शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

१५ दिवसात परतावा द्या, अन्यथा पीक विमा कंपनीवर एफआयआर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 12:51 IST

जिल्हाधिकारी : नाकारलेल्या पूर्वसूचनांची फेरतपासणी करा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पीक विमा कंपनीने गतवर्षीच्या खरिपात नाकारलेल्या पूर्वसूचना पुन्हा तपासून बाधित शेतकऱ्यांची यादी कृषी विभागास त्वरित सादर करा. धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या पूर्वसूचनांची फेरतपासणी करून १५ दिवसात शेतकऱ्यांना परतावा देण्यात यावा, अन्यथा कंपनीवर एफआयआर नोंदविण्याची तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय व्यवस्थापक सत्यजित ठोसरे, कृषी विकास अधिकारी, व्यवस्थापक, अग्रणी बँक अमरावती, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, संबंधित अधिकारी, पीक विमा कंपनीचे अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

खरिपातील खते व बियाणे नियोजनाच्या अनुषंगाने बडनेरा रेल्वे रेक पॉइंटमध्ये खताची रेक लागल्यावर त्याला प्राधान्य देण्याविषयी जिल्हाधिकारी कटियार यांनी रेल्वे प्रशासनास निर्देश दिले. प्राप्त होणाऱ्या खताच्या किमान ३० टक्के युरिया व डीएपी बफर स्टॉकसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी खत कंपनीला दिल्या आहेत. धामणगाव तालुक्यातील पीक विम्याचे घबाड समोर आले आहे. जिल्ह्यातही असे प्रकार घडल्याची शक्यता असल्याचे चिंचपूरचे शेतकरी अभिजीत लांबाडे म्हणाले

ऑफलाइन सर्व्हे अर्जावर शेतकऱ्यांच्या खोट्या सह्यासोयाबीन, कपाशी पिकासाठी चिंचपूर, तुळजापूर, बहाणपूर येथील शेतकऱ्याच्या पीक विम्याच्या सव्हें फॉर्मवर कंपनीच्या प्रतिनिधीद्वारा खोट्या सह्या मारल्याची तक्रार शेतकऱ्यांनी कृष् कृषी विभागाकडे केलेली आहे. पवन लांबाडे, राहुल बांबल, अभिजित लांबाडे, पवन निकम, महेंद्र गायकवाड, सोमेश्वर ठाकरे आदी शेतकरी बैठकीदरम्यान उपस्थित होते.

 

आठ दिवसात भरपाई द्या, जिल्हाधिकाऱ्यांची तंबीऑनलाइन सव्र्व्हेमध्ये ७५ ते ८० टक्के नुकसान दाखवले असताना ऑफलाइन सव्हें फॉर्मवर प्रतिनिधीने शून्य ते पाच टक्के असे नुकसान दर्शवून भरपाईपासून वंचित ठेवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. आठ दिवसात भरपाई न मिळाल्यास कंपनीवर एफआयआरचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

चुकीचे पंचनामे व अहवालाने शेतकऱ्यांना पीक विमा योजनेवर विश्वास राहिलेला नाही. जिल्ह्यात एक रुपयांमध्ये जरी पीक विमा योजना असली तरी फक्त ६० ते ७० टक्केच विमा निघत आहे, ही फार मोठी शोकांतिका आहे.-पुष्पक खापरे, शेतकरी प्रतिनिधी, जिल्हा समिती

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAmravatiअमरावती