शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

शेतकऱ्यांचे वीज बिल भरणार शासन

By admin | Updated: February 25, 2015 00:27 IST

मागील वर्षीच्या खरीप हंगामात ५० पैशांपेक्षा कमी पीक आणेवारी आढळलेल्या अमरावतीसह राज्यभरातील २३ हजार ८११ गावांमधील दुष्काळग्रस्तांचे ...

अमरावती : मागील वर्षीच्या खरीप हंगामात ५० पैशांपेक्षा कमी पीक आणेवारी आढळलेल्या अमरावतीसह राज्यभरातील २३ हजार ८११ गावांमधील दुष्काळग्रस्तांचे २१५ कोटी रुपयांची वीज देयके राज्य शासनामार्फत भरली जाणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील १९८१ गावांतील दुष्काळग्रस्तांचा समावेश आहे. घरगुती तसेच कृषिपंपांच्या वीज देयकांच्या एकूण रकमेपैकी ३३.५ टक्के रक्कम शासन सवलतीच्या रुपाने देते. विभागातील पाचही जिल्ह्यांसह विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या मोठा दुष्काळ पडला आहे. अपुऱ्या पर्जन्यमानामुळे खरीप आणि रब्बी हे दोन्ही हंगाम बाधित झाले आहेत. शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. नागरिकांना पिण्याचे पाणी, जनावरांना चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. खरीपातील जिल्ह्यात १९८१ गावांतील अंतीम पीक आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी दिसून आली आहे. या दुष्काळग्रस्त गावांमध्ये मदत आणि पुनर्वसन विभागाचे आठ उपाययोजना लागू केल्या आहेत. जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती कर्जवसुलीस स्थगिती, वित्त बिलात ३३.५ टक्के सूट, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो कामांच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता आवश्यक, जेथे पिण्याच्या पाण्याचे टँकर्स आणि शेती पंपाची विजजोडणी खंडित न करणे यांचा समावेश आहे. कृषिपंपाची वीज खंडित न करणे, खंडित केली असल्यास कनेक्शन पुन्हा सुरू करणे, घरगुती, कृषिपंपांना वीज देयकांमध्ये सवलत देऊन दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)