शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आता दरवर्षी १०० आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार फेलोशिप

By गणेश वासनिक | Updated: February 8, 2023 15:05 IST

शासनादेश जारी, मंत्रालयात नऊ महिन्यांपासून अडकलेली फाइल अखेर मंजूर

अमरावती : आदिवासी क्षेत्रामधील सामाजिक आणि आर्थिक बदलांच्या प्रक्रियेचा तसेच आदिवासी जमातीचा सखोल अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आता दरवर्षी १०० अनुसूचित जमातीच्या संशोधक उमेदवारांना अभिछात्रवृत्ती मिळणार आहे. मंत्रालयात नऊ महिन्यांपासून लालफीतशाहीत अडकलेली फाइल मंजूर करण्यात आली आहे. याबाबत आदिवासी विकास विभागाने शासन निर्णय निर्गमित केला आहे.

आदिवासी समाजातील संशोधक विद्यार्थ्यांना अभिछात्रवृत्ती मिळत नव्हती. त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांनी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे येथे २८ मार्च ते ४ एप्रिल २०२२ पर्यंत पहिले आंदोलन केले होते. त्यानंतर २ ते १४ मे २०२२ या दरम्यान रखरखत्या उन्हात दुसरे आंदोलन झाले. नंतर कंटाळून १५ नोव्हेंबर २०२२ रोजी नाशिक येथील जनजाती गौरव दिन कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना फलक दाखवून फेलोशिपची मागणी केली. आश्वासनापलीकडे हातात काहीही न पडल्यामुळे अखेर नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १९ डिसेंबरपासून आदिवासी विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषणाला प्रारंभ करून राज्य

सरकारचे लक्ष वेधले होते

एवढ्या संघर्षानंतर पीएच.डी. धारण करण्यासाठी भारतातील सरकारी अथवा सरकारमान्य विद्यापीठ, महाविद्यालय, संस्था येथे एप्रिल २०२१ नंतर नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. संशोधक विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे सर्व उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक असल्याची अट लादली आहे.

८५ कोटींच्या ‘त्या’ प्रस्तावाला बगल

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांनी संशोधन अभ्यासक्रमासाठी आर्थिक साहाय्य मिळावे म्हणून ५०० संशोधकांसाठी ८५ कोटी ९ लाख १७ हजार रुपयांचा अभिछात्रवृत्ती प्रस्ताव १७ मार्च २०२२ रोजी शासनाकडे पाठविला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या प्रस्तावाला बगल देऊन नव्याने प्रस्ताव सादर करून तो मंजूर करण्यात आला आहे. आता दरवर्षी १०० आदिवासी विद्यार्थ्यांचे फेलोशिपसाठी नियोजन करण्यात आले आहे.

फेलोशिपसाठी ५०० विद्यार्थी क्षमता असावी

अनुसूचित जमातीमधील संशोधन करणाऱ्या उमेदवारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दरवर्षी विद्यार्थी क्षमता ५०० असावी. उत्पनाची अट न ठेवा सरसकट फेलोशिप द्यावी. कोरोनाकाळात बऱ्याच विद्यार्थ्यांनी संशोधन अर्ध्यावर सोडले. यांना या योजनेत सामावून घेण्यासाठी एप्रिल २०१९ नंतर रजिस्ट्रेशन करणारे विद्यार्थी ग्राह्य धरावे.

- ॲड. प्रमोद घोडाम, संस्थापक अध्यक्ष, ट्रायबल फोरम

टॅग्स :Educationशिक्षणTrible Development Schemeआदिवासी विकास योजनाScholarshipशिष्यवृत्ती