शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या खरेदीला जाताय, मोबाईल, दुचाकी सांभाळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2021 05:00 IST

पकडले जाऊ नये म्हणून दुचाकीचोरांच्या टोळ्या नंबरप्लेट बदलून, बनावट नंबर टाकून चोरीच्या वाहनांची विक्री करतात. त्यातही पकडले जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अनेक जण दुचाकीचे सुटे भाग काढून त्यांची विक्री करीत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. शहराच्या पश्चिम भागात अवघ्या १० मिनिटांत संपूर्ण दुचाकीचे पार्ट न पार्ट वेगळे केले जात असल्याची माहितीदेखील आहे.

प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहर व जिल्ह्यात अलीकडे दुचाकीचोरीचे सत्र अव्याहतपणे सुरू आहे. आठवड्यातून मोबाईल चोरीच्या घटनादेखील नोंदविल्या जात आहेत. दिवाळीच्या निमित्ताने आता चोरांसाठी सुकाळ आला आहे. अमरावती शहरातील कुठल्याही चौकात, व्यापारी संकुलात वा उड्डाणपुलाखाली दुचाकी सुरक्षित नाही. अगदी दवाखान्याच्या, शासकीय कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला जात असल्याने वाहनधारकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरातील विविध बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. गर्दी असल्यामुळे अनेक जण आपली दुचाकी उड्डाणपुलाखाली ठेवून बिनधास्त शॉपिंग करण्यासाठी जात असल्याचे सारासार चित्र आहे. मात्र, दुचाकी गमवायची नसेल, तर अधिक सजग राहण्याची गरज आहे. शॉपिंग, बाजारहाट होईपर्यंत दुचाकीजवळ कुणीतरी ठेवा किंवा ठेवलेली दुचाकी नजरेच्या टप्प्यात राहावी, ते पाहण्याची गरज आहे. 

दुचाकीचे सुटे पार्ट काढून विक्रीपकडले जाऊ नये म्हणून दुचाकीचोरांच्या टोळ्या नंबरप्लेट बदलून, बनावट नंबर टाकून चोरीच्या वाहनांची विक्री करतात. त्यातही पकडले जाण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अनेक जण दुचाकीचे सुटे भाग काढून त्यांची विक्री करीत असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. शहराच्या पश्चिम भागात अवघ्या १० मिनिटांत संपूर्ण दुचाकीचे पार्ट न पार्ट वेगळे केले जात असल्याची माहितीदेखील आहे.

ही घ्या काळजीमोबाईल : शक्यतो मोबाईल खालच्या खिशात ठेवा. तो वरच्या खिशात ठेवू नका. मोबाईलवर बोलत बाजारहाट वा अन्य खरेदी करू नका. संशयास्पद व्यक्तीपासून दूरच राहा.दुचाकी : ज्या व्यावसायिक संकुलाकडे हक्काचे पार्किंग स्थळ आहे, तेथेच शक्यतोवर दुचाकी पार्क करा. हॅण्डल लॉक आठवणीने करा. शक्यतो सोबत असलेली व्यक्ती दुचाकीजवळ थांबवून चोरांना संधी देऊ नका. तातडीने पोलिसांशी संपर्क साधा. चोरी गेलेला मोबाईल सापडतो, पण वेळाने. चोरी गेलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याची टक्केवारी ३० ते ४० च्या घरात आहे. त्यामुळे चोरी गेलेला मोबाईल मिळेलच, याबाबत कुणीही शाश्वती देऊ शकत नाही. यंदा शहर पोलीस आयुक्तालयाने ४७ लाख रुपयांचे ४५१ मोबाईल मूळ मालकास परत केले. मोबाईल सापडतो, पण वेळाने हे वर्तमानातले अस्वस्थ वास्तव आहे.

 

टॅग्स :MarketबाजारThiefचोर