शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

नांदगाव नगरपंचायतीत तीन लाखांच्या बिलाचे गौडबंगाल

By admin | Updated: May 3, 2016 00:27 IST

नव्याने स्थापन झालेल्या नांदगाव नगरपंचायतला अवघ्या सहा महिन्यांतच भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले असून ...

प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे : नियमाला तिलांजलीमनोज मानतकर  नांदगाव खंडेश्वरनव्याने स्थापन झालेल्या नांदगाव नगरपंचायतला अवघ्या सहा महिन्यांतच भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले असून ३ लाख १० हजारांच्या बोगस बिलांचा प्रश्न विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सादर करून दोषींवर योग्य कारवाईची मागणी केली आहे व शासकीय नियमाला बगल देणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवरसुद्धा तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक सतीश पटेल व संजय पोपळे यांनी केली आहे. २२ एप्रिल रोजी ३ लाख १० हजार रुपयांचे जे बिल लेखापालांकडून मंजूर करण्यात आले, त्यामध्ये अनेक बनावट बिल सादर करून पैसेसुद्धा काढण्यात आले आहेत. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना माहिती देवूनसुद्धा मुख्याधिकारी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे. फार मोठ्या अपेक्षेने ज्यांच्याकडे जनतेने सत्तेची धुरा सोपविली तेच सत्ताधारी जनहीत नव्हे, तर स्वहीत साधत जनतेचा अपेक्षाभंग करीत असल्याचा आरोप होत आहे. अनेक समस्यांचा डोंगर नांदगाव वासियांसमोर उभा असताना सत्ताधारी नगरसेवक स्वहीत साधण्यात मशगुल असल्याने नांदगाव वासियांना नागरी सुविधा देण्यात नगरपंचायत अपयशी ठरली आहे. तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पी. पी. सूर्यवंशी मनमानी कारभार करीत असून विरोधी बाकावरील नगरसेवकांना माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनात येत आहे. तसेच सर्वसाधारण सभेच्या विषयसूचीवर व सभेसमोर स्थायी समितीच्या कार्यवृत्ताचे वाचन करण्यात येत नसून कार्यवृत्त कायम न करता कधी स्वत:च्या अधिकारात मुख्याधिकारीही करीत असल्याचे नगरसेवक सांगतात व नगरपंचायतची सर्वसाधारण सभा दोन महिन्यांपासून एकदा घेणे बंधनकारक असतानासुद्धा दोन महिन्यांचा कालावधी होऊनही अद्याप नोटीस काढण्यात आलेली नाही. मागील सर्वसाधारण सभेबाबतची माहिती मागितली असता अद्याप मागील सभेचे प्रोसिडींग लिहिण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले असल्याने मुख्याधिकारी कर्तव्यात कसूर करीत असल्याचे दिसून येत आहे व त्यामुळे शहर विकासाला आळा बसला आहे. त्यामुळे जनतेच्या पैशावर मौजमजा करून विकास निधीत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर व कर्तव्यात कसूर करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी विरोधी नगरसेवकांकडून होत आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी नगरपंचायतमधील भ्रष्टाचाराचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या दिशेने टोलवल्याने आता जिल्हाधिकारी याबाबत काय निर्णय घेतात याकडे नांदगाव वासियांचे लक्ष लागले आहे.