शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शासकीय नियमांचा कूपनलिकेला फटका

By admin | Updated: February 17, 2016 00:03 IST

मागील काही वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील भूजलस्तर खालावला आहे.

जिल्हा परिषद : २०० फुटांच्या मर्यादेने खर्च जातो निष्फळअमरावती : मागील काही वर्षांपासून सतत दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील भूजलस्तर खालावला आहे. अशातच सध्या उन्हाळ्याचे दिवस तोंडावर असताना जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या पाणीटंचाई कृती आराखड्यात उपाययोजना करताना कामांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या अटी व शर्तीमुळे कूपनलिकेसारख्या कामांना सदरच्या अटी घातक ठरत आहे. कूपनलिकेसाठी शासनाने केवळ २०० फुटाची मर्यादा घातली आहे. परंतु कूपनलिकेवर उपाययोजना करताना शासनामार्फत यासाठी केला जाणार कोट्यवधींचा खर्च निष्फळ ठरणार आहे. त्यामुळे या धोरणात बदल होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य प्रताप अभ्यंकर यांनी व्यक्त केली आहे.जिल्ह्यात मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही पाणी टंचाईची तीव्रता अधिक जाणवणार आहे. सध्या चिखलदरा तालुक्यातील खडीमल गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काही दिवसांत ही पाणी टंचाईची झळ इतरही काही गावांना भासणार आहे. याबाबत खुद्द पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे. त्यानुसार उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीपुरवठा विभागाने सुमारे १० कोटींचा आराखडा तयार केला आहे. यामध्ये ७०८ गावे आणि ७३६ उपाययोजना केल्या आहेत. त्यामधून नवीन विंधन विहिर योजना, प्रगतीपथावरील नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण करणे, विंधण विहिरींची विशेष दुरूस्ती, विहिरी खोल करणे, गाळ काढणे, विहिर अधिग्रहीत करणे आणि टँकरने बैलगाडी व पाणीपुरवठा करणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत. मात्र यामधील उपाययोजनेत कृती आराखड्यात प्रस्तावीत करण्यात आलेल्या कूपनलिकेसाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद केली आहे. ही प्रक्रिया राबविताना कूपनलिकेसाठी खोलिकरणासाठी शासन निर्णयानुसार केवळ २०० फुटाची मार्यदा घालून देण्यात आली आहे. परंतु सध्याचे स्थितीत जिल्हा भरातील भूजलस्तर बराच खालावला आहे. त्यामुळे आतापर्यंत २०० फुटांवर केलेल्या कूपनलिकेला पाणी लागत नाही. त्यामुळे प्रत्येकी २०० फटांच्या कूपनलिकेसाठी करण्यात येणारा २ लाख रूपयांचा खर्च हा पाण्यात जातो. केवळ कंत्राटदारांच्या पथ्यावर हा निधी पडून शासनाचेच मात्र नुकसान होत आहे. त्यामुळे कूपनलिकेसाठी शासनाने ठरवून दिलेली २०० फुटांची मर्यादा जोपर्यंत वाठविली जाणार नाही तोपर्यंत याचा काहीही फायदा होणार नाही. कूपनलिकेसाठी शासनाची जुनी २०० फुटांची अट आहे. मात्र सद्यस्थितीत जिल्ह्यातील पाण्याची पातळी अतिशय खोल गेली आहे. पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजनेत कूपनलिकेसाठी ही अट असल्याने यावर केला जाणार कोट्यवधींचा खर्च हा पाण्यात जातो. याची फलश्रुती काहीच नाही. त्यामुळे यात बदल करणे गरजेचे आहे- प्रताप अभ्यंकर, सदस्य, जिल्हा परिषद२०० फुटांची मर्यादा ही कुपनलिकेसाठी आडकाठी ठरत आहे. त्यामुळे ही मर्यादा शिथिल करणे आवश्यक आहे. याशिवाय याचा काहीच उपयोग पाणी टंचाईसाठीचे होऊ शकणार नाही.- ममता भांबुरकर, सदस्य, जिल्हा परिषद