शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
3
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
4
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
5
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
6
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
7
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
8
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
9
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

अमरावतीचा 'टेक्सटाइल पार्क' औरंगाबादला पळविण्याचा घाट; माजी मंत्री डॉ. सुनील देशमुखांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2022 1:17 PM

अमरावतीत रोजगार निर्मिती प्रकल्प, उद्योगधंदे उभारणीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. सुनील देशमुख यांनी केले.

अमरावती : माजी विरोधी पक्षनेता तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संमती असलेला अमरावती नजीकच्या नांदगाव पेठस्थित औद्योगिक वसाहतीमध्ये पीएम मित्रा योजनेंतर्गत प्रस्तावित टेक्सटाइल पार्क औरंगाबाद येथे पळविण्याचे कारस्थान रचण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गत काही दिवसांपूर्वी केंद्रीय वस्त्रोद्योग, अर्थमंत्र्यांची भेट घेतली. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून अमरावतीत प्रस्तावित मेगा टेक्सटाइल पार्क औरंगाबाद येथील ऑरिक सिटीमध्ये पळविण्याचे कारस्थान रचले. या प्रकल्पाला अमरावती येथे केंद्र सरकारने पीएम मित्रा योजनेंतर्गत प्रस्तावित केले होते. देशाच्या १३ राज्यांमधून १७ मेगा टेक्सटाइल पार्क साकारले जाणार होते. त्यानुसार अमरावतीत पार्कसाठी केंद्र सरकारने ४४४५ कोटी रुपये अर्थसंकल्पात उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मेगा टेक्सटाइल पार्कचा प्रस्ताव सादर करण्यासाठी १५ मार्च २०२२ ही डेडलाइन होती. मात्र, आता भाजप - महायुती सरकार सत्तेत येताच षडयंत्र रचून अमरावतीचा टेक्सटाइल पार्क औरंगाबाद येथे पळवून नेला, असा घणाघात डॉ. सुनील देशमुख यांनी केला.

शिंदे सरकारच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा निर्णय होत असताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘ब्र’ देखील काढू नये, यााबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. फडणवीस हे विरोधी पक्ष नेता असताना त्यांनी टेक्सटाईल पार्क हा अमरावती येथेच असावा, असे पत्र दिले होते. त्यामुळे फडणवीस यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्या राजकीय खेळीला मूक संमती तर नाही, अशी शंका उपस्थित होत असल्याचे डॉ. सुनील देशमुख म्हणाले.

खा. राणा, खा. बोंडे यांनी राजकीय वजन वापरावे

अमरावतीचा मेगा टेक्सटाईल पार्क औरंगाबादला पळविला. त्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा, खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी पक्ष नेतृत्वाकडे राजकीय वजन वापरून हा प्रकल्प पुन्हा आणावा आणि पश्चिम विदर्भातील रोजगार, युवकांच्या आशा, आकांक्षांना पुन्हा पल्लवित करावे. अन्यथा तो जनतेसोबत विश्वासघात ठरेल, अशी टीकाही माजी मंत्री डॉ. देशमुख यांनी केली. येथे अगोदरच २० टेक्सटाईल कंपन्या प्रस्तावित असून, हा मेगा टेक्सटाईल पार्क अमरावतीत खेचून आणण्यासाठी जनआंदोलनाची तयारी करू, असे ते म्हणाले.

क्षेपणास्त्र निर्मिती प्रकल्प जाण्याच्या मार्गी

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कार्यकाळात नांदगाव पेठ येथे प्रस्तावित भारत डायनामिक क्षेपणास्त्र निर्मिती करणारा अत्यंत महत्वपूर्ण प्रकल्प सुद्धा अमरावती येथून हैदराबाद येथे जाण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पाचे ११ डिसेंबर २०११ रोजी भूमिपूजन झाले होते. जागेला केवळ संरक्षण कुंपण घालण्यात आले. मात्र, आता केंद्र सरकारच्या धोरणानुसार खासगी कंपन्यांना प्रकल्पाची कामे सोपविणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे अमरावतीत रोजगार निर्मिती प्रकल्प, उद्योगधंदे उभारणीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. सुनील देशमुख यांनी केले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणSunil Deshmukhसुनिल देशमुखAuric Cityऔरंगाबाद इंडस्ट्रीअल सिटीAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार