शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

शासकीय नियमांचा कूपनलिकेला फटका

By admin | Updated: February 17, 2016 00:03 IST

मागील काही वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील भूजलस्तर खालावला आहे.

जिल्हा परिषद : २०० फुटांच्या मर्यादेने खर्च जातो निष्फळअमरावती : मागील काही वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील भूजलस्तर खालावला आहे. अशातच सध्या उन्हाळ्याचे दिवस तोंडावर असताना जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या पाणीटंचाई कृती आराखड्यात उपाययोजना करताना कामांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीमुळे कूपनलिकेसारख्या कामांना सदरच्या अटी घातक ठरत आहे. कूपनलिकेसाठी शासनाने केवळ २०० फुटाची मर्यादा घातली आहे. परंतु कूपनलिकेवर उपाययोजना करताना शासनामार्फत यासाठी केला जाणार कोट्यवधींचा खर्च निष्फळ ठरणार आहे. त्यामुळे या धोरणात बदल होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी व्यक्त केली आहे.जिल्ह्यात मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही पाणी टंचाईची तीव्रता अधिक जाणवणार आहे. सध्या चिखलदरा तालुक्यातील खडीमल गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काही दिवसांत ही पाणी टंचाईची झळ इतरही काही गावांना भासणार आहे. याबाबत खुद्द पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. त्यानुसार उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीपुरवठा विभागाने सुमारे १० कोटींचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये ७०८ गावे आणि ७३६ उपाययोजना केल्या आहेत. त्यामधून नवीन विंधन विहिर योजना, प्रगतीपथावरील नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे, विंधण विहिरींची विशेष दुरूस्ती, विहिरी खोल करणे, गाळ काढणे, विहिर अधिग्रहीत करणे आणि टँकरने बैलगाडी व पाणीपुरवठा करणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत. मात्र यामधील उपाययोजनेत कृती आराखड्यात प्रस्तावीत करण्यात आलेल्या कूपनलिकेसाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद केली आहे. ही प्रक्रिया राबविताना कूपनलिकेसाठी खोलिकरणासाठी शासन निर्णयानुसार केवळ २०० फुटाची मार्यदा घालून देण्यात आली आहे. परंतु सध्याचे स्थितीत जिल्हा भरातील भूजलस्तर बराच खालावला आहे. त्यामुळे आतापर्यंत २०० फुटांवर केलेल्या कूपनलिकेला पाणी लागत नाही. त्यामुळे प्रत्येकी २०० फटांच्या कूपनलिकेसाठी करण्यात येणारा २ लाख रूपयांचा खर्च हा पाण्यात जातो. केवळ कंत्राटदारांच्या पथ्यावर हा निधी पडून शासनाचेच मात्र नुकसान होत आहे. त्यामुळे कूपनलिकेसाठी शासनाने ठरवून दिलेली २०० फुटांची मर्यादा जोपर्यंत वाठविली जाणार नाही तोपर्यंत याचा काहीही फायदा होणार नाही. कूपनलिकेसाठी शासनाची जुनी २०० फुटांची अट आहे. मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यातील पाण्याची पातळी अतिशय खोल गेली आहे. पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनेत कूपनलिकेसाठी ही अट असल्याने यावर केला जाणार कोट्यवधींचा खर्च हा पाण्यात जातो. याची फलश्रुती काहीच नाही. त्यामुळे यात बदल करणे गरजेचे आहे- प्रताप अभ्यंकर, सदस्य, जिल्हा परिषद२०० फुटांची मर्यादा ही कुपनलिकेसाठी आडकाठी ठरत आहे. त्यामुळे ही मर्यादा शिथिल करणे आवश्यक आहे. याशिवाय याचा काहीच उपयोग पाणी टंचाईसाठीचे होऊ शकणार नाही.- ममता भांबुरकर, सदस्य, जिल्हा परिषद