शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

शेतकऱ्यांचे वीज बिल भरणार शासन

By admin | Updated: February 25, 2015 00:27 IST

मागील वर्षीच्या खरीप हंगामात ५० पैशांपेक्षा कमी पीक आणेवारी आढळलेल्या अमरावतीसह राज्यभरातील २३ हजार ८११ गावांमधील दुष्काळग्रस्तांचे ...

अमरावती : मागील वर्षीच्या खरीप हंगामात ५० पैशांपेक्षा कमी पीक आणेवारी आढळलेल्या अमरावतीसह राज्यभरातील २३ हजार ८११ गावांमधील दुष्काळग्रस्तांचे २१५ कोटी रुपयांची वीज देयके राज्य शासनामार्फत भरली जाणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील १९८१ गावांतील दुष्काळग्रस्तांचा समावेश आहे. घरगुती तसेच कृषिपंपांच्या वीज देयकांच्या एकूण रकमेपैकी ३३.५ टक्के रक्कम शासन सवलतीच्या रुपाने देते. विभागातील पाचही जिल्ह्यांसह विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या मोठा दुष्काळ पडला आहे. अपुऱ्या पर्जन्यमानामुळे खरीप आणि रब्बी हे दोन्ही हंगाम बाधित झाले आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. खरीपातील जिल्ह्यात १९८१ गावांतील अंतीम पीक आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी दिसून आली आहे. या दुष्काळग्रस्त गावांमध्ये मदत आणि पुनर्वसन विभागाचे आठ उपाययोजना लागू केल्या आहेत. जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्जवसुलीस स्थगिती, वित्त बिलात ३३.५ टक्के सूट, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो कामांच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता आवश्यक, जेथे पिण्याच्या पाण्याचे टँकर्स आणि शेती पंपाची विजजोडणी खंडित न करणे यांचा समावेश आहे. कृषिपंपाची वीज खंडित न करणे, खंडित केली असल्यास कनेक्शन पुन्हा सुरू करणे, घरगुती, कृषिपंपांना वीज देयकांमध्ये सवलत देऊन दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)