शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

भंगारात ‘गोलमाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 22:07 IST

राजापेठ स्थित कोठ्यासह कंपोस्ट डेपोत बेवारस पडलेल्या भंगाराची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, त्यात गोलमाल करण्यासाठी एक तिकडी सरसावली आहे.

ठळक मुद्देसाठा कमी दाखविण्याचे षडयंत्र : मर्जीतील कंत्राटदारांसाठी फिल्डिंग

आॅनलाईन लोकमतअमरावती : राजापेठ स्थित कोठ्यासह कंपोस्ट डेपोत बेवारस पडलेल्या भंगाराची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, त्यात गोलमाल करण्यासाठी एक तिकडी सरसावली आहे. सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या एका कर्मचाऱ्याने त्यासाठी मर्जीतील कंत्राटदारांशी संधान बांधले आहे.प्रचंड चर्चेत असलेला भांडार विभाग भंगाराच्या विक्री व्यवहारात कुठलीही रिस्क घेण्याच्या मनस्थितीत नाही. मात्र, कोळशाच्या दलालीत हात काळे होण्याचा हा प्रकार असताना भंगारविक्रीत याआधी एका कंत्राटी अधिकाºयाने ‘माया’ जमविल्याने अख्खी प्रक्रियाच संशयाच्या भोवºयात आली आहे. मागील दीड वर्षापासून सुरू झालेली भंगार विक्रीची फाइल किंमत ठरविण्यासह समिती नियुक्ती व बैठकांपुरती मर्यादित राहिली असून, अतिक्रमण आणि बांधकामासह स्वच्छता विभागाची भूमिका यात निर्णायक असणार आहे.बांधकाम, अतिक्रमण व स्वच्छता विभागातील निकामी झालेल्या वस्तू, अतिक्रमण पथकाने जप्त केलेले साहित्य, जुने कंटेनर, मोबाइल टॉवरसह अन्य हजारो वस्तू राजापेठ स्थित ‘कोठा’ या परिसरात ठेवण्यात आले आहे. मागील अनेक वर्षांपासून या साहित्याचा लिलाव न झाल्याने त्यातील बहुतांश वस्तू भंगार झाल्यात. याशिवाय सुकळी कंपोस्ट डेपो परिसरात १०० हून अधिक लोखंडी कंटेनर व वलगाव रोडवर ५० पेक्षा अधिक कंटेनर भंगार अवस्थेत बेवारस पडले आहेत. या संपूर्ण भंगाराची विक्री केल्यास सुमारे २ कोटी रुपये महसूल अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने भांडार विभागाने त्यासाठीची फाइल चालविली. मात्र, वर्षभरापासून ही प्रक्रिया अंतिमतेपर्यंत पोहोचू शकली नाहीत. सुरुवातीला भंगारमध्ये ७१७६ वस्तू असल्याचे भांडारने त्यांच्या अहवालात म्हटले. मात्र, त्यावर विश्वास न बसल्याने अतिक्रमण, बांधकाम व स्वच्छता विभागाकडे ही जबाबदारी देत भंगार वस्तूंची पुन्हा मोजदाद करण्यात आली. यासाठी नेमलेल्या समितीसमोर याबाबत अहवाल सोमवारी ठेवला जाईल व त्यानंतर ई-आॅक्शनचा मार्ग प्रशस्त बनेल. मात्र, त्यासाठी ई-लिलाव न करता मर्जीतील कंत्राटदारांना समोर करण्याचा घाट रचण्यात आला आहे. यात तिघे कर्मचारी संशयात आले आहेत. भंगारातून कमिशन खाण्याचा हा प्रकार आहे.संख्या कमी दाखविण्याची बदमाशीकोठ्यासह सुकळी व वलगाव मार्गावर नादुरुस्त कंटेनर व अन्य साहित्य ठेवण्यात आले आहे. मात्र, त्यातील काही भंगार वस्तूंसह अन्य साहित्याची संख्या कमी दाखविण्याचा घाट रचण्यात आला आहे. प्रत्यक्षात ई-आॅक्शनमध्ये भंगार संख्या कमी दाखवायची व प्रत्यक्षात असलेले भंगार चढ्या दराने विकायचे, कोठ्याव्यतिरिक्त बेवारस पडलेले भंगार परस्पर विक्री करायचे आणि त्यातून लाखोंचा मलिदा लाटायचा, असा डाव आखण्यात आला आहे.