शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील आदिवासी मुलांसाठी पाणी शुद्धीकरण यंत्र नेमके कोणते घ्यावे असा शासनापुढे पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 11:49 IST

आदिवासी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी राज्यातील आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्र (आरओ) बसविले जाणार आहेत. मात्र, ‘आरओ’मध्ये नेमके काय खरेदी करावे, यासंदर्भात शासनाकडून ‘गाईड लाईन’ नसल्याने २५ कोटी रुपये तसेच पडून असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

ठळक मुद्देखरेदीचे निकष ठरलेच नाही निर्णय न झाल्याने २५ कोटी तसेच पडून

गणेश वासनिक ।आॅनलाईन लोकमतअमरावती : आदिवासी विद्यार्थ्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, यासाठी राज्यातील आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्र (आरओ) बसविले जाणार आहेत. मात्र, ‘आरओ’मध्ये नेमके काय खरेदी करावे, यासंदर्भात शासनाकडून ‘गाईड लाईन’ नसल्याने २५ कोटी रुपये तसेच पडून असल्याची विश्वसनीय माहिती आहे.आदिवासी विकास विभागात केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त निधी अखर्चित असल्याची बाब गत काही दिवसांपूर्वीच निदर्शनास आली. सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात एक हजार कोटी रुपये अखर्चित असल्याप्रकरणी आमदारांनी प्रश्न उपस्थित के ला.केंद्र सरकारच्या विशेष साहाय्य योजनेतून आदिवासी विद्यार्थ्यांना पिण्यास शुद्ध पाणी मिळावे, यासाठी ‘आरओ’ खरेदीचा प्रस्ताव पुढे आला. त्याकरिता २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहात पाणी शुद्धीकरण यंत्र खरेदीसाठी ई-निविदा काढताना तांत्रिक अडचणी समोर आल्यात. ‘आरओ’मध्ये नेमके काय, कोणते साहित्य खरेदी करावे, हेच ठरलेले नाही. त्यामुळे यासंदर्भात शासनाकडून ‘गाईड लाईन’ मागविल्या. परंतु, सहा महिने लोटले तरी शासनाने ‘गाईड लाईन’ दिल्या नाही. यासंदर्भात आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्या उपलब्ध झाल्या नाहीत.प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारात नेणार-आ. राजू तोडसामकेंद्र सरकारने आदिवासी समाजाचा विकास, प्रगतीसाठी विशेष साहाय्य अनुदान पाठविले आहे. मात्र, प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे पाणी शुद्धीकरण यंत्र खरेदी अडकली. अधिवेशनकाळात हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढ्यात मांडू. आदिवासी विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, याकरिता ‘आरओ’ खरेदीसाठीच्या निधीचा परिपूर्ण वापर व्हावा अशी मागणी केली जाईल, असे आमदार राजू तोडसाम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :GovernmentसरकारWaterपाणी