शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

नांदगाव नगरपंचायतीत तीन लाखांच्या बिलाचे गौडबंगाल

By admin | Updated: May 3, 2016 00:27 IST

नव्याने स्थापन झालेल्या नांदगाव नगरपंचायतला अवघ्या सहा महिन्यांतच भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले असून ...

प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे : नियमाला तिलांजलीमनोज मानतकर  नांदगाव खंडेश्वरनव्याने स्थापन झालेल्या नांदगाव नगरपंचायतला अवघ्या सहा महिन्यांतच भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले असून ३ लाख १० हजारांच्या बोगस बिलांचा प्रश्न विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सादर करून दोषींवर योग्य कारवाईची मागणी केली आहे व शासकीय नियमाला बगल देणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवरसुद्धा तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक सतीश पटेल व संजय पोपळे यांनी केली आहे. २२ एप्रिल रोजी ३ लाख १० हजार रुपयांचे जे बिल लेखापालांकडून मंजूर करण्यात आले, त्यामध्ये अनेक बनावट बिल सादर करून पैसेसुद्धा काढण्यात आले आहेत. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना माहिती देवूनसुद्धा मुख्याधिकारी याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केला आहे. फार मोठ्या अपेक्षेने ज्यांच्याकडे जनतेने सत्तेची धुरा सोपविली तेच सत्ताधारी जनहीत नव्हे, तर स्वहीत साधत जनतेचा अपेक्षाभंग करीत असल्याचा आरोप होत आहे. अनेक समस्यांचा डोंगर नांदगाव वासियांसमोर उभा असताना सत्ताधारी नगरसेवक स्वहीत साधण्यात मशगुल असल्याने नांदगाव वासियांना नागरी सुविधा देण्यात नगरपंचायत अपयशी ठरली आहे. तसेच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पी. पी. सूर्यवंशी मनमानी कारभार करीत असून विरोधी बाकावरील नगरसेवकांना माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनात येत आहे. तसेच सर्वसाधारण सभेच्या विषयसूचीवर व सभेसमोर स्थायी समितीच्या कार्यवृत्ताचे वाचन करण्यात येत नसून कार्यवृत्त कायम न करता कधी स्वत:च्या अधिकारात मुख्याधिकारीही करीत असल्याचे नगरसेवक सांगतात व नगरपंचायतची सर्वसाधारण सभा दोन महिन्यांपासून एकदा घेणे बंधनकारक असतानासुद्धा दोन महिन्यांचा कालावधी होऊनही अद्याप नोटीस काढण्यात आलेली नाही. मागील सर्वसाधारण सभेबाबतची माहिती मागितली असता अद्याप मागील सभेचे प्रोसिडींग लिहिण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले असल्याने मुख्याधिकारी कर्तव्यात कसूर करीत असल्याचे दिसून येत आहे व त्यामुळे शहर विकासाला आळा बसला आहे. त्यामुळे जनतेच्या पैशावर मौजमजा करून विकास निधीत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर व कर्तव्यात कसूर करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी विरोधी नगरसेवकांकडून होत आहे. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी नगरपंचायतमधील भ्रष्टाचाराचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या दिशेने टोलवल्याने आता जिल्हाधिकारी याबाबत काय निर्णय घेतात याकडे नांदगाव वासियांचे लक्ष लागले आहे.