शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

१५ दिवसात परतावा द्या, अन्यथा पीक विमा कंपनीवर एफआयआर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 12:51 IST

जिल्हाधिकारी : नाकारलेल्या पूर्वसूचनांची फेरतपासणी करा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पीक विमा कंपनीने गतवर्षीच्या खरिपात नाकारलेल्या पूर्वसूचना पुन्हा तपासून बाधित शेतकऱ्यांची यादी कृषी विभागास त्वरित सादर करा. धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या पूर्वसूचनांची फेरतपासणी करून १५ दिवसात शेतकऱ्यांना परतावा देण्यात यावा, अन्यथा कंपनीवर एफआयआर नोंदविण्याची तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित विभागीय व्यवस्थापक सत्यजित ठोसरे, कृषी विकास अधिकारी, व्यवस्थापक, अग्रणी बँक अमरावती, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, संबंधित अधिकारी, पीक विमा कंपनीचे अधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

खरिपातील खते व बियाणे नियोजनाच्या अनुषंगाने बडनेरा रेल्वे रेक पॉइंटमध्ये खताची रेक लागल्यावर त्याला प्राधान्य देण्याविषयी जिल्हाधिकारी कटियार यांनी रेल्वे प्रशासनास निर्देश दिले. प्राप्त होणाऱ्या खताच्या किमान ३० टक्के युरिया व डीएपी बफर स्टॉकसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी खत कंपनीला दिल्या आहेत. धामणगाव तालुक्यातील पीक विम्याचे घबाड समोर आले आहे. जिल्ह्यातही असे प्रकार घडल्याची शक्यता असल्याचे चिंचपूरचे शेतकरी अभिजीत लांबाडे म्हणाले

ऑफलाइन सर्व्हे अर्जावर शेतकऱ्यांच्या खोट्या सह्यासोयाबीन, कपाशी पिकासाठी चिंचपूर, तुळजापूर, बहाणपूर येथील शेतकऱ्याच्या पीक विम्याच्या सव्हें फॉर्मवर कंपनीच्या प्रतिनिधीद्वारा खोट्या सह्या मारल्याची तक्रार शेतकऱ्यांनी कृष् कृषी विभागाकडे केलेली आहे. पवन लांबाडे, राहुल बांबल, अभिजित लांबाडे, पवन निकम, महेंद्र गायकवाड, सोमेश्वर ठाकरे आदी शेतकरी बैठकीदरम्यान उपस्थित होते.

 

आठ दिवसात भरपाई द्या, जिल्हाधिकाऱ्यांची तंबीऑनलाइन सव्र्व्हेमध्ये ७५ ते ८० टक्के नुकसान दाखवले असताना ऑफलाइन सव्हें फॉर्मवर प्रतिनिधीने शून्य ते पाच टक्के असे नुकसान दर्शवून भरपाईपासून वंचित ठेवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. आठ दिवसात भरपाई न मिळाल्यास कंपनीवर एफआयआरचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

चुकीचे पंचनामे व अहवालाने शेतकऱ्यांना पीक विमा योजनेवर विश्वास राहिलेला नाही. जिल्ह्यात एक रुपयांमध्ये जरी पीक विमा योजना असली तरी फक्त ६० ते ७० टक्केच विमा निघत आहे, ही फार मोठी शोकांतिका आहे.-पुष्पक खापरे, शेतकरी प्रतिनिधी, जिल्हा समिती

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाAmravatiअमरावती