शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

RFOच्या डोक्यावर नावालाच राजपत्रित मुकुट; ना पदोन्नती, ना संख्या वाढ!

By गणेश वासनिक | Updated: July 7, 2024 21:27 IST

राज्यात केवळ ९९२ पदे, सहायक वनसंरक्षकांना पाच वर्षांत पदोन्नती, RFOकडे दुर्लक्ष

गणेश वासनिक, अमरावती: वन विभागाचा कणा असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना (आरएफओ) राज्य शासनाने राजपत्रित असा दर्जा बहाल केला असला, तरी हा दर्जा काटेरी मुकुट बनला आहे. गेल्या ४० वर्षांत आरएफओंच्या पदसंख्येत वाढ झालेली नाही. परिणामी वनांच्या संरक्षणावर ताण वाढलेला आहे, तर दुसरीकडे वरिष्ठ पदांना पाच वर्षांत पदोन्नती मिळत असल्याचे वास्तव आहे.

आरएफओ हे वर्ग २ चे पद असून, कार्यकारी प्रमुख म्हणून काम करतात. राजपत्रित अधिकारी असल्याने या पदाला कार्यालय, लिपिक, पुरेसे कर्मचारी, शासकीय वाहन सेवा देणे क्रमप्राप्त आहे. असे असले तरी राज्यातील ९९२ पैकी ७०० आरएफओ हे व्याघ्र प्रकल्प, सामाजिक वनीकरणात कर्तव्य बजावतात. यातील सामाजिक वनीकरण विभागाच्या आरएफओंना शासकीय सेवेपासून वंचित ठेवल्याचे दिसून येते. जर सुविधाच नसेल तर राजपत्रित अधिकारी आरएफओ हे शासनाच्या लोकाभिमुख सेवा कशा राबविणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

आरएफओंच्या पदांमध्ये वाढ नाही

गत १० वर्षांत वन विभागात प्रधान मुख्य वनसंरक्षकांची सहा पदे निर्माण करण्यात आली. तर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक १९ च्या जवळपास आणि विभागीय वन अधिकारी १०९, सहायक वनसंरक्षकांची ३०० पदे आहेत. वनरक्षकांची २ हजार नवी पदे निर्माण झाली. मात्र आरएफओंची पदे आजमितीला केवळ ९९२ एवढीच आहेत. आरएफओ पदांच्या संख्येत गेल्या ३० वर्षांत वाढ झालेली नाही. याउलट वन्यजीव आणि वनसंरक्षणाची जबाबदारी बघता नवीन आकृतीबंध तयार करून ३०० च्यावर आरएफओंच्या पद संख्येत वाढ अपेक्षित आहे.

सहाय्यक पदे केव्हा निर्माण होणार?

आरएफओ हे पद पोलिस निरीक्षक, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी या पदांशी साम्य ठेवते. या विभागाने सहायक पदनिर्मिती केली आहे. मात्र आरएफओंंना सहायक पद नसल्याने कार्यालयाचे कामकाज रेंगाळत आहे. प्रादेशिक परिक्षेत्राकरिता पदांची निर्मिती करणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागAmravatiअमरावती