शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

पोलीस आयुक्तांच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 05:00 IST

गतवर्षी मार्च महिन्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव सुरू झाला. राज्यात अत्यंत वाईट परिस्थितीत कोरोनावर शासन मार्ग काढत असताना पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह या तेव्हा नाशिक येथे पोलीस अधीक्षकपदी कार्यरत होत्या. मालेगाव हे संवेदनशील असल्याने कायदा, सुव्यवस्था हाताळताना कोरोनाची स्थिती हाताळणे अतिशय नाजूक हाेते. मात्र, डॉ. आरती सिंह यांनी जातीय सलोखा राखून कोरोना नियंत्रणात आणला.

ठळक मुद्देकोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी, पोलीस विभागाची प्रतिमा उंचावली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी कोरोनाकाळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची जागतिक स्तरावरील प्रसारमाध्यमाने दखल घेतली आहे. केंद्र शासनाने गत काही दिवसांपूर्वी त्यांना वूमेन वॉरिअर्स पुरस्काराने गौरविले. देशातील एकमेव आयपीएस डाॅ. आरती सिंह यांच्या कार्यकर्तृत्वाने पोलीस विभागाची प्रतिमा उंचावली गेली आहे. गतवर्षी मार्च महिन्यात कोविड-१९ चा प्रादुर्भाव सुरू झाला. राज्यात अत्यंत वाईट परिस्थितीत कोरोनावर शासन मार्ग काढत असताना पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह या तेव्हा नाशिक येथे पोलीस अधीक्षकपदी कार्यरत होत्या. मालेगाव हे संवेदनशील असल्याने कायदा, सुव्यवस्था हाताळताना कोरोनाची स्थिती हाताळणे अतिशय नाजूक हाेते. मात्र, डॉ. आरती सिंह यांनी जातीय सलोखा राखून कोरोना नियंत्रणात आणला. मालेगाव येथे कंटेन्मेंट झोन, कोरोनाविषयी जनजागृती, संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना, सॅनिटायझरचा वापर, मास्कचे वितरण, शारीरिक अंतर राखणे आदींविषयी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जनजागृती केली. परिणामी मालेगाव येथ कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली. मालेगावाचे ४० अंश सेल्सिअस तापमान असताना कोरोनात वारिअर्स म्हणून पोलीस आयुक्त डॉ. सिंह यांनी १२ तासांपेक्षा जास्त काम केले आणि कोरोनाची परिस्थिती हाताळली. जातीय तेढ निर्माण होऊ न देता हिंदू-मुस्लिम बांधव कोरोनाविरुद्ध एकत्र लढले. डॉ. सिंह यांच्या कार्याची दखल थेट केंद्र शासनाने घेत त्यांना वूमेन वॉरिअर्स पुरस्काराने गाैरविले. पोलीस आयुक्त डॉ. सिंह यांनी भंडारा, गडचिरोली, नाशिक येथेही कर्तव्य बजावले आहे. त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या ‘कॉफी  टेबल बुक’मध्ये घेण्यात आली.  

 

टॅग्स :Policeपोलिस