शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

तू माझ्याशी बोलत का नाही? म्हणत आवळला गळा; २० दिवसांनंतर मृत्यूचा उलगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2022 11:01 IST

ती १८ ऑगस्टपासून बेपत्ता होती. तर १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी तिचा मृतदेह एका शेतातील विहिरीत आढळून आला होता.

चिखलदरा (अमरावती) : एका १९ वर्षीय युवतीला शेतात बोलावून तू माझ्याशी का बोलत नाहीस, अशी विचारणा करत तिच्याशी वाद घालण्यात आला. तर वादादरम्यान तिचा गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. तिचा मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला होता. याप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी सोमवारी तिघांविरुद्ध खून, पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला असून, तिघांनाही अटक करण्यात आली आहे. घटनेच्या २० दिवसांनंतर या प्रकरणाचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

अमोल सुखदेव उईके (२९ वर्षे, रा. कोटमी), जाकीर अहमद उर्फ जाकू अहमद निसार (२४, रा. मुगलाईपुरा, परतवाडा) व मुकेश रामसिंग बेठेकर (१९, रा. कोटमी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुध्द खून, खुनाचा पुरावा नष्ट करणे व ॲट्रॉसिटीअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबिका गोंडू मरस्कोल्हे (१९, रा. कोटमी) असे मृत मुलीचे नाव आहे.

अंबिका ही १८ ऑगस्टपासून बेपत्ता होती. तर १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी तिचा मृतदेह तिचे मोठे वडील धोंडू रामुस मरसकोल्हे यांना त्यांच्या शेतातील विहिरीत आढळला होता. त्याबाबत त्यांनी चिखलदरा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी त्याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली होती. सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाढवे यांनी तपास चालविला होता. तपासादरम्यान आरोपी निष्पन्न झाले. पुढील तपास धारणीचे एसडीपीओ गोहर हसन करीत आहेत.

वीस दिवसांनंतर लागला छडा

युवतीचा मृतदेह विहिरीत आढळल्याने त्यावेळी तर्कवितर्क व्यक्त होत होते. परंतु ग्रामीण पोलिसांनी घटनेचा सखोल तपास चालविला. साक्षीदार व इतरांना विचारपूस केली असता त्यात तीनही आरोपींचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. तू माझ्याशी का बोलत नाही, या कारणाने त्यांच्यात वाद झाला. वादादरम्यान तिचा गळा आवळला गेला. तथा पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह विहिरीत फेकल्याचे तपासात उघड झाले.

तरुणीची आरोपींपैकी नेमकी कुणाशी ओळख होती, प्रेमसंबंध होते का, तिच्यावर अत्याचार करण्यात आला का, तिचा गळा नेमका कोणी आवळला, या बाबींचा तपास पोलीस करीत आहेत.

युवतीची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. त्यावरून तिघांना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

- राहुल वाढवे, ठाणेदार, चिखलदरा

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावतीPoliceपोलिसArrestअटक