शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

बोनस द्या, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 22:01 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तूर खरेदी तातडीने सुरू करण्यात यावी किंवा शेतकऱ्यांना तुरीवर प्रतिक्विंटल दोन हजार रुपये बोनस शासनाने द्यावे, अन्यथा प्रहारच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला.

ठळक मुद्देजिल्हा कचेरीत बैठक : बच्चू कडूंनी दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तूर खरेदी तातडीने सुरू करण्यात यावी किंवा शेतकऱ्यांना तुरीवर प्रतिक्विंटल दोन हजार रुपये बोनस शासनाने द्यावे, अन्यथा प्रहारच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आ. बच्चू कडू यांनी दिला.आ. कडू यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तूर व चणा खरेदी, चुकारे, पीकविमा, बोंडअळी, गारपीट अनुदान तसेच संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाºयांची बैठक घेतली. यावेळी आ. कडू यांनी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाºयांकडून आढावा घेतला. तुरीचे पैसे व अन्य मागण्यांसाठी अलीकडेच प्रहारने पालकमंत्र्याच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले होते. या आंदोलनाची शासनाने दखल घेतली. जिल्ह्यात चुकाºयासाठी आवश्यक २९१ कोटींपैकी २०१ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. उर्वरित ९० कोटींपैकी ५० कोटी १४ जूनपर्यंत प्राप्त होणार असल्याचे कडू यांनी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांना किती पैसे वितरित केले, याचा लेखाजोखा त्यांनी जाणून घेतला. यावर जिल्हाधिकारी बांगर यांनी आमदारांच्या सूचनेप्रमाणे ज्याचे चुकारे थकीत होते, अशा जुन्या शेतकऱ्यांना प्राधान्याने रक्कम देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सर्व मुद्द्यांवर योग्य कार्यवाहीचे आदेश जिल्हाधिकारी बांगर यांनी दिले.बैठकीला जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप वडतकर, जिल्हाप्रमुख छोटू महाराज वसू, महेंद्र जवंजाळ, प्रहार कार्याध्यक्ष मंगेश देशमुख, शेतकरी आघाडीचे जिल्हाप्रमुख चंदू खेडकर, शहरप्रमुख जोगेंद्र मोहोड, प्रदीप चौधरी, राहुल खापरे, दीपक भोंगाळे, अनूप मारुळकर, अंकुश जवंजाळ, शुभम ठाकरे, आरडीसी नितीन व्यवहारे, पुरवठा अधिकारी टाकसाळे, मार्केटिंग अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थिती होती.हमीभाव न मिळण्यास जबाबदार कोण?शासनाने तूर खरेदी केंदे्र बंद केली. अशातच शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी नोंदणी केली; मात्र तुरीचे मोजमाप झाले नाही. त्यामुळे आता खरेदी केंद्रावर तुरीची आवक वाढल्यास हमीभाव तर मिळाला नाहीच; उलट भाव पडण्याने शेतकऱ्याचे नुकसान होईल. त्यामुळे शासनाने एक हजारांऐवजी दोन हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी प्रहारने केली आहे.२३ जूनला बँकांच्या तक्रारीसाठी जनतादरबारपीकविमा, बोंडअळी, गारपीट आणि कर्जप्रकरणे यासंदर्भात बँकांकडून शेतकऱ्यांना असहकार्य होत आहे. शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारींबाबत प्रहारच्यावतीने २३ जून रोजी जनता दरबार अमरावती येथील विश्रामगृहात होत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना संबंधित तक्रारी लेखी स्वरूपात देण्याचे आवाहन आ.बच्चू कडूृ यांनी केले आहे.