असल्याची नोंद इतिहासात आहे़ मार्टीन यांनी दिलेल्या अहवालात गोवारी ही एक आदिवासी जमात असल्याची नोंद आहे़ रिसेल आणि हिरालाल यांनी लिहलेल्या पुस्तकात आदिवासींच्या नोंदी या जमातीच्या नावाने आहे़ सी़पी़अ‍ॅन्ड बेरार च्या नोटीफिकेशनमध्ये ४ नोव्हेंबर १९४१ च्या शिक्षण विभागाने काढलेल्या परिपत्रकामध्ये गोवारी ही मूळ आदिवासी असल्याचे स्पष्ट उल्लेख आहे़ंसवलतीसाठी दोन पिठ्या गारद झाल्या आहेत़ लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुकीत विदर्भातील गोवारींनी भाजपाला भरभरून मते दिली़आगामी काळात चार राज्यातील गोवारी एकत्र येणार आहे़ त्यामुळे आता आमचा अधिक अंत न पाहता न्याय हक्क मिळवून द्यावा, अशी अपेक्षा दोन्ही सरकारकडून होत आहे़- शालीक नेवारे, अध्यक्ष, गोवारी जमात समन्वय समिती, नागपूर.